शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

सांगली :व्यापाऱ्यांवर छापे टाकण्याची तयारी

By admin | Updated: September 25, 2014 00:34 IST

एलबीटी वसुली : शासनाच्या मान्यतेनंतर कारवाई

सांगली : एलबीटी वसुलीसाठी आता महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापे टाकण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली. त्यासाठी व्यापाऱ्यांची हिटलिस्ट तयार करण्याचे काम सुरू असून, शासनाच्या मान्यतेनंतर छापासत्र हाती घेतले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. महापालिका क्षेत्रात २१ मे २०१३ रोजी एलबीटी लागू झाला. व्यापाऱ्यांनी या कराला विरोध करीत असहकार आंदोलन पुकारले. परिणामी गेल्या दीड वर्षापासून पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडू लागला आहे. एलबीटीतून दरमहा चार ते पाच कोटी रुपयांची वसुली होत आहे. आतापर्यंत दहा हजार व्यापाऱ्यांनी एलबीटीअंतर्गत नोंदणी केली आहे. त्यापैकी दोन ते सव्वादोन हजार व्यापारी नियमित कराचा भरणा करतात. उर्वरित व्यापाऱ्यांनी कर भरण्यावर बहिष्कार कायम ठेवला आहे. आयुक्त अजिज कारचे, एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर यांनी व्यापाऱ्यांशी वारंवार बैठका घेऊन कर भरण्याचे आवाहन केले होते; पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाने एलबीटी वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ३५ व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्यात आली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी सांगली बंद पुकारून या कारवाईला विरोध केला. आता निवडणूक आचारसंहितेचा फायदा उठवित आणखी ४० व्यापाऱ्यांची खाती सील केली आहेत. या कारवाईनंतर काही व्यापाऱ्यांनी एलबीटी भरली होती. काल मंगळवारी सांगलीत व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कर न भरण्याचा पुनरूच्चार व्यापाऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने आणखी एक पाऊल उचलत व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापे टाकण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. महापालिका क्षेत्रातील दुकानांवर छापे टाकण्याची कारवाई आयुक्त अथवा उपायुक्तांच्या अखत्यारित करावी लागणार आहे. त्यासाठी शासनाची मान्यता आवश्यक असते. तसा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)धमक्या देऊन वसुली कशासाठी? : शहाव्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पैसे भरले, तर हरकत नाही, पण धमक्या देऊन पैसे वसूल कशासाठी करता? असा सवाल कृती समितीचे समीर शहा यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, आयुक्तांनीही कारवाईचा बडगा उगारला तरी, एकही व्यापारी कर भरणार नाही. व्यापाऱ्यांनी आर या पारची लढाई करण्याचा निर्धार केला आहे. कालच्या बैठकीत राजकीय भूमिका घेतली नाही, म्हणजे आम्ही माघार घेतली, असा होत नाही. मतदान करणे हा वैयक्तिक हक्क आहे. त्यासाठी आम्ही आग्रह धरणार नाही. आयुक्तांनी असाच अन्याय सुरू ठेवला तर, वेळप्रसंगी व्यापारी राजकीय भूमिकाही घेतील, असेही शहा म्हणाले.