शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सांगली पंचायतनच्या उत्सवाची द्विशतकी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:48 IST

अविनाश कोळीसांगली: सांगलीच्या पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची परंपरा तब्बल पावणेदोनशे वर्षांची आहे. १८४४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून किंवा त्यापूर्वीपासून उत्सवाची परंपरा याठिकाणी आहे. मंदिराच्या स्थापनेपासूनचा विचार केला, तर तब्बल १७४ वर्षे उत्सवाला पूर्ण होतात. म्हणजे द्विशतकाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे. १८५२ पासूनची या उत्सवाची कागदपत्रे उपलब्ध आहेत. सांगली ...

अविनाश कोळीसांगली: सांगलीच्या पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची परंपरा तब्बल पावणेदोनशे वर्षांची आहे. १८४४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून किंवा त्यापूर्वीपासून उत्सवाची परंपरा याठिकाणी आहे. मंदिराच्या स्थापनेपासूनचा विचार केला, तर तब्बल १७४ वर्षे उत्सवाला पूर्ण होतात. म्हणजे द्विशतकाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे. १८५२ पासूनची या उत्सवाची कागदपत्रे उपलब्ध आहेत. सांगली पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाचा थाट पाहण्यासाठी सांगली, मिरज शहरासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील भाविकसुद्धा येत असतात. दरवर्षी पाच दिवसांचा हा उत्सव असतो.गणेशोत्सवाची चाहूल करून देण्यासाठी उत्सव सुरू होण्यापूर्वीच येथील मंदिरात 'चोर' गणपती बसतात. गणपती मंदिर व दरबार हॉलमध्ये विविध कार्यक्रमांनंतर पाचव्या दिवशी जल्लोषी मिरवणुकीने संस्थानच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन होते. उंट, घोडे, भालदार, चोपदारांसह श्रींची मूर्ती विसर्जनासाठी रथातून सरकारी घाटाकडे निघते आणि दर्शनासाठी एकच गर्दी लोटते. रथावर फुले, खोबरे-पेढ्यांचा वर्षाव होतो. 'पुढल्यावर्षी लवकर या...' च्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येतो. पूर्वी या उत्सवाचे नेतृत्व संस्थानच्या हत्तीकडे होते. संस्थानच्या शेवटच्या बबलू हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर हत्ती सांभाळणे बंद झाले. त्यामुळे उत्सवातील हत्तीची जागा रथाने घेतली. संस्थानचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी ही रथोत्सवाची परंपरा सुरू केली. तरीही हा सोहळा आजही डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो. सांगलीच्या राजवाड्यापासून पश्चिमेकडील सर्व रस्ते विसर्जनादिवशी गर्दीने भरून जातात. पंचायतनमार्फत दरबार हॉलमध्ये आठ-दहा दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्यक्रमांची ही परंपराही अधिक समृद्ध करण्याचे काम विजयसिंहराजे पटवर्धन यांनीच केले आहे.