शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सांगली :आप आमदारांवरील कारवाई दबावापोटी, सुधीर सावंत, हिटलरप्रमाणे मोदींची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 15:48 IST

सांगली : आम आदमी पक्षाच्या आमदारांवर निवडणूक आयोगाकडून झालेली कारवाई ही भाजप सरकारच्या दबावापोटीच झाली आहे, अशी टीका पक्षाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, संसदीय सचिवपदी नियुक्त्यांची पद्धत ही देशभर सुरू आहे. लाभाचे पद असल्याच्या कारणावरून जर आपच्या आमदारांवर कारवाई होत असेल तर ती अन्य राज्यातील सत्ताधारी भाजप आमदारांवर का होत नाही, असा आमचा मुख्य प्रश्न आयोगाला आहे. यासंदर्भात आम्ही कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देणार आहोत.

ठळक मुद्देकोरेगाव-भीमा दंगलीमागे षडयंत्रआप आमदारांवरील कारवाई दबावापोटी : सुधीर सावंत यांची टीका मोदींची वाटचाल हिटलरप्रमाणे

सांगली : आम आदमी पक्षाच्या आमदारांवर निवडणूक आयोगाकडून झालेली कारवाई ही भाजप सरकारच्या दबावापोटीच झाली आहे, अशी टीका पक्षाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, संसदीय सचिवपदी नियुक्त्यांची पद्धत ही देशभर सुरू आहे. लाभाचे पद असल्याच्या कारणावरून जर आपच्या आमदारांवर कारवाई होत असेल तर ती अन्य राज्यातील सत्ताधारी भाजप आमदारांवर का होत नाही, असा आमचा मुख्य प्रश्न आयोगाला आहे. यासंदर्भात आम्ही कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देणार आहोत.

सरकारचा हस्तक्षेप असल्यानेच आयोगाने केवळ आम आदमी पक्षावर वक्रदृष्टी ठेवली आहे. भाजप सरकारला देशातील सर्वच महत्त्वाच्या यंत्रणा ताब्यात घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे हिटलरने एकेक करीत सर्व संस्था ताब्यात घेऊन शेवटी लष्करही ताब्यात घेतले, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल सुरू झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील बंडसुद्धा याच गोष्टीमुळे झाल्याचा संशय आहे. सरकारचा हस्तक्षेत अशा संस्थांमध्ये होऊ लागल्यानेच लोकशाही धोक्यात आली आहे. हे प्रकार थांबवायचे असतील तर लोकशाही मानणाऱ्या सर्व पक्ष, संघटनांना आणि लोकांना एकत्रीत यायला हवे.

निवडणूक आयोगाने आमदारांच्या अपात्रतेबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे देशात नवीन पायंडा पडला आहे. कोणतीही संस्था आता सरकारपासून अलिप्त राहिली नाही की काय, असा प्रश्न पडत आहे. एकीकडे आपने दिल्लीमध्ये शिक्षणात क्रांतीकारी पाऊल टाकले असताना महाराष्ट्रात शिक्षणाच्या दोऱ्या देशातील बड्या भांडवलदारांच्या हाती देण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

या लोकांना पुरातन काळातील व्यवस्था पुन्हा आणायची आहे. शिक्षणावर ठराविक वर्गाचा अधिकार रहावा, यासाठी हे खेळ सुरू झाले आहेत. त्यामुळे सरकारची ही धोरणे आता सामान्यांच्या लक्षात आली आहेत.भाजपच्या अशाप्रकारच्या पापात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसुद्धा सहभागी आहेत. संविधान बचाव अभियान राबवू पाहणाऱ्या शरद पवारांनीच गेल्या अनेक वर्षात संविधान पायदळी तुडविले.

अजित पवारांना वाचविण्यासाठी त्यांची सध्या धडपड सुरू आहे. त्यामुळे ते सरकारविरोधात फारसे काही करू शकत नाहीत. स्वामीनाथन आयोग त्यांच्या काळात लागू का झाला नाही, याचे त्यांनी उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.

कोरेगाव-भीमा दंगलीमागे षडयंत्रकोरेगाव-भीमा दंगलीमागे निश्चितच सरकारचे षडयंत्र असावे. सरकारला देशभर दंगलीच घडवायच्या आहेत. अशा गोष्टीतून त्यांना स्वार्थ साधायचा आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदी