शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

सांगली : आवंढी गावातील जलसंधारणासाठी मुख्यमंत्र्यांनी केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:53 IST

आवंढी येथे पाणी फौंडेशनच्या वतीने हाती घेतलेले जलसंधारणाचे अभूतपूर्व काम आहे. आवंढी ग्रामस्थांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी केलेली एकजूट राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देआवंढी गावातील जलसंधारणासाठी मुख्यमंत्र्यांनी केले श्रमदानसांगली जिल्हा दौऱ्यात पाणी फौंडेशनच्या कामाची फडणवीस यांनी केली पाहणी

सांगली : आवंढी येथे पाणी फौंडेशनच्या वतीने हाती घेतलेले जलसंधारणाचे अभूतपूर्व काम आहे. आवंढी ग्रामस्थांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी केलेली एकजूट राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शुक्रवारी जत तालुक्यातील आवंढी गावात पाणी फौंडेशनतर्फे केलेल्या जलसंधारणाच्या कामाची केवळ पाहणीच नाही, तर चक्क तेथे श्रमदान करुन ग्रामस्थांशीही संवाद साधला.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने गेल्या तीन वषार्पासून जलसंधारणाचे भरीव काम हाती घेतले आहे. मोठ्या धरणांच्या बरोबरीने दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियानातून पाण्याचे विज्ञान समजून घेवून काम केल्याने दुष्काळमुक्तीचे समाधान मिळाल्याचे ते म्हणाले.राज्यात आतापर्यंत जलयुक्त शिवार अभियानातून ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली तर यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त करीत आहोत. जलयुक्त शिवार योजनेमध्ये जनतेचा सहभाग घेतल्याने ग्रामस्थांनाही ही कामे आपली वाटू लागली आहेत.

त्यामुळे गावातील पाण्याचा थेंब न थेंब शास्त्रयुक्त पध्दतीने गावाच्या शिवारात अडविला जात आहे. आज राज्यातील सर्व गावांचा धर्म, जात, पार्टी, गट हे सर्व म्हणजे पाणी आहे. सर्वजण पाण्याकरीता काम करीत आहेत ही समाधानाची बाब आहे.पाणी फौंडेशनने जलसंधारणाच्या कामामध्ये घेतलेला पुढाकार आणि तयार केलेले मॉडेल महत्त्वाचे असून ग्रामस्थांना पाण्याचे शास्त्र समजून सांगितले आहे. पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत सहभागी असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.जलसंधारणाच्या कामासाठी ग्रामस्थांना येणारी डिझेलची समस्या निश्चितपणे दूर करू. तसेच जलसंधारणाचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSangliसांगली