शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सांगलीत ‘वसंतदादा’समोर गुरुवारपासून ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:30 IST

सांगली : दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाने वसंतदादा साखर कारखान्यातील दि. १ जुलैपूर्वीची कुठलीही देणी आम्ही देणे लागत नाही,

ठळक मुद्देबैठकीत निर्णय : ‘दत्त इंडिया’ विरुध्द सेवानिवृत्त कामगार आक्रमक हे आंदोलन वाढवण्याचा प्रयत्न केल्यास सेवेतील कामगारही संपात व्यवस्थापनाने चुकीची भूमिका घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन

सांगली : दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाने वसंतदादा साखर कारखान्यातील दि. १ जुलैपूर्वीची कुठलीही देणी आम्ही देणे लागत नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सेवानिवृत्त कामगार शनिवारी संतप्त झाले. देणे लागत नाही, तर वसंतदादा कारखान्याचा बॉयलर आणि यंत्रसामग्री का वापरता, असे विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर कामगारांनी दि. ९ नोव्हेंबरपासून दत्त इंडिया कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या मारण्याचा निर्णय घेतला.

वसंतदादा कारखान्यातील सुमारे सातशे सेवानिवृत्त कामगारांचा थकीत फंड आणि ग्रॅच्युईटीच्या प्रश्नावर येथील कामगार भवनमध्ये शनिवारी बैठक झाली. बैठकीस अ‍ॅड. के. डी. शिंदे, श्रीकांत देसाई, घनशाम पाटील, विष्णू माळी, विलास पाटील, प्रदीप शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नांवर प्राथमिक चर्चा झाल्यानंतर सर्व कामगार वसंतदादा कारखाना चालवण्यास घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीच्या मुख्य गेटजवळ गेले. तेथे कामगारांनी ‘देणी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘सेवानिवृत्त कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी दत्त इंडिया कंपनीच्या प्रशासनाने सांगितले की, आम्ही जिल्हा बँकेशी करार केला असून, त्यामध्ये दि. १ जुलै २०१७ पूर्वीची कोणतीही देणी देणे लागत नाही.

व्यवस्थापनाने कामगारांसमोर करारपत्रच ठेवले. व्यवस्थापनाच्या भूमिकेमुळे सेवानिवृत्त कामगार आणखी संतप्त झाले. दि. १ जुलैपूर्वीची तुम्ही काही देणी देणार नसाल तर, कारखान्याचा बॉयलर आणि यंत्रसामग्री तुम्ही कशासाठी वापरता? कारखान्याकडून आम्हाला आमच्या हक्काची देणी मिळाली पाहिजेत, यासाठी आमचा लढा चालू आहे. व्यवस्थापनाने चुकीची भूमिका घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड के. डी. शिंदे यांनी दिला.कामगारांचा आक्रमक पवित्रा पाहून दत्त इंडियाच्या व्यवस्थापनाने लवचिक भूमिका घेतली. कारखान्यामध्ये पुन्हा बैठक झाली. यावेळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू, उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, सेवानिवृत्त कामगारांचे प्रतिनिधी अ‍ॅड. शिंदे, प्रदीप शिंदे आदी उपस्थित होते. व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांची वेळ घेऊन बैठक घेण्यात येईल. बैठकीत जो निर्णय होईल, त्यानुसार कामगारांची देणी दिली जातील, असे आश्वासन दिले.

दत्त इंडिया कंपनीने थकीत देण्याचा चेंडू जिल्हा बँकेच्या कोर्टात टोलविल्यामुळे सेवानिवृत्त कामगार आक्रमक झाले आहेत. दत्त इंडिया आणि जिल्हा बँक काय निर्णय घ्यायचे ते घेऊ देत, आम्ही दि. ९ नोव्हेंबरपासून दत्त इंडियाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या मारणार आहोत. देणी दिल्याशिवाय हलणार नाही. हे आंदोलन वाढवण्याचा प्रयत्न केल्यास सेवेतील कामगारही संपात उतरतील, असा इशारा अ‍ॅड. के. डी. शिंदे आणि कामगार युनियनच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.थकीत देणी एकरकमीच पाहिजेतसेवानिवृत्त कामगारांची देणी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे एकाचवेळी ही देणी न देता अन्य देणेकºयांप्रमाणे टप्प्या-टप्प्याने ती देण्याबाबतची चर्चा झाली. दहा टप्पे पाडून देण्यावर दत्त इंडिया कंपनीचे प्रशासन तयार आहे. पण, सेवानिवृत्त कामगारांनी त्यास तीव्र विरोध करून थकीत देणी एकरकमीच मिळाली पाहिजेत, अशी ठोस भूमिका घेतली आहे, अशी माहिती अ‍ॅड. शिंदे यांनी दिली.

टॅग्स :StrikeसंपOrder orderआदेश केणे