शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : ताकारी, टेंभू, म्हैसाळच्या थकबाकीचा विषय संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:32 IST

सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेच्या कित्येक वर्षांपासूनच्या थकबाकीचा विषय कायमस्वरुपी संपविण्यात आला आहे.

ठळक मुद्देताकारी, टेंभू, म्हैसाळच्या थकबाकीचा विषय संपलातिन्ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता

सांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेच्या कित्येक वर्षांपासूनच्या थकबाकीचा विषय कायमस्वरुपी संपविण्यात आला आहे. एकूण ३८ कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी २५ कोटी रुपये आम्ही वर्ग केले आहेत, उर्वरीत रक्कम मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणार आहे, त्यामुळे रविवारी योजना कार्यान्वित होण्यास कोणतीही अडचण नाही, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनेची एकूण थकबाकी ३८ कोटी ५८ लाख इतकी आहे. यातील २४ कोटी २५ लाख रुपये आम्ही शनिवारी वर्ग केले आहेत. थकबाकीवरील दंड व व्याज माफ करण्याची मागणी आम्ही केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. उर्वरीत रक्कम मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणार आहे. त्यामुळे थकबाकीचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे.यापुढे आम्ही या तिन्ही योजनांची १ रुपयाचीही थकबाकी ठेवणार नाही, असा शब्द आम्ही मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी आता आमच्यावर आली आहे. यापुढे शेतकऱ्यांना एकूण बिलाच्या १९ टक्के पाणीपट्टी द्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर फारसा आर्थिक ताण पडणार नाही.

लोकांची बिले भरण्याची मानसिकता आहे. ती पाणीपट्टी संकलीत करण्याबाबत राबवाव्या लागणार्‍या यंत्रणेबाबत कृष्णा खोरेअंतर्गत येणार्‍या सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, संबंधित विभागाचे उपजिल्हाधिकारी व अन्य अधिकार्‍याची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल.पाणीपट्टी वसुलीबाबतची चौकशी होणार!यापूर्वी लाभक्षेत्रातील गावच्या प्रमुखांनी शेतकर्‍याकडून पैसे गोळा करून ते भरले नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. साखर कारखान्यांबाबतही अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. त्यामुळे याबाबत लवकरच ठोस कारवाई केली जाईल, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Tembhu Projectटेंभू धरणSangliसांगली