शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

सांगली पंचायतनच्या उत्सवाची द्विशतकी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:48 IST

अविनाश कोळीसांगली: सांगलीच्या पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची परंपरा तब्बल पावणेदोनशे वर्षांची आहे. १८४४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून किंवा त्यापूर्वीपासून उत्सवाची परंपरा याठिकाणी आहे. मंदिराच्या स्थापनेपासूनचा विचार केला, तर तब्बल १७४ वर्षे उत्सवाला पूर्ण होतात. म्हणजे द्विशतकाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे. १८५२ पासूनची या उत्सवाची कागदपत्रे उपलब्ध आहेत. सांगली ...

अविनाश कोळीसांगली: सांगलीच्या पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची परंपरा तब्बल पावणेदोनशे वर्षांची आहे. १८४४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून किंवा त्यापूर्वीपासून उत्सवाची परंपरा याठिकाणी आहे. मंदिराच्या स्थापनेपासूनचा विचार केला, तर तब्बल १७४ वर्षे उत्सवाला पूर्ण होतात. म्हणजे द्विशतकाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे. १८५२ पासूनची या उत्सवाची कागदपत्रे उपलब्ध आहेत. सांगली पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाचा थाट पाहण्यासाठी सांगली, मिरज शहरासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील भाविकसुद्धा येत असतात. दरवर्षी पाच दिवसांचा हा उत्सव असतो.गणेशोत्सवाची चाहूल करून देण्यासाठी उत्सव सुरू होण्यापूर्वीच येथील मंदिरात 'चोर' गणपती बसतात. गणपती मंदिर व दरबार हॉलमध्ये विविध कार्यक्रमांनंतर पाचव्या दिवशी जल्लोषी मिरवणुकीने संस्थानच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन होते. उंट, घोडे, भालदार, चोपदारांसह श्रींची मूर्ती विसर्जनासाठी रथातून सरकारी घाटाकडे निघते आणि दर्शनासाठी एकच गर्दी लोटते. रथावर फुले, खोबरे-पेढ्यांचा वर्षाव होतो. 'पुढल्यावर्षी लवकर या...' च्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येतो. पूर्वी या उत्सवाचे नेतृत्व संस्थानच्या हत्तीकडे होते. संस्थानच्या शेवटच्या बबलू हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर हत्ती सांभाळणे बंद झाले. त्यामुळे उत्सवातील हत्तीची जागा रथाने घेतली. संस्थानचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी ही रथोत्सवाची परंपरा सुरू केली. तरीही हा सोहळा आजही डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो. सांगलीच्या राजवाड्यापासून पश्चिमेकडील सर्व रस्ते विसर्जनादिवशी गर्दीने भरून जातात. पंचायतनमार्फत दरबार हॉलमध्ये आठ-दहा दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्यक्रमांची ही परंपराही अधिक समृद्ध करण्याचे काम विजयसिंहराजे पटवर्धन यांनीच केले आहे.