कोल्हापूर : करिअरची दिशा ठरविणार्या बारावीचा निकाल आज, सोमवारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा यावर्षीचा निकाल ९१.५४ टक्के लागला. यात ९२.२० टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला. सातारा जिल्ह्याने ९१.२६ टक्क्यांसह दुसरा क्रमांक मिळविला, तर गेल्या वर्षी विभागात प्रथम असलेल्या सांगली जिल्ह्याची घसरण होऊन तो ९०.९१ टक्क्यांसह तिसर्या क्रमांकावर राहिला. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के होता. त्या तुलनेत यंदा ७.४० टक्क्यांनी निकाल वाढला आहे. आज दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष भीमराव कांबळे आणि सचिव शरद गोसावी यांनी येथे पत्रकार परिषदेत विभागाचा निकाल जाहीर केला. कोल्हापूर विभागातून ५८३ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख १४ हजार ६०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४ हजार ९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी एकूण ६३ हजार ८३५ मुले, तर ५० हजार ७६८ मुली बसल्या होत्या. मुलांची उत्तीर्णतेची संख्या ५६ हजार ५० असून, त्यांचे प्रमाण ८७.८० टक्के इतके आहे, तर मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ४८ हजार ८५६ असून, त्यांचे प्रमाण ९६.२३ टक्के इतके आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने ८.४३ टक्के इतके अधिक आहे. सलग तिसर्या वर्षी मुलींची उत्तीर्णतेच्या प्रमाणात सरशी राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून २२० कनिष्ठ महाविद्यालयांतून ४६ हजार २५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जिल्ह्याचा निकाल ९०.९१ टक्के सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील २९ हजार ७३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्णाचा निकाल ९०.९१ टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या ९६.१६ टक्के आहे. विशेष प्राविण्यामध्ये एक हजार ३३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वीस कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सोमवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन निकाल घोषित होताच विद्यार्थी आणि पालकांची निकाल पहाण्यासाठी झुंबड उढाली होती. जिल्ह्यातून ३२ हजार ७०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी २९ हजार ७३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये १३ हजार ९०५ मुली आहेत. निकालात मुलीच अव्वल ठरल्या. विशेष प्राविण्य मिळविलेल्यांमध्ये एक हजार ३३८ विद्यार्थी असून, प्रथम श्रेणीत दहा हजार ९६ विद्यार्थी आहेत. द्वितीय श्रेणीत १६ हजार ८९०, तर पास ग्रेडमध्ये एक हजार ४०९ विद्यार्थी आहेत.
विभागात सांगली तृतीय
By admin | Updated: June 3, 2014 01:23 IST