शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

अजबच; सांगली महापालिकेवर नाही महापौरांचा भरोसा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 14:25 IST

महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा महापालिकेच्याच बांधकाम विभागावर भरोसा नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

सांगली : महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा महापालिकेच्याच बांधकाम विभागावर भरोसा नसल्याची बाब उघडकीस आली आहे. शासनाकडून मंजूर पाच कोटींची कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राधान्य दिल्याने महापौरांनी त्यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेला घरचा आहेर दिल्याची चर्चा आहे. यावरून विरोधी भाजपकडून आता महापौरांना सभेत घेरले जाणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात महापालिकेत सत्तांतर घडले. भाजपचे बहुमत असले तरी महापौर राष्ट्रवादीचा आहे. त्यात आता महापौर सूर्यवंशी यांनी महापालिकेवरच अविश्वास दाखविल्याचे समोर येत आहे. तत्कालीन भाजपच्या सत्ताकाळात शंभर कोटीचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून दिग्विजय सूर्यवंशी यांना प्रभागातील कामे सुचविली होती, पण ही कामे तांत्रिक कारणामुळे वगळण्यात आली. त्यामुळे शंभर कोटींतून सूर्यवंशी यांच्या वाट्याला काहीच निधी आला नाही.

त्यामुळे गुलमोहर कॉलनी, दत्तनगर, गुलाब कॉलनी, किसान चौक, जवाहर चौक, दांडेकर हॉल या परिसरातील अंतर्गत रस्ते, मंगलमूर्ती कॉलनीतील बागेत काँक्रिटीकरण, नाना-नानी पार्क विकसित करणे, चांदणी चौक, सावंत प्लॉटमध्ये गटार, अशा विविध कामांचा प्रस्ताव तयार करून सूर्यवंशी यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून अखेर सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या प्रभागातील कामांना पाच कोटींचा निधी मंजूर झाला, पण हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. पीडब्लूडीने या कामाची निविदाही प्रसिद्ध केली आहे.

महापौरांच्या प्रभागातील कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार असल्याचे बाब उघडकीस आल्याने त्यांचा महापालिकेवर विश्वास नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपच्या हाती आयते कोलीत

गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत महापौरविरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. नुकतेच बचत गटाच्या शेडवरून वाद रंगला होता. अशातच महापौरांनी महापालिकेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रेम दाखविल्याने भाजपच्या हाती आयते कोलीतच मिळाले आहे. यावर महासभेत महापौरांची कोंडी करण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की, प्रभागातील पाच कोटींच्या कामाचा प्रस्ताव तयार करून २०१९ साली शासनाकडे सादर केला होता. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून तीन वर्षे पाठपुरावा केला. सहा महिन्यापूर्वी शासनाने निधी मंजूर केला. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेण्याबाबत शासनाकडून आदेश आहे. शासन निधीतील कामे कोणाकडून करून घ्यायची हा निर्णय नगरविकास विभाग घेत असते. त्यात आपला संबंध नाही. शहरातील दोन्ही आमदारही निधी सार्वजनिक बांधकामकडे देतात. अगदी भाजपच्या सत्ताकाळातही ते महापालिकेकडे निधी वर्ग करीत नव्हते.