शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सांगली महापालिका कर्मचाऱ्यांचा दीड कोटीचा प्रॉव्हिडंड फंड जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:23 IST

सांगली : कपात करूनही खात्यावर जमा न केलेला दीड कोटीचा भविष्य निर्वाह निधी महापालिकेने अल्पवेतनधारक कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून संघर्ष करीत असलेल्या कामगारांना दिलासा मिळाला आहे.जानेवारी २०१७ पासून महापालिकाकर्मचाऱ्यांची कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची १ कोटी ५६ लाख ४८ हजार ३४५ रुपयाची रक्कम अखेर महापालिका प्रशासनाने ...

ठळक मुद्देअल्पवेतनधारकांना दिलासा; पगारातून कपात करूनही भरली नव्हती रक्कमअत्यंत अल्प वेतनावर काम करुन घेत होती

सांगली : कपात करूनही खात्यावर जमा न केलेला दीड कोटीचा भविष्य निर्वाह निधी महापालिकेने अल्पवेतनधारक कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून संघर्ष करीत असलेल्या कामगारांना दिलासा मिळाला आहे.

जानेवारी २०१७ पासून महापालिकाकर्मचाऱ्यांची कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची १ कोटी ५६ लाख ४८ हजार ३४५ रुपयाची रक्कम अखेर महापालिका प्रशासनाने भरली. सांगली महापालिकेचे साधारण १२०० कर्मचारी, बदली, रोजंदारी व मानधनावर काम करतात. वर्षानुवर्षे महापालिकेत काम करुनही महापालिका या कर्मचाऱ्यांकडून अत्यंत अल्प वेतनावर काम करुन घेत होती. या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने वारंवार आंदोलन केले. महापालिकेवर मोर्चा, निदर्शने,न्यायालयीन दावे दाखल केल्यानंतर महापालिकेने किमान वेतनाप्रमाणे वेतन अदा केले.

कर्मचाऱ्यांचा प्रश्न फक्त किमान वेतनापुरता मर्यादीत नव्हता, तर त्यांना कायद्याप्रमाणे महापालिका एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंड फंडसुध्दा देत नव्हती. संघटनेने वारंवार मागणी करुनही महापालिका दाद देत नव्हती. याबाबत महापालिका कामगार सभेचे अध्यक्ष तानाजी पाटील, जॉर्इंट सेक्रेटरी विजय तांबडे, जनरल सेके्रटरी दिलीप शिंदे आदींनी रिजनल प्रॉव्हिडंड फंड कमिशनर, कोल्हापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीत कर्मचाºयांना सदर प्रॉव्हिडंड फंड कायदा ज्या तारखेपासून लागू झाला, त्या तारखेपासून कपात करावा म्हणून मागणी केली होती. सततच्या पाठपुराव्यानुसार महापालिकेने जानेवारी २०१७ पासून कर्मचाºयांना फंड कपात सुरु केली.

मात्र संघटनेने वारंवार पाठपुरावा करुनही कर्मचाºयांना फंडाचे नंबर महापालिका देत नसल्याने शंका उपस्थित केली, यामुळे प्रॉव्हिडंड फंड कार्यालयाचे प्रवर्तक अधिकारी संतोष पोळ यांनी या तक्रारीची दखल घेऊन चौकशी केली असता, महापालिका प्रशासनाने सदर रक्कम कर्मचाºयांच्या खात्यावर जमा केली नसल्याचे स्पष्ट झाले होते.याप्रकरणी फौजदारीच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात १ कोटी ५६ हजार ४८ हजार ४५४ रुपये इतकी रक्कम जमा केली.