शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
2
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
3
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
4
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
5
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
6
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
7
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
8
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
9
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
10
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
11
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
12
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
13
Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?
14
टीम इंडियाविरुद्ध चुलत भाऊ कॅप्टन झाला; दुसरीकडे संधी मिळेना म्हणून स्टार ऑलराउंडरनं क्रिकेट सोडलं
15
Health Tips: गुडघेदुखीने त्रस्त आहात? मग 'रिव्हर्स वॉकिंग' करून पहा; २ मिनिटांत मिळेल आराम!
16
भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता
17
FD-RD काहीच नाही! एलआयसीच्या 'या' योजनेत २४३ रुपयांची गुंतवणूक करा, मिळेल ५४ लाखांचा फंड
18
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
19
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
20
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली कारागृह कैद्यांनी खचाखच

By admin | Updated: July 23, 2016 00:08 IST

क्षमता ओलांडली; ४०१ कैदी; ३५० पेक्षा जादा ठेवण्यास असमर्थता; महानिरीक्षकांना प्रस्ताव

सांगली : सांगली जिल्हा कारागृहात कैद्यांची क्षमता ओलांडली आहे. २३५ क्षमता असलेल्या कारागृहात ४०१ कैदी आहेत. यामध्ये ३८३ पुरुष व १८ महिलांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कैद्यांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या कैद्यांना ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आहे. साडेतीनशेपेक्षा जादा कैदी येथे ठेवणे धोकादायक बनले असून, त्यांना कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलविण्यात यावे, असा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांना सादर केला आहे.जिल्हा कारागृह संस्थानकालीन आहे. २०५ पुरुष व ३० महिला असे २३५ कैदी ठेवण्याची क्षमता असलेले हे कारागृह आहे. पण गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याने कैद्यांची संख्या वेगाने वाढत गेली. सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहाच्या १८२ मीटर परिसरात नवीन इमारत बांधण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण यापूर्वी टोलेजंग इमारती बांधल्या गेल्या आहेत. कारागृहाच्या सभोवताली इमारती आहेत. पटवर्धन हायस्कूलची इमारत कारागृहाला लागून आहे. हायस्कूलच्या छतावरुन तसेच परिसरातील इमारतींवरुन कारागृहात काय सुरु आहे, हे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे कैद्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी गतवर्षी कारागृहाची पाहणी करुन सुरक्षेचा आढावा घेतला होता. त्यांना सुरक्षेत मोठ्या प्रमाणात त्रुटी दिसून आल्याने त्यांनी कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाच्या जागेवर स्थलांतर करण्याची सूचना केली होती.तत्कालीन अधीक्षक एम. एस. पवार यांनी शासनाला कवलापूरच्या जागेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. पण शासनाकडून पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सध्याचे अधीक्षक सुशील कुंभार, तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे हे जागेसाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना अजूनही यश आलेले नाही. जागेच्याबाबतीत शासनाची उदासीन भूमिका असल्याने कारागृह प्रशासनाने साडेतीनशेपेक्षा जादा कैदी ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे. शुक्रवारी तब्बल ४०१ कैदी होते. त्यांना ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आहे. चार बरॅक आहेत. प्रत्येक बऱ्याकमध्ये ५० कैदी ठेवले जातात. आताच्या स्थितीला प्रत्येक बऱ्याकमध्ये ११० ते ११५ कैदी ठेवावे लागत आहेत. ३५० कैदी ठेवण्याची व्यवस्था आहे. पण त्यापेक्षा जादा असणारे कैदी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलवावेत, असा प्रस्ताव कारागृह महानिरीक्षकांना सादर केला आहे. (प्रतिनिधी)गुन्हे गंभीर : जामीन नाकारलाखुनातील १७९ कैदी आहेत. यामध्ये १७४ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. याशिवाय बलात्कार, बेकायदा हत्यार बाळगणे, दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील १५५ कैदी आहेत. साधारपणे ३३४ कैदी गंभीर गुन्ह्यातील आहेत. न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला आहे. तसेच शिक्षा झालेले चार कैदी आहेत. त्यामुळे त्यांना येथे बंदिस्त ठेवावेच लागत आहेत. त्यामुळेच प्रशासनाने ३५० पेक्षा जादा कैदी ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे. ३० कैद्यांना : कळंब्याला हलविलेकारागृहात कैद्यांना ठेवायला जागा नसल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ३० कैद्यांना गेल्या आठवड्यात कळंबा कारागृहात हलविण्यात आले आहे. संजयनगरमधील मनोज कदम खुनातील गुंड म्हमद्या नदाफसह २६ कैद्यांना यापूर्वीच पुण्यातील येरवडा येथे, तसेच गोकुळनगरमधील रवींद्र कांबळे खुनातील दुर्गेश पवारसह १२ कैद्यांना कळंबा कारागृहात हलविले आहे. सध्या या दोन टोळ्या व हलविलेले ३० कैदी, असे ६८ कैदी येथे राहिले असते, तर कैद्यांचा आकडा ४६९ च्या घरात गेला असता. विशेष बऱ्याक उघडल्या!कारागृहात विशेष बऱ्याकच्या पाच कोठड्या आहेत. प्रत्येक कोठडीत तीन कैद्यांना ठेवता येऊ शकते. मोठ्या बऱ्याकमध्ये ठेवण्यास जागा नसल्याने शुक्रवारी प्रशासनाने विशेष बऱ्याक उघडून स्वच्छता सुरु ठेवली आहे. यामध्ये २५ कैद्यांना ठेवण्याची सोय करण्यात आली आहे.