शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सांगली-कोल्हापूर चौकशीच्या ‘रडार’वरच! मिरजेतही चौकशी; ‘एटीएस’चे पथक तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:24 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सांगली अजूनही चौकशीच्या ‘रडार’वरच आहे. राज्य दहशतवादविरोधी पथक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहे. पथकाने शुक्रवारी

ठळक मुद्देसांगलीचे ‘कनेक्शन’

सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सांगली अजूनही चौकशीच्या ‘रडार’वरच आहे. राज्य दहशतवादविरोधी पथक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहे. पथकाने शुक्रवारी मिरजेतही चौकशी केली. महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. पण तपासाच्यादृष्टीने कमालीची गोपनीयता बाळगली आहे.

मुंबईतील नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून एटीएसच्या पथकाला दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे यास अटक करण्यात यश आले. सध्या शस्त्रसाठा व दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित अटकेत आहेत. त्यांची स्वतंत्रपणे चौकशी सुरु आहे. या चौकशीतून राज्यभरातील अनेक संशयितांची नावे पुढे येत आहेत. यातील काही संशयित सांगली, मिरज व तासगाव येथील असल्याचे पुढे आले आहे.

याशिवाय कोल्हापूरही ‘कनेक्शन’ मिळाले आहे. त्यामुळे दोन दिवसापूर्वी एटीएसचे पथक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आले आहे. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपासाला दिशा दिली आहे. स्थानिक पोलीस अधिकारी प्रसारमाध्यमांपासून दूर राहिले आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात काय कारवाई केली जात आहे, याचा तपशील मिळू शकत नाही.

पथकाने गुरुवारी जिल्ह्यातील काही पुरोगामी नेत्यांशी संपर्क साधला. त्यानंतर तासगाव येथून दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांना अजूनही सोडलेले नाही. पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पुरोगामी नेत्यांची नावे, त्यांचे आतापर्यंच्या चळवळीतील योगदान, याची सर्व माहिती पथकाने संकलित केली आहे. या नेत्यांना पोलीस संरक्षण घेतल्याशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. यावरुन सांगली जिल्ह्यात या तपासाची पाळेमुळे खोलवर रुजली असण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पथकाने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात चौकशी केली. मिरजेत एका वादग्रस्त संस्थेचे वसतिगृह असल्याने, त्याअनुषंगाने चौकशी केली. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा उलगडा करण्यासाठीही सांगलीला चौकशीच्या ‘रडार’वर ठेवले आहे.सांगलीचे ‘कनेक्शन’गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोट, कोल्हापुरातील ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांची हत्या आणि नालासोपारा येथून जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा, या तीनही वेगवेगळ्या घटनांचे पुन्हा सांगली ‘कनेक्शन’ असल्याचे उघड झाले आहे. या घटनांचा छडा लावण्यासाठी एटीएस, एनआयए व स्थानिक पथक धडपडत आहे. परंतु अनेक संशयित गायब असल्याने या घटनांचे गूढ अजूनही कायम आहे.