शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

सांगली : ताकारी, टेंभू, म्हैसाळच्या थकबाकीचा विषय संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:32 IST

सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेच्या कित्येक वर्षांपासूनच्या थकबाकीचा विषय कायमस्वरुपी संपविण्यात आला आहे.

ठळक मुद्देताकारी, टेंभू, म्हैसाळच्या थकबाकीचा विषय संपलातिन्ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता

सांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेच्या कित्येक वर्षांपासूनच्या थकबाकीचा विषय कायमस्वरुपी संपविण्यात आला आहे. एकूण ३८ कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी २५ कोटी रुपये आम्ही वर्ग केले आहेत, उर्वरीत रक्कम मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणार आहे, त्यामुळे रविवारी योजना कार्यान्वित होण्यास कोणतीही अडचण नाही, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनेची एकूण थकबाकी ३८ कोटी ५८ लाख इतकी आहे. यातील २४ कोटी २५ लाख रुपये आम्ही शनिवारी वर्ग केले आहेत. थकबाकीवरील दंड व व्याज माफ करण्याची मागणी आम्ही केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. उर्वरीत रक्कम मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणार आहे. त्यामुळे थकबाकीचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे.यापुढे आम्ही या तिन्ही योजनांची १ रुपयाचीही थकबाकी ठेवणार नाही, असा शब्द आम्ही मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी आता आमच्यावर आली आहे. यापुढे शेतकऱ्यांना एकूण बिलाच्या १९ टक्के पाणीपट्टी द्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर फारसा आर्थिक ताण पडणार नाही.

लोकांची बिले भरण्याची मानसिकता आहे. ती पाणीपट्टी संकलीत करण्याबाबत राबवाव्या लागणार्‍या यंत्रणेबाबत कृष्णा खोरेअंतर्गत येणार्‍या सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, संबंधित विभागाचे उपजिल्हाधिकारी व अन्य अधिकार्‍याची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल.पाणीपट्टी वसुलीबाबतची चौकशी होणार!यापूर्वी लाभक्षेत्रातील गावच्या प्रमुखांनी शेतकर्‍याकडून पैसे गोळा करून ते भरले नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. साखर कारखान्यांबाबतही अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. त्यामुळे याबाबत लवकरच ठोस कारवाई केली जाईल, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Tembhu Projectटेंभू धरणSangliसांगली