शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

सांगली कारागृह कैद्यांनी खचाखच

By admin | Updated: July 23, 2016 00:08 IST

क्षमता ओलांडली; ४०१ कैदी; ३५० पेक्षा जादा ठेवण्यास असमर्थता; महानिरीक्षकांना प्रस्ताव

सांगली : सांगली जिल्हा कारागृहात कैद्यांची क्षमता ओलांडली आहे. २३५ क्षमता असलेल्या कारागृहात ४०१ कैदी आहेत. यामध्ये ३८३ पुरुष व १८ महिलांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कैद्यांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या कैद्यांना ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आहे. साडेतीनशेपेक्षा जादा कैदी येथे ठेवणे धोकादायक बनले असून, त्यांना कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलविण्यात यावे, असा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांना सादर केला आहे.जिल्हा कारागृह संस्थानकालीन आहे. २०५ पुरुष व ३० महिला असे २३५ कैदी ठेवण्याची क्षमता असलेले हे कारागृह आहे. पण गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याने कैद्यांची संख्या वेगाने वाढत गेली. सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहाच्या १८२ मीटर परिसरात नवीन इमारत बांधण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण यापूर्वी टोलेजंग इमारती बांधल्या गेल्या आहेत. कारागृहाच्या सभोवताली इमारती आहेत. पटवर्धन हायस्कूलची इमारत कारागृहाला लागून आहे. हायस्कूलच्या छतावरुन तसेच परिसरातील इमारतींवरुन कारागृहात काय सुरु आहे, हे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे कैद्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी गतवर्षी कारागृहाची पाहणी करुन सुरक्षेचा आढावा घेतला होता. त्यांना सुरक्षेत मोठ्या प्रमाणात त्रुटी दिसून आल्याने त्यांनी कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाच्या जागेवर स्थलांतर करण्याची सूचना केली होती.तत्कालीन अधीक्षक एम. एस. पवार यांनी शासनाला कवलापूरच्या जागेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. पण शासनाकडून पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सध्याचे अधीक्षक सुशील कुंभार, तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे हे जागेसाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना अजूनही यश आलेले नाही. जागेच्याबाबतीत शासनाची उदासीन भूमिका असल्याने कारागृह प्रशासनाने साडेतीनशेपेक्षा जादा कैदी ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे. शुक्रवारी तब्बल ४०१ कैदी होते. त्यांना ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आहे. चार बरॅक आहेत. प्रत्येक बऱ्याकमध्ये ५० कैदी ठेवले जातात. आताच्या स्थितीला प्रत्येक बऱ्याकमध्ये ११० ते ११५ कैदी ठेवावे लागत आहेत. ३५० कैदी ठेवण्याची व्यवस्था आहे. पण त्यापेक्षा जादा असणारे कैदी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलवावेत, असा प्रस्ताव कारागृह महानिरीक्षकांना सादर केला आहे. (प्रतिनिधी)गुन्हे गंभीर : जामीन नाकारलाखुनातील १७९ कैदी आहेत. यामध्ये १७४ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. याशिवाय बलात्कार, बेकायदा हत्यार बाळगणे, दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील १५५ कैदी आहेत. साधारपणे ३३४ कैदी गंभीर गुन्ह्यातील आहेत. न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला आहे. तसेच शिक्षा झालेले चार कैदी आहेत. त्यामुळे त्यांना येथे बंदिस्त ठेवावेच लागत आहेत. त्यामुळेच प्रशासनाने ३५० पेक्षा जादा कैदी ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे. ३० कैद्यांना : कळंब्याला हलविलेकारागृहात कैद्यांना ठेवायला जागा नसल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ३० कैद्यांना गेल्या आठवड्यात कळंबा कारागृहात हलविण्यात आले आहे. संजयनगरमधील मनोज कदम खुनातील गुंड म्हमद्या नदाफसह २६ कैद्यांना यापूर्वीच पुण्यातील येरवडा येथे, तसेच गोकुळनगरमधील रवींद्र कांबळे खुनातील दुर्गेश पवारसह १२ कैद्यांना कळंबा कारागृहात हलविले आहे. सध्या या दोन टोळ्या व हलविलेले ३० कैदी, असे ६८ कैदी येथे राहिले असते, तर कैद्यांचा आकडा ४६९ च्या घरात गेला असता. विशेष बऱ्याक उघडल्या!कारागृहात विशेष बऱ्याकच्या पाच कोठड्या आहेत. प्रत्येक कोठडीत तीन कैद्यांना ठेवता येऊ शकते. मोठ्या बऱ्याकमध्ये ठेवण्यास जागा नसल्याने शुक्रवारी प्रशासनाने विशेष बऱ्याक उघडून स्वच्छता सुरु ठेवली आहे. यामध्ये २५ कैद्यांना ठेवण्याची सोय करण्यात आली आहे.