शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

सांगली : सटवाजीराजे डफळे यांचे स्मारक उजेडात, डफळापुरात समाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 13:08 IST

शिवकालीन सरदार आणि जत जहागीरीचे मूळ संस्थापक सटवाजीराजे डफळे यांची डफळापूर (ता. जत) येथील समाधी उजेडात आली आहे. या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी केला आहे.

ठळक मुद्देसटवाजीराजे डफळे यांचे स्मारक उजेडात, डफळापुरात समाधीडफळे व गायकवाड कुटुंबियांकडून जीर्णोद्धाराचा संकल्प

जत : शिवकालीन सरदार आणि जत जहागीरीचे मूळ संस्थापक सटवाजीराजे डफळे यांची डफळापूर (ता. जत) येथील समाधी उजेडात आली आहे. उमराणी (ता. जत) येथील जहागीरदार अमरसिंहराजे डफळे यांच्या प्रयत्नातून व इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर (मिरज) यांच्या अभ्यासातून या शूर योध्याच्या स्मृतीस्थळाला उजाळा मिळाला आहे. या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी केला आहे.शिवकाळातील प्रसिद्ध योध्दे सटवाजीराजे डफळे यांची समाधी डफळापूर येथील सुभाषराव गायकवाड यांच्या शेतात असल्याची माहिती उमराणीचे जहागीरदार अमरसिंह डफळे यांना मिळाली. त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन माहिती घेतली.

मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनीही या समाधीस्थळाचा अभ्यास केला. बांधकाम शैली आणि भव्यता पाहून ही प्रसिद्ध व्यक्तीचीच समाधी असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. घराण्यातील अन्य व्यक्तींचा अभ्यास केला असता, ही समाधी सटवाजीराजे डफळे यांचीच असल्याची खात्री झाली आहे.डफळापूरच्या उत्तर बाजूस बेळुंखी रस्त्यालगत गावात प्रवेश करताना सुभाषराव गायकवाड यांच्या शेतात ही समाधी आहे. गायकवाड घराणे हे डफळे घराण्याचे नजीकचे आप्त आहेत. त्यांनी आजवर या समाधीचे जतन करून ठेवले आहे. या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची संकल्पना डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी मांडली. त्यानुसार एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करुन समाधीच्या सभोवताली असणारी काटेरी झुडपे काढण्यात आली. त्यामुळे आता हा परिसर स्वच्छ दिसत आहे.

या कार्यक्रमासाठी अमरसिंह डफळे, सुभाषराव गायकवाड, रमेश गायकवाड, सुरेशराव डफळे, विक्रमसिंह डफळे, बाळासाहेब गायकवाड, धैर्यशीलराव डफळे, संग्रामसिंह डफळे, राहुल डफळे, खर्डेकर सरकार, अमरसिंह इंगोले, बाप्पासाहेब डफळे, जयवंतराव डफळे, मोहनराव गायकवाड, रमेश शिंदे, वसंतराव चव्हाण, परशुराम चव्हाण उपस्थित होते.पराक्रमी सटवाजीराजेसटवाजीराजे डफळे हे पराक्रमी योध्दे होते. अदिलशहाने त्यांना जत, करजगी आणि कर्नाटकातील होनवाड, बारडोल या चार गावांचे देशमुखी वतन दिले होते. त्या काळातील अनेक लढायात त्यांनी पराक्रम गाजवला होता. मोगल काळातही त्यांना नवीन वतने मिळाली होती. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या.

टॅग्स :cultureसांस्कृतिकSangliसांगली