शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सांगलीत मदनभाऊ महाकरंडक एकांकिका स्पर्धा 14 आॅक्टोबरपासून, 25 संघांची होणार निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 17:12 IST

तब्बल एक लाख रुपयांचे पहिले पारितोषिक असलेल्या मदनभाऊ पाटील महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला १४ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेसाठी राज्यभरातील २५ संघांची निवड केली जाणार आहे.

सांगली, दि. 19 - तब्बल एक लाख रुपयांचे पहिले पारितोषिक असलेल्या मदनभाऊ पाटील महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला १४ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेसाठी राज्यभरातील २५ संघांची निवड केली जाणार आहे. विजेत्यांना तब्बल तीन लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून, प्रथम विजेत्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणारी ही राज्यातील पहिलीच स्पर्धा असल्याचे महापौर हारुण शिकलगार व स्पर्धेचे कार्याध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत सांगितले. महापालिकेच्यावतीने मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात १४ ते १६ आॅक्टोबर असे तीन दिवस या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी आॅनलाईन प्रवेशिका मागविण्यात आल्या असून, १ आॅक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. स्पर्धेत निमंत्रित २५ संघांनाच प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील हौशी नाट्यसंस्था, महाविद्यालये यांचा मागील तीन वर्षांच्या इतर राज्य एकांकिका स्पर्धेतील सहभाग व इतर अटींची पूर्तता करणाºया संघांना स्पर्धेत सहभागी करून घेतले जाईल. स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला एक लाख रुपये व मानाचा मदनभाऊ महाकरंडक देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये व करंडक, तृतीय क्रमांकास २५ हजार रुपये व करंडक, तर उत्तेजनार्थ दोन संघांना दहा हजार रुपये व करंडक बक्षीस देण्यात येईल. सांगली जिल्ह्यातील संस्थांनाही या स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी जिल्हास्तरीय फेरी घेण्यात येणार आहे. जिल्हा प्राथमिक फेरी १ आॅक्टोबर रोजी होत आहे. या फेरीतून जिल्ह्यातील संघाची अंतिम स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील संस्थांना २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. गतवर्षीपासून माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. एक लाखाचे पारितोषिक देणारी ही राज्यातील पहिली व एकमेव स्पर्धा आहे. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. गतवर्षी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. राज्यातील एकूण १२३ संघांनी नोंदणी केली होती. स्पर्धा संयोजन समितीने त्यातील २६ संघांची स्पर्धेसाठी अंतिम निवड केली होती. या स्पर्धेसाठी मुंबई, कोल्हापूर, डोंबिवली, पुणे, नागपूर, सोलापूर, कुडाळ, जळगाव, अमरावती, औरंगाबाद, महाड, गोवा, कल्याण येथील संघांनी भाग घेतला होता. यंदाही राज्यभरातून संघ स्पर्धेत सहभागी होतील, असा विश्वास महापौर शिकलगार यांनी व्यक्त केला. या स्पर्धेचे संयोजन शफी नायकवडी, राजेंद्र पोळ, विनायक केळकर, मुकुंद पटवर्धन, अरुण दांडेकर, विजय कडणे, चंद्रकांत धामणीकर, डॉ. विलास कुलकर्णी, मारुती नवलाई, मंगेश येडूरकर, अंजली भिडे, मनीषा काळे करीत आहेत.