शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

पवनऊर्जा निर्मितीत सांगली अव्वल--ऊर्जा संवर्धन दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:48 IST

सांगली : पवनऊर्जा, सहवीज निर्मिती (को-जनरेशन) आणि सौरऊर्जेपासून जिल्ह्यात वर्षाला ४३०२ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती होत आहे.

ठळक मुद्दे सांगली जिल्ह्यात सहवीज निर्मितीचे आठ साखर कारखान्यांचे प्रकल्पसौरऊर्जेकडेही शेतकºयांचा वाढता कल :

अशोक डोंबाळे ।सांगली : पवनऊर्जा, सहवीज निर्मिती (को-जनरेशन) आणि सौरऊर्जेपासून जिल्ह्यात वर्षाला ४३०२ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती होत आहे. ऊर्जा निर्मितीत जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले. ऊर्जा निर्मितीबरोबरच कमी वॅटचे बल्ब, ट्यूब आणि फॅनचा वापर करून केंद्र आणि राज्य शासनाने विजेची बचत करण्याचे धोरण जिल्ह्यात राबविले आहे.

जिल्ह्यात आठ साखर कारखान्यांचे सहवीज निर्मितीचे प्रकल्प असून, तेथून वर्षाला २२०३.२ दशलक्ष युनिट वीज तयार होत आहे. साखर कारखाने स्वत:साठी विजेचा तिचा वापर करून उर्वरित वीज महावितरण कंपनीला विक्री करीत आहेत. या प्रकल्पांमुळे साखर कारखाने विजेबाबतीत स्वयंभू झाल्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित साखर कारखानेही सहवीज निर्मिती प्रकल्प उभा करण्याच्या तयारीत आहेत.जत, खानापूर, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यांमध्ये ९३५ पवनचक्क्यांची युनिट बसविली असून, त्यातून १५२७.३६ दशलक्ष युनिट वीज तयार होत आहे. सौरऊर्जा आणि को-जनरेशनमधूनही वीज निर्मिती वाढली आहे. जलविद्युत स्रोतांपेक्षाही जास्त वीज निर्मिती अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून होत आहे. पवनऊर्जेबरोबरच सध्या जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्पही वाढत आहेत. खासगी सौरवीज निर्मितीचा पहिला प्रकल्प आटपाडी तालुक्यातील पळसवाडी-दिघंची येथे टाटा सोलरने उभा केला आहे. येथून ५० मेगावॅट वीज तयार होत असून, सातारा जिल्ह्यातील महावितरण कंपनीला ही वीज विकली जात आहे. त्याचप्रमाणे सांगली शहरातील सहा खासगी रूग्णालयांनीही सौरऊर्जेचे प्रकल्प हाती घेतले असून, ते स्वत:साठी त्या विजेचा वापर करीत आहेत. जिल्ह्यातील १६० कुटुंबांनी घराच्या छतावर आणि चार हॉटेलच्या छतावर सोलर पॅनेलच्या साहाय्याने वीज निर्मिती केली असून, तेही स्वत:साठीच वीज वापरत आहेत.जिल्ह्यात वर्षाला : १५२७ दशलक्ष युनिट वीजसांगली जिल्ह्यात विविध कंपन्यांनी ९७८ पवनचक्क्या बसविल्या आहेत. वाºयाच्या वेगावर वीज निर्मिती होत असल्यामुळे ज्यावेळी वारा असेल तेव्हाच वीज तयार होत आहे. त्यानुसार जिल्ह्यात पवनचक्क्यांच्या माध्यमातून १५२७.३६ दशलक्ष युनिट वीज तयार होत आहे. खासगी कंपन्यांकडून महावितरण वीज विकत घेऊन ग्राहकांना पुरवठा करीत आहे. पवनऊर्जेचा नव्याने फारसा विस्तार होत नसल्याचे दिसत आहे. वर्षभरात चारच नवीन पवनचक्क्या बसविल्या आहेत, असेही महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.कचºयापासून वीज निर्मितीसाईन वेब बायोगमास हा कचºयापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प तुंग (ता. मिरज) येथे उत्तरप्रदेशातील उद्योजकांनी उभा केला आहे. सुका कचरा, दगडी कोळसा आणि लाकूड याच्यापासून वीज निर्मिती केली जात आहे. १० मेगावॅट वीज तयार होत आहे. जिल्ह्यातून सुका कचरा उपलब्ध होत नसल्यामुळे ही कंपनी केरळमधून सुका कचरा उपलब्ध करून घेत असल्याचेही महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.जिल्ह्यात सौरऊर्जेचे छोटे प्रकल्प होणारशेतकºयांना शेतीसाठी स्वस्त दरात आणि दिवसाही पुरेशी वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासकीय जागांची शासकीय अधिकाºयांनी पाहणी करून तसा प्र्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. प्रतिदिन दोन ते दहा मेगावॅट वीज उपलब्ध होईल, असे सौरऊर्जा प्रकल्प तयार करण्यात येणार आहेत. प्रतिदिन दोन मेगावॅट वीज निर्मितीसाठी दहा एकर जागेची गरज असून जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर या तालुक्यात शासकीय जागा उपलब्ध असल्यामुळे येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मोठी संधी आहे. टेंभू उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याचे शासनाचे धोरण असून त्यासाठी शासनाने निविदाही काढली आहे.चांदोलीतून दिवसाला चार मेगावॅट वीजचांदोली (वारणा) येथील धरणाच्या सांडव्यातून जाणाºया पाण्यावर वीज निर्मिती करणारे छोटे दोन प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून प्रत्येकी दोन मेगावॅटप्रमाणे दिवसाला चार मेगावॅट वीज तयार होत आहे. पाण्याचा वेग कमी झाल्यास वीज निर्मितीवर त्याचा परिणाम होत आहे. शासनाने मनावर घेतले तर, चांदोली प्रकल्पातून वीज निर्मितीची क्षमता वाढविता दुप्पट करणे सहज शक्य असल्याचे वीज निर्मिती क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.ऊर्जा संवर्धनाबरोबरच बचतीकडेही लक्षग्राहकांची वाढत्या विजेची मागणी लक्षात घेऊन शासनाने ऊर्जेचे नवीन प्रकल्प उभारण्याबरोबरच ऊर्जा बचतीलाही प्राधान्य दिले आहे. केंद्र सरकारने महावितरणच्या माध्यमातून ऊर्जासक्षम (एलईडी) ‘उजाला’ योजनेची उपकरणे बाजारात आणली आहेत. या योजनेमार्फत पहिल्या टप्प्यात कमी वॅटचे बल्ब, त्याचबरोबर ट्यूब आणि फॅनही उपलब्ध आहेत. कमी वॅटमध्ये जादा प्रकाश देण्याचे व विजेची ७० टक्के बचत करण्याचे तंत्र वापरले आहे, असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.साखर कारखान्यांची वीज निर्मिती क्षमता कारखाना वीज मेगावॅटउदगिरी १४सोनहिरा २२राजारामबापू(साखराळे) २८राजारामबापू(वाटेगाव) १२रेणुका शुगर १५(आरग)सदगुरु श्री श्री १२क्रांती १९.७विश्वास १५एकूण १३७.७