शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Sangli: सांगलीची खासदारकीची जागा ‘स्वाभिमानी’ लढणार, राजू शेट्टींनी दिले स्पष्ट संकेत

By अविनाश कोळी | Updated: August 24, 2023 17:02 IST

Sangli: शेतकऱ्यांनी माझ्या जोडीला सांगली लोकसभा मतदारसंघातूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार संसदेत पाठविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले.

- अविनाश कोळीमालगाव - कोणताही पक्ष स्वार्थासाठी शेतकऱ्यांची बाजू घेतो, मात्र सत्ता येताच त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडतो. ही राजकीय व्यवस्था उलथून टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी माझ्या जोडीला सांगली लोकसभा मतदारसंघातूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार संसदेत पाठविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले.

मालगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल शेट्टी व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचा सत्कार उपाध्यक्ष संजय खोलकुंबे व तालुकाध्यक्ष सुरेश वावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सावकार मदनाईक, मिलिंद साखरपे संजय बेले उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस सोयाबीनला आठ हजार दर मागत होते. आता सोयाबीन दर पाच हजार झाला आहे. सत्तेत असताना यावर ते बोलत नाहीत. शरद पवार सत्तेत होते त्यावेळी वीज दरावर काही बोलत नव्हते, मात्र सध्या ते वीज दरवाढीला विरोध करत आहेत. सर्वच राजकीय पक्ष सत्ता नसताना स्वार्थासाठी शेतकरी हितावर बोलतात, मात्र सत्ता मिळताच शेतकऱ्यांना विसरतात हे वास्तव आहे.

ऊस, द्राक्षासह कोणतीही शेती सध्या परवडत नाही. याचे कारण उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे. मात्र, त्या तुलनेत शेतीमालाचे भाव वाढत नाहीत. शेतकऱ्यांना कोणताच टॅक्स नाही असे अनेकजण ओरडत असतात. पण, ऊस उत्पादक शेतकरी राज्य आणि केंद्र शासनाला ३३ हजार कोटी रुपये कर देतोय. त्यामुळे आमचे उत्पन्न सिद्ध करा आणि आम्हालाही इन्कम टॅक्स लावा, असे जाहीर आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली