शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :थकबाकी भरली, तरच पाणी,  टेंभू, म्हैसाळबाबत शासनाची भूमिका,  मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:34 IST

टेंभू उपसा सिंचन योजनेचे २१ कोटी, तर म्हैसाळ योजनेचे ३४ कोटी रुपये वीज बिल थकीत असून यापैकी ५० टक्के थकबाकी शेतकऱ्यांनी भरली तरच योजना सुरू करू, अशी भूमिका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमोर मुंबईत मांडली.

ठळक मुद्देथकबाकी भरली, तरच पाणी, मुंबईत बैठकटेंभू, म्हैसाळबाबत शासनाची भूमिका थकबाकी भरल्यामुळे ताकारी योजनेचे आवर्तन सुरू

सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे २१ कोटी, तर म्हैसाळ योजनेचे ३४ कोटी रुपये वीज बिल थकीत असून यापैकी ५० टक्के थकबाकी शेतकऱ्यांनी भरली तरच योजना सुरू करू, अशी भूमिका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमोर मुंबईत मांडली.मुंबईत बुधवारी कालवा समितीची बैठक झाली. यावेळी जलसंपदामंत्री महाजन बोलत होते. या बैठकीस आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश खाडे, आमदार भारत भालके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सांगोला येथील माजी आमदार दीपकआबा साळुंखे, सांगली पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच उपसा सिंचन योजनांचा आढावा सादर केला. टेंभू योजनेचे वीज बिल २१ कोटी आणि पाणीपट्टी ३५ कोटी, तर म्हैसाळ योजनेचे वीज बिल ३४ कोटी आणि पाणीपट्टी ७१ कोटी अशी थकबाकी आहे. यापैकी काहीच वसुली झाली नसल्यामुळे वीज बिल भरणे कठीण झाले आहे.

ताकारी योजनेचे दहा कोटींचे वीज बिल आणि २९ कोटी पाणीपट्टीची थकबाकी आहे. यापैकी ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाच कोटी भरले आहेत. थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरु केल्याचे अधिकाºयांनी यावेळी सांगितले.त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले की, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकूण थकीत वीज बिलाच्या ५० टक्के रक्कम भरल्याशिवाय या योजना चालू करता येणार नाहीत, शेतकऱ्यांनी वीज बिलाची रक्कम भरावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी त्यांचे प्रबोधन करावे.अधिकारीही वसुलीसाठी प्रयत्न करतील. वीज बिलाबरोबरच सिंचन योजना सुरळीत चालू राहण्यासाठी पाणीपट्टीचीही रक्कम नियमितपणे भरली पाहिजे. यासाठीही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.

सिंचन योजनांची थकबाकी

योजना       वीज बिल           पाणीपट्टी

म्हैसाळ            ३४ कोटी         ७१ कोटी

ताकारी             १० कोटी         २९ कोटीटेंभू                   २१ कोटी         ३५ कोटीसिंचन योजनेच्या प्रतीक्षेत शेतकरीशिवसेनेचे आ. अनिल बाबर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी, टंचाई निधीतील १६ कोटी शासनाकडून उपलब्ध करून आणल्याचे मागील आठ दिवसांत सांगितले होते.लोकप्रतिनिधींच्या या घोषणेमुळे, पिकांना तात्काळ टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण, जलसंपदामंत्री महाजन आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, थकीत वीज बिलाच्या ५० टक्के रक्कम भरल्याशिवाय योजना चालू करता येणार नसल्याचे बुधवारी सांगितले.त्यामुळे सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ताकारी योजनेची थकीत वीज बिलाच्या ५० टक्के रक्कम भरल्यामुळे ती योजना चालू झाली आहे. म्हैसाळ आणि टेंभू योजनेच्या पाण्यासाठी शेतकºयांना पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

टॅग्स :Tembhu Projectटेंभू धरणSangliसांगली