शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :आप आमदारांवरील कारवाई दबावापोटी, सुधीर सावंत, हिटलरप्रमाणे मोदींची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 15:48 IST

सांगली : आम आदमी पक्षाच्या आमदारांवर निवडणूक आयोगाकडून झालेली कारवाई ही भाजप सरकारच्या दबावापोटीच झाली आहे, अशी टीका पक्षाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, संसदीय सचिवपदी नियुक्त्यांची पद्धत ही देशभर सुरू आहे. लाभाचे पद असल्याच्या कारणावरून जर आपच्या आमदारांवर कारवाई होत असेल तर ती अन्य राज्यातील सत्ताधारी भाजप आमदारांवर का होत नाही, असा आमचा मुख्य प्रश्न आयोगाला आहे. यासंदर्भात आम्ही कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देणार आहोत.

ठळक मुद्देकोरेगाव-भीमा दंगलीमागे षडयंत्रआप आमदारांवरील कारवाई दबावापोटी : सुधीर सावंत यांची टीका मोदींची वाटचाल हिटलरप्रमाणे

सांगली : आम आदमी पक्षाच्या आमदारांवर निवडणूक आयोगाकडून झालेली कारवाई ही भाजप सरकारच्या दबावापोटीच झाली आहे, अशी टीका पक्षाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, संसदीय सचिवपदी नियुक्त्यांची पद्धत ही देशभर सुरू आहे. लाभाचे पद असल्याच्या कारणावरून जर आपच्या आमदारांवर कारवाई होत असेल तर ती अन्य राज्यातील सत्ताधारी भाजप आमदारांवर का होत नाही, असा आमचा मुख्य प्रश्न आयोगाला आहे. यासंदर्भात आम्ही कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देणार आहोत.

सरकारचा हस्तक्षेप असल्यानेच आयोगाने केवळ आम आदमी पक्षावर वक्रदृष्टी ठेवली आहे. भाजप सरकारला देशातील सर्वच महत्त्वाच्या यंत्रणा ताब्यात घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे हिटलरने एकेक करीत सर्व संस्था ताब्यात घेऊन शेवटी लष्करही ताब्यात घेतले, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल सुरू झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील बंडसुद्धा याच गोष्टीमुळे झाल्याचा संशय आहे. सरकारचा हस्तक्षेत अशा संस्थांमध्ये होऊ लागल्यानेच लोकशाही धोक्यात आली आहे. हे प्रकार थांबवायचे असतील तर लोकशाही मानणाऱ्या सर्व पक्ष, संघटनांना आणि लोकांना एकत्रीत यायला हवे.

निवडणूक आयोगाने आमदारांच्या अपात्रतेबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे देशात नवीन पायंडा पडला आहे. कोणतीही संस्था आता सरकारपासून अलिप्त राहिली नाही की काय, असा प्रश्न पडत आहे. एकीकडे आपने दिल्लीमध्ये शिक्षणात क्रांतीकारी पाऊल टाकले असताना महाराष्ट्रात शिक्षणाच्या दोऱ्या देशातील बड्या भांडवलदारांच्या हाती देण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

या लोकांना पुरातन काळातील व्यवस्था पुन्हा आणायची आहे. शिक्षणावर ठराविक वर्गाचा अधिकार रहावा, यासाठी हे खेळ सुरू झाले आहेत. त्यामुळे सरकारची ही धोरणे आता सामान्यांच्या लक्षात आली आहेत.भाजपच्या अशाप्रकारच्या पापात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसुद्धा सहभागी आहेत. संविधान बचाव अभियान राबवू पाहणाऱ्या शरद पवारांनीच गेल्या अनेक वर्षात संविधान पायदळी तुडविले.

अजित पवारांना वाचविण्यासाठी त्यांची सध्या धडपड सुरू आहे. त्यामुळे ते सरकारविरोधात फारसे काही करू शकत नाहीत. स्वामीनाथन आयोग त्यांच्या काळात लागू का झाला नाही, याचे त्यांनी उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.

कोरेगाव-भीमा दंगलीमागे षडयंत्रकोरेगाव-भीमा दंगलीमागे निश्चितच सरकारचे षडयंत्र असावे. सरकारला देशभर दंगलीच घडवायच्या आहेत. अशा गोष्टीतून त्यांना स्वार्थ साधायचा आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदी