शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सांगली : शांतिनिकेतनमध्ये लावणीने भरला रंग, रसिकांची भरभरून दाद, नृत्यांगणांच्या अदाकारीने मने जिंकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:22 IST

घुंगरांच्या बोलावर थिरकणारी शिस्तबद्ध पावलांची नजाकत...गीत, संगीताला अर्थपूर्ण बनविणारी सुंदर अदाकारी..अशा बहारदार वातावरणात रसिकांची मने जिंकत लावणीने शांतिनिकेतनच्या लोकरंगभूमीवर नवा रंग भरला. शिट्टया आणि टाळ्यांच्या कडकडात, ढोलकीच्या तालावर शांतिनिकेतनमध्ये लावणी स्पर्धा पार पडल्या.

ठळक मुद्देशांतिनिकेतनमध्ये लावणीने भरला रंगरसिकांची भरभरून दादनृत्यांगणांच्या अदाकारीने मने जिंकली

सांगली : घुंगरांच्या बोलावर थिरकणारी शिस्तबद्ध पावलांची नजाकत...गीत, संगीताला अर्थपूर्ण बनविणारी सुंदर अदाकारी..अशा बहारदार वातावरणात रसिकांची मने जिंकत लावणीने शांतिनिकेतनच्या लोकरंगभूमीवर नवा रंग भरला. शिट्टया आणि टाळ्यांच्या कडकडात, ढोलकीच्या तालावर शांतिनिकेतनमध्ये लावणी स्पर्धा पार पडल्या.राज्यभरातून आलेल्या लावणी नृत्यांगणांनी, लोककलाकारांनी या स्पर्धेत जीव ओतून लावणी सादर केली. रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरु होती. यशवंत कुलकर्णी यांच्याहस्ते या स्पर्धेचे उदघाटन झाले आणि त्यानंतर एकापेक्षा एक बहारदार लावण्या सादर झाल्या.

 

दिलखेचक अदाकारी, बिजलीसारखे नृत्य, ढोलकीचा कडकडाट आणि रसिकांच्या शिट्टयांनी लोकरंगभूमी रोमांचीत झाली होती. राज्यभरातून आलेल्या विविध वयोगटातील कलाकारांनी लावणी सादर केली. पुरुष कलाकारही त्यात आघाडीवर होते.

जुन्या, नव्या बाजाच्या लावण्या यानिमीत्त रसिकांना बघायला मिळाल्या. स्पर्धकांसोबत रसिकांचीही अलोट गर्दी झाली होती. लोकनृत्य स्पधेर्साठी २८ तर लावणी स्पधेर्साठी ४0 संघ सहभागी झाले होते.स्वागत महेश पाटील यांनी केले तर प्रास्ताविक मुख्य संयोजक, संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी केले. गौतम पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या लोककलांमध्ये लावणीचे स्थान सगळ्यात वरचे असले तरी ती जपण्यासाठी शासन आणि कलासंस्था काय करतात हा सवाल विचार करायला लावणाराच आहे.

लोककला आणि लोककलाकारांचे जगणे अतिशय बिकट आणि हालखीचे झाले असताना हे दोन्ही घटक जपण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगवण्यासाठी प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ संचलित लोकरंगभूमीच्या माध्यमातून अखेरपर्यंत प्रयत्न केले.

याची जाणीव ठेवूनच यंदा पहिल्यांदाच लोककलाग्राम लोकोत्सवामध्ये राज्यस्तरीय खुल्या लोकनृत्य आणि लावणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्याला खुप मोठा प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती गौतम पाटील यांनी दिली.परीक्षक म्हणून राजेंद्र संकपाळ, सोनाली रजपूत, कल्याणी चौधरी, दिपक बिडकर, भाग्यश्री कालेकर आणि संजय पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. अनिकेत शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. आभार जीवन कदम यांनी मानले. उपसंचालक बी.आर.थोरात, एम.के.आंबोळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Sangliसांगलीentertainmentकरमणूक