शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : सभागृहात डमरू वाजवायला गेला आहात काय? : हार्दिक पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 19:12 IST

विटा : महाराष्ट्रातील भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन पाळले नसून, सरकार वेळकाढूपणा करीत आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक ...

ठळक मुद्देप्रत्येक राज्यात समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण द्याकेवळ विरोधी पक्षानेच आवाज उठविला पाहिजे असे नाही

विटा : महाराष्ट्रातील भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन पाळले नसून, सरकार वेळकाढूपणा करीत आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येत नसेल, तर तुम्ही सभागृहात डमरू वाजवायला गेला आहात काय? महाराष्टÑातील भाजप सरकार जुमलेबाजीतच अडकल्याची टीका गुजरात येथील पाटीदार समाज आरक्षण आंदोलनाचे प्रणेते हार्दिक पटेल यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

धनगर समाजाच्या महामेळाव्यासाठी हार्दिक पटेल विटामार्गे आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) गावाकडे रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधून आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले की, धनगर समाजाला यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा थोर वारसा आहे. मात्र, या समाजावर अन्याय होत आहे. प्रत्येक राज्यात समाजाला लोकसंख्येनुसार शिक्षण, नोकरी व राजकीय आरक्षण दिले पाहिजे. परंतु, लोकसंख्येवर आरक्षण दिले तरी, प्रत्येक समाजात कष्ट घेणाºयांच्या गुणवत्तेला न्याय मिळाला पाहिजे. कोणताही समाज जोपर्यंत शैक्षणिक प्रगती करीत नाही आणि घटनात्मक पध्दतीने मजबूत होत नाही, तोपर्यंत  देशाची प्रगती होणार नाही.

सरकारने लोकसंख्येनुसार आरक्षण दिले नाही तर, जो समाज पाठीमागे आहे, तो जास्तच मागे राहणार आहे. ज्या समाजाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भागीदारी मिळणार नाही, त्याला तुम्ही जास्तच मागे फेकून देणार आहात काय? नेत्याच्या मुलानेच नेतेगिरी करावी काय? जिल्हाधिकाºयाचा मुलगाच जिल्हाधिकारी होणार काय? पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, असे कोठे लिहिले आहे?  लोकांनी तुम्हाला विश्वासाने सत्तेवर बसविले असताना, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येत नसेल, तर तुम्ही सभागृहात डमरू वाजवायला गेला आहात काय? असे अनेक सवालही यावेळी पटेल यांनी केले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन पाळले नसून, धनगर आणि धनगड शब्दांचा खेळ करून सरकार वेळकाढूपणा करीत आहे. महाराष्टÑातील भाजप सरकार जुमलेबाजीतच अडकले आहे. यावेळी धनगर समाज आरक्षण आंदोलनाचे नेते गोपीचंद पडळकर, उद्योजक शरद बाबर उपस्थित होते.

जनतेनेही रस्त्यावर उतरावेआपला देश घटनेवर चालतो. आरक्षण दिल्यानंतर प्रगती का होत नाही, याचा विचार सरकारने केला पाहिजे. गरिबांना सुविधा देण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे जेथे समाजावर अन्याय होत असेल, तेथे केवळ विरोधी पक्षानेच आवाज उठविला पाहिजे असे नाही. आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी आता जनतेनेही रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी हार्दिक पटेल यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BJPभाजपाhardik patelहार्दिक पटेल