शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

सांगली :आप आमदारांवरील कारवाई दबावापोटी, सुधीर सावंत, हिटलरप्रमाणे मोदींची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 15:48 IST

सांगली : आम आदमी पक्षाच्या आमदारांवर निवडणूक आयोगाकडून झालेली कारवाई ही भाजप सरकारच्या दबावापोटीच झाली आहे, अशी टीका पक्षाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, संसदीय सचिवपदी नियुक्त्यांची पद्धत ही देशभर सुरू आहे. लाभाचे पद असल्याच्या कारणावरून जर आपच्या आमदारांवर कारवाई होत असेल तर ती अन्य राज्यातील सत्ताधारी भाजप आमदारांवर का होत नाही, असा आमचा मुख्य प्रश्न आयोगाला आहे. यासंदर्भात आम्ही कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देणार आहोत.

ठळक मुद्देकोरेगाव-भीमा दंगलीमागे षडयंत्रआप आमदारांवरील कारवाई दबावापोटी : सुधीर सावंत यांची टीका मोदींची वाटचाल हिटलरप्रमाणे

सांगली : आम आदमी पक्षाच्या आमदारांवर निवडणूक आयोगाकडून झालेली कारवाई ही भाजप सरकारच्या दबावापोटीच झाली आहे, अशी टीका पक्षाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, संसदीय सचिवपदी नियुक्त्यांची पद्धत ही देशभर सुरू आहे. लाभाचे पद असल्याच्या कारणावरून जर आपच्या आमदारांवर कारवाई होत असेल तर ती अन्य राज्यातील सत्ताधारी भाजप आमदारांवर का होत नाही, असा आमचा मुख्य प्रश्न आयोगाला आहे. यासंदर्भात आम्ही कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देणार आहोत.

सरकारचा हस्तक्षेप असल्यानेच आयोगाने केवळ आम आदमी पक्षावर वक्रदृष्टी ठेवली आहे. भाजप सरकारला देशातील सर्वच महत्त्वाच्या यंत्रणा ताब्यात घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे हिटलरने एकेक करीत सर्व संस्था ताब्यात घेऊन शेवटी लष्करही ताब्यात घेतले, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल सुरू झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील बंडसुद्धा याच गोष्टीमुळे झाल्याचा संशय आहे. सरकारचा हस्तक्षेत अशा संस्थांमध्ये होऊ लागल्यानेच लोकशाही धोक्यात आली आहे. हे प्रकार थांबवायचे असतील तर लोकशाही मानणाऱ्या सर्व पक्ष, संघटनांना आणि लोकांना एकत्रीत यायला हवे.

निवडणूक आयोगाने आमदारांच्या अपात्रतेबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे देशात नवीन पायंडा पडला आहे. कोणतीही संस्था आता सरकारपासून अलिप्त राहिली नाही की काय, असा प्रश्न पडत आहे. एकीकडे आपने दिल्लीमध्ये शिक्षणात क्रांतीकारी पाऊल टाकले असताना महाराष्ट्रात शिक्षणाच्या दोऱ्या देशातील बड्या भांडवलदारांच्या हाती देण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

या लोकांना पुरातन काळातील व्यवस्था पुन्हा आणायची आहे. शिक्षणावर ठराविक वर्गाचा अधिकार रहावा, यासाठी हे खेळ सुरू झाले आहेत. त्यामुळे सरकारची ही धोरणे आता सामान्यांच्या लक्षात आली आहेत.भाजपच्या अशाप्रकारच्या पापात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसुद्धा सहभागी आहेत. संविधान बचाव अभियान राबवू पाहणाऱ्या शरद पवारांनीच गेल्या अनेक वर्षात संविधान पायदळी तुडविले.

अजित पवारांना वाचविण्यासाठी त्यांची सध्या धडपड सुरू आहे. त्यामुळे ते सरकारविरोधात फारसे काही करू शकत नाहीत. स्वामीनाथन आयोग त्यांच्या काळात लागू का झाला नाही, याचे त्यांनी उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.

कोरेगाव-भीमा दंगलीमागे षडयंत्रकोरेगाव-भीमा दंगलीमागे निश्चितच सरकारचे षडयंत्र असावे. सरकारला देशभर दंगलीच घडवायच्या आहेत. अशा गोष्टीतून त्यांना स्वार्थ साधायचा आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदी