शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

अजबच; सांगली महापालिकेवर नाही महापौरांचा भरोसा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 14:25 IST

महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा महापालिकेच्याच बांधकाम विभागावर भरोसा नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

सांगली : महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा महापालिकेच्याच बांधकाम विभागावर भरोसा नसल्याची बाब उघडकीस आली आहे. शासनाकडून मंजूर पाच कोटींची कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राधान्य दिल्याने महापौरांनी त्यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेला घरचा आहेर दिल्याची चर्चा आहे. यावरून विरोधी भाजपकडून आता महापौरांना सभेत घेरले जाणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात महापालिकेत सत्तांतर घडले. भाजपचे बहुमत असले तरी महापौर राष्ट्रवादीचा आहे. त्यात आता महापौर सूर्यवंशी यांनी महापालिकेवरच अविश्वास दाखविल्याचे समोर येत आहे. तत्कालीन भाजपच्या सत्ताकाळात शंभर कोटीचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून दिग्विजय सूर्यवंशी यांना प्रभागातील कामे सुचविली होती, पण ही कामे तांत्रिक कारणामुळे वगळण्यात आली. त्यामुळे शंभर कोटींतून सूर्यवंशी यांच्या वाट्याला काहीच निधी आला नाही.

त्यामुळे गुलमोहर कॉलनी, दत्तनगर, गुलाब कॉलनी, किसान चौक, जवाहर चौक, दांडेकर हॉल या परिसरातील अंतर्गत रस्ते, मंगलमूर्ती कॉलनीतील बागेत काँक्रिटीकरण, नाना-नानी पार्क विकसित करणे, चांदणी चौक, सावंत प्लॉटमध्ये गटार, अशा विविध कामांचा प्रस्ताव तयार करून सूर्यवंशी यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून अखेर सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या प्रभागातील कामांना पाच कोटींचा निधी मंजूर झाला, पण हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. पीडब्लूडीने या कामाची निविदाही प्रसिद्ध केली आहे.

महापौरांच्या प्रभागातील कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार असल्याचे बाब उघडकीस आल्याने त्यांचा महापालिकेवर विश्वास नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपच्या हाती आयते कोलीत

गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत महापौरविरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. नुकतेच बचत गटाच्या शेडवरून वाद रंगला होता. अशातच महापौरांनी महापालिकेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रेम दाखविल्याने भाजपच्या हाती आयते कोलीतच मिळाले आहे. यावर महासभेत महापौरांची कोंडी करण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की, प्रभागातील पाच कोटींच्या कामाचा प्रस्ताव तयार करून २०१९ साली शासनाकडे सादर केला होता. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून तीन वर्षे पाठपुरावा केला. सहा महिन्यापूर्वी शासनाने निधी मंजूर केला. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेण्याबाबत शासनाकडून आदेश आहे. शासन निधीतील कामे कोणाकडून करून घ्यायची हा निर्णय नगरविकास विभाग घेत असते. त्यात आपला संबंध नाही. शहरातील दोन्ही आमदारही निधी सार्वजनिक बांधकामकडे देतात. अगदी भाजपच्या सत्ताकाळातही ते महापालिकेकडे निधी वर्ग करीत नव्हते.