शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगली पंचायतनच्या उत्सवाची द्विशतकी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:48 IST

अविनाश कोळीसांगली: सांगलीच्या पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची परंपरा तब्बल पावणेदोनशे वर्षांची आहे. १८४४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून किंवा त्यापूर्वीपासून उत्सवाची परंपरा याठिकाणी आहे. मंदिराच्या स्थापनेपासूनचा विचार केला, तर तब्बल १७४ वर्षे उत्सवाला पूर्ण होतात. म्हणजे द्विशतकाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे. १८५२ पासूनची या उत्सवाची कागदपत्रे उपलब्ध आहेत. सांगली ...

अविनाश कोळीसांगली: सांगलीच्या पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची परंपरा तब्बल पावणेदोनशे वर्षांची आहे. १८४४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून किंवा त्यापूर्वीपासून उत्सवाची परंपरा याठिकाणी आहे. मंदिराच्या स्थापनेपासूनचा विचार केला, तर तब्बल १७४ वर्षे उत्सवाला पूर्ण होतात. म्हणजे द्विशतकाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे. १८५२ पासूनची या उत्सवाची कागदपत्रे उपलब्ध आहेत. सांगली पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाचा थाट पाहण्यासाठी सांगली, मिरज शहरासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील भाविकसुद्धा येत असतात. दरवर्षी पाच दिवसांचा हा उत्सव असतो.गणेशोत्सवाची चाहूल करून देण्यासाठी उत्सव सुरू होण्यापूर्वीच येथील मंदिरात 'चोर' गणपती बसतात. गणपती मंदिर व दरबार हॉलमध्ये विविध कार्यक्रमांनंतर पाचव्या दिवशी जल्लोषी मिरवणुकीने संस्थानच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन होते. उंट, घोडे, भालदार, चोपदारांसह श्रींची मूर्ती विसर्जनासाठी रथातून सरकारी घाटाकडे निघते आणि दर्शनासाठी एकच गर्दी लोटते. रथावर फुले, खोबरे-पेढ्यांचा वर्षाव होतो. 'पुढल्यावर्षी लवकर या...' च्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येतो. पूर्वी या उत्सवाचे नेतृत्व संस्थानच्या हत्तीकडे होते. संस्थानच्या शेवटच्या बबलू हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर हत्ती सांभाळणे बंद झाले. त्यामुळे उत्सवातील हत्तीची जागा रथाने घेतली. संस्थानचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी ही रथोत्सवाची परंपरा सुरू केली. तरीही हा सोहळा आजही डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो. सांगलीच्या राजवाड्यापासून पश्चिमेकडील सर्व रस्ते विसर्जनादिवशी गर्दीने भरून जातात. पंचायतनमार्फत दरबार हॉलमध्ये आठ-दहा दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्यक्रमांची ही परंपराही अधिक समृद्ध करण्याचे काम विजयसिंहराजे पटवर्धन यांनीच केले आहे.