शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

सांगली---साठ हजारातच विजयाचा गुलाल!

By admin | Updated: October 5, 2014 23:03 IST

विधानसभा निवडणूक : पंचरंगी लढतींमुळे पुन्हा १९९९ चा अनुभव; विजयासाठी हवीत अर्धा लाख मते

अविनाश कोळी- सांगली- राज्यात १९९९ मध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी जिल्ह्यात तिरंगी व चौरंगी लढतीत विजयी उमेदवारांचे मतांचे गणित केवळ ५0 ते ६0 हजारांच्या घरातच होते. यंदाही पंचरंगी व बहुरंगी लढती होत असल्याने पंधरा वर्षापूर्वीच्याच विजयी आकड्यांचा खेळ जिल्ह्यात रंगणार आहे. कॉँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीने स्वबळावर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लढविल्या. त्यामुळे राज्यभर प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची संख्या वाढली. लढतीतही तिरंगी, चौरंगीचे चित्र दिसले. सांगली जिल्ह्यातही तशीच स्थिती होते. तुल्यबळ उमेदवारांची संख्या वाढली की विजयी मतांची संख्याही घटते. मताधिक्याचा आलेखही घटतो. १९९९ मध्ये वाळवा, शिराळा आणि भिलवडी-वांगी हे तीन मतदारसंघ वगळता अन्य सहा मतदारसंघात विजय उमेदवाराला ५0 ते ६0 हजारांच्या घरात मते मिळाली होती. मताधिक्याचे आकडेही कमी झाले होते. गेल्या पंधरा वर्षांत मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली, तरी १९९९ च्या मतांचेच गणित पुन्हा दिसण्याची चिन्हे आहेत. १९९९ मध्ये एकत्र असणारे भाजप-सेनेचे उमेदवारही आता स्वबळावर मैदानात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही अनेक जागा लढवित आहे. बहुजन समाज पक्षासहीत अन्य छोटे पक्षही काहीठिकाणी मैदानात आहेत. अशा परिस्थितीत मतदारांची संख्या वाढूनही विजयी उमेदवाराच्या मतांचे गणित ५0 ते ६0 हजारांच्या घरात राहण्याची चिन्हे आहेत. मताधिक्याचा विचार केल्यास १९९९ मध्ये वाळवा मतदारसंघ वगळता अन्य आठ मतदारसंघातील मताधिक्यांची सरासरी ही १५ हजाराच्या घरात होती. वाळवा मतदारसंघात जयंत पाटील यांना ५३ हजार ९५0 चे मताधिक्य मिळाले होते. सध्याच्या निवडणुकीत पंचरंगी आणि बहुरंगी लढतींचा परिणाम मतांच्या गणितावर होणार आहे. त्यावेळी दिग्गज उमेदवारांनाही निसटता विजय मिळाला होता. यंदा काही मतदारसंघात तशी परिस्थिती आहे.तासगावमध्ये पुन्हा चुरस माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना तासगाव मतदारसंघातून १९९९ च्या निवडणुकीत केवळ ३४९७ चे मताधिक्य मिळाले होते. आर. आर. पाटीलही या मतदारसंघात पाचवेळा निवडून आले आहेत. १९९९ मध्येच त्यांना सर्वात कमी मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी संजय पाटील त्यांच्याविरोधात होते. यंदा आर. आर. पाटील विरुद्ध माजी मंत्री अजितराव घोरपडे अशी लढत असली तरी, घोरपडेंना संजय पाटील यांचीच सर्वाधिक ताकद आहे. त्यामुळे १९९९ चीच स्थिती या मतदारसंघात पुन्हा अनुभवण्यास मिळत आहे. इस्लामपुरात काय होंणार?पूर्वीचा वाळवा व आताच्या इस्लामपूर मतदारसंघात माजी मंत्री जयंत पाटील आजअखेर सलग पाचवेळा निवडून आले आहेत. तरीही त्यांच्या पाच निवडणुकांमधील मतांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर १९९९ मध्ये त्यांना सर्वात कमी मताधिक्य व मते मिळाल्याची नोंद आहे. यंदा ‘एकास एक’ उमेदवार देण्याचा प्रयत्न चालू होता. सारे विरोधक यंदा एकवटले आहेत. त्यात कॉँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे यंदा या मतदारसंघात मताधिक्य घटणार की वाढणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पंधरा वर्षांत काय झाले?गेल्या पंधरा वर्षांत सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. कॉँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या या जिल्ह्यात १९९९ नंतर राष्ट्रवादीने ताकद वाढविली. नंतर लोकसभा व विधानसभेला आघाडी झाली. तरीही दोन्ही पक्ष ग्रामपंचायतींपासून जिल्हा परिषदेपर्यंत व अन्य सहकारी संस्थांत एकमेकांविरोधात लढत राहिले. जिल्ह्यातील वर्चस्वासाठी दोघांमध्ये चुरस राहिली. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने याठिकाणी मुसंडी मारत तीन जागा जिंकल्या. लोकसभाही काबीज केली. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेनेकडेही आता दिग्गज उमेदवार असल्याने तेसुद्धा या शर्यतीत येऊ पाहात आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीला सर्वच मतदारसंघात कडवे आव्हान असल्याने १९९९ पेक्षाही वेगळी स्थिती यंदा दिसणार आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश नेते भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचा मतांचा टक्का कमी होण्याची दाट शक्यता आहे. १९९९ मधील मतदारसंघनिहाय स्थितीमतदारसंघविजयी उमेदवारमतेविरोधी उमेदवारमतेमताधिक्यसांगलीदिनकर पाटील (काँग्रेस)५६५७३संभाजी पवार (ज. द.)३३४१५२३१५८मिरजहाफिज धत्तुरे (काँग्रेस)४७२९४बजरंग पाटील (शिवसेना)३३६५७१३६३७तासगावआर. आर. पाटील (राष्ट्रवादी)५५१६६संजय पाटील (काँग्रेस)५१६६९३४९७खानापूर/आटपाडी अनिल बाबर (राष्ट्रवादी)५२२४0रामराव पाटील (काँग्रेस)३0३२४२१९१६वाळवाजयंत पाटील (राष्ट्रवादी)८३११२सी. बी. पाटील (भाजप)२९१६२५३९५0शिराळा शिवाजीराव नाईक (राष्ट्रवादी) ६६३६५सत्यजित देशमुख (काँग्रेस)६0६१९५७४६कवठेमहांकाळ अजितराव घोरपडे (अपक्ष) ५00७५शिवाजीराव शेंडगे (काँग्रेस)३८७९७११२७८जत उमाजी सनमडीकर (काँग्रेस) ५१११८सीताराम व्हनखंडे (राष्ट्रवादी)२६४0२२४७१६भिलवडी/वांगीपतंगराव कदम (काँग्रेस)७९४६६पृथ्वीराज देशमुख (राष्ट्रवादी)६१६३७१७८२९