शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

विभागात सांगली तृतीय

By admin | Updated: June 3, 2014 01:23 IST

बारावी निकाल : सलग तिसर्‍या वर्षी मुलींची सरशी

कोल्हापूर : करिअरची दिशा ठरविणार्‍या बारावीचा निकाल आज, सोमवारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा यावर्षीचा निकाल ९१.५४ टक्के लागला. यात ९२.२० टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला. सातारा जिल्ह्याने ९१.२६ टक्क्यांसह दुसरा क्रमांक मिळविला, तर गेल्या वर्षी विभागात प्रथम असलेल्या सांगली जिल्ह्याची घसरण होऊन तो ९०.९१ टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर राहिला. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के होता. त्या तुलनेत यंदा ७.४० टक्क्यांनी निकाल वाढला आहे. आज दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष भीमराव कांबळे आणि सचिव शरद गोसावी यांनी येथे पत्रकार परिषदेत विभागाचा निकाल जाहीर केला. कोल्हापूर विभागातून ५८३ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख १४ हजार ६०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४ हजार ९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी एकूण ६३ हजार ८३५ मुले, तर ५० हजार ७६८ मुली बसल्या होत्या. मुलांची उत्तीर्णतेची संख्या ५६ हजार ५० असून, त्यांचे प्रमाण ८७.८० टक्के इतके आहे, तर मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ४८ हजार ८५६ असून, त्यांचे प्रमाण ९६.२३ टक्के इतके आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने ८.४३ टक्के इतके अधिक आहे. सलग तिसर्‍या वर्षी मुलींची उत्तीर्णतेच्या प्रमाणात सरशी राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून २२० कनिष्ठ महाविद्यालयांतून ४६ हजार २५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जिल्ह्याचा निकाल ९०.९१ टक्के सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील २९ हजार ७३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्णाचा निकाल ९०.९१ टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या ९६.१६ टक्के आहे. विशेष प्राविण्यामध्ये एक हजार ३३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वीस कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सोमवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन निकाल घोषित होताच विद्यार्थी आणि पालकांची निकाल पहाण्यासाठी झुंबड उढाली होती. जिल्ह्यातून ३२ हजार ७०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी २९ हजार ७३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये १३ हजार ९०५ मुली आहेत. निकालात मुलीच अव्वल ठरल्या. विशेष प्राविण्य मिळविलेल्यांमध्ये एक हजार ३३८ विद्यार्थी असून, प्रथम श्रेणीत दहा हजार ९६ विद्यार्थी आहेत. द्वितीय श्रेणीत १६ हजार ८९०, तर पास ग्रेडमध्ये एक हजार ४०९ विद्यार्थी आहेत.