शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

सांगली---साठ हजारातच विजयाचा गुलाल!

By admin | Updated: October 5, 2014 23:03 IST

विधानसभा निवडणूक : पंचरंगी लढतींमुळे पुन्हा १९९९ चा अनुभव; विजयासाठी हवीत अर्धा लाख मते

अविनाश कोळी- सांगली- राज्यात १९९९ मध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी जिल्ह्यात तिरंगी व चौरंगी लढतीत विजयी उमेदवारांचे मतांचे गणित केवळ ५0 ते ६0 हजारांच्या घरातच होते. यंदाही पंचरंगी व बहुरंगी लढती होत असल्याने पंधरा वर्षापूर्वीच्याच विजयी आकड्यांचा खेळ जिल्ह्यात रंगणार आहे. कॉँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीने स्वबळावर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लढविल्या. त्यामुळे राज्यभर प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची संख्या वाढली. लढतीतही तिरंगी, चौरंगीचे चित्र दिसले. सांगली जिल्ह्यातही तशीच स्थिती होते. तुल्यबळ उमेदवारांची संख्या वाढली की विजयी मतांची संख्याही घटते. मताधिक्याचा आलेखही घटतो. १९९९ मध्ये वाळवा, शिराळा आणि भिलवडी-वांगी हे तीन मतदारसंघ वगळता अन्य सहा मतदारसंघात विजय उमेदवाराला ५0 ते ६0 हजारांच्या घरात मते मिळाली होती. मताधिक्याचे आकडेही कमी झाले होते. गेल्या पंधरा वर्षांत मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली, तरी १९९९ च्या मतांचेच गणित पुन्हा दिसण्याची चिन्हे आहेत. १९९९ मध्ये एकत्र असणारे भाजप-सेनेचे उमेदवारही आता स्वबळावर मैदानात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही अनेक जागा लढवित आहे. बहुजन समाज पक्षासहीत अन्य छोटे पक्षही काहीठिकाणी मैदानात आहेत. अशा परिस्थितीत मतदारांची संख्या वाढूनही विजयी उमेदवाराच्या मतांचे गणित ५0 ते ६0 हजारांच्या घरात राहण्याची चिन्हे आहेत. मताधिक्याचा विचार केल्यास १९९९ मध्ये वाळवा मतदारसंघ वगळता अन्य आठ मतदारसंघातील मताधिक्यांची सरासरी ही १५ हजाराच्या घरात होती. वाळवा मतदारसंघात जयंत पाटील यांना ५३ हजार ९५0 चे मताधिक्य मिळाले होते. सध्याच्या निवडणुकीत पंचरंगी आणि बहुरंगी लढतींचा परिणाम मतांच्या गणितावर होणार आहे. त्यावेळी दिग्गज उमेदवारांनाही निसटता विजय मिळाला होता. यंदा काही मतदारसंघात तशी परिस्थिती आहे.तासगावमध्ये पुन्हा चुरस माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना तासगाव मतदारसंघातून १९९९ च्या निवडणुकीत केवळ ३४९७ चे मताधिक्य मिळाले होते. आर. आर. पाटीलही या मतदारसंघात पाचवेळा निवडून आले आहेत. १९९९ मध्येच त्यांना सर्वात कमी मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी संजय पाटील त्यांच्याविरोधात होते. यंदा आर. आर. पाटील विरुद्ध माजी मंत्री अजितराव घोरपडे अशी लढत असली तरी, घोरपडेंना संजय पाटील यांचीच सर्वाधिक ताकद आहे. त्यामुळे १९९९ चीच स्थिती या मतदारसंघात पुन्हा अनुभवण्यास मिळत आहे. इस्लामपुरात काय होंणार?पूर्वीचा वाळवा व आताच्या इस्लामपूर मतदारसंघात माजी मंत्री जयंत पाटील आजअखेर सलग पाचवेळा निवडून आले आहेत. तरीही त्यांच्या पाच निवडणुकांमधील मतांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर १९९९ मध्ये त्यांना सर्वात कमी मताधिक्य व मते मिळाल्याची नोंद आहे. यंदा ‘एकास एक’ उमेदवार देण्याचा प्रयत्न चालू होता. सारे विरोधक यंदा एकवटले आहेत. त्यात कॉँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे यंदा या मतदारसंघात मताधिक्य घटणार की वाढणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पंधरा वर्षांत काय झाले?गेल्या पंधरा वर्षांत सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. कॉँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या या जिल्ह्यात १९९९ नंतर राष्ट्रवादीने ताकद वाढविली. नंतर लोकसभा व विधानसभेला आघाडी झाली. तरीही दोन्ही पक्ष ग्रामपंचायतींपासून जिल्हा परिषदेपर्यंत व अन्य सहकारी संस्थांत एकमेकांविरोधात लढत राहिले. जिल्ह्यातील वर्चस्वासाठी दोघांमध्ये चुरस राहिली. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने याठिकाणी मुसंडी मारत तीन जागा जिंकल्या. लोकसभाही काबीज केली. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेनेकडेही आता दिग्गज उमेदवार असल्याने तेसुद्धा या शर्यतीत येऊ पाहात आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीला सर्वच मतदारसंघात कडवे आव्हान असल्याने १९९९ पेक्षाही वेगळी स्थिती यंदा दिसणार आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश नेते भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचा मतांचा टक्का कमी होण्याची दाट शक्यता आहे. १९९९ मधील मतदारसंघनिहाय स्थितीमतदारसंघविजयी उमेदवारमतेविरोधी उमेदवारमतेमताधिक्यसांगलीदिनकर पाटील (काँग्रेस)५६५७३संभाजी पवार (ज. द.)३३४१५२३१५८मिरजहाफिज धत्तुरे (काँग्रेस)४७२९४बजरंग पाटील (शिवसेना)३३६५७१३६३७तासगावआर. आर. पाटील (राष्ट्रवादी)५५१६६संजय पाटील (काँग्रेस)५१६६९३४९७खानापूर/आटपाडी अनिल बाबर (राष्ट्रवादी)५२२४0रामराव पाटील (काँग्रेस)३0३२४२१९१६वाळवाजयंत पाटील (राष्ट्रवादी)८३११२सी. बी. पाटील (भाजप)२९१६२५३९५0शिराळा शिवाजीराव नाईक (राष्ट्रवादी) ६६३६५सत्यजित देशमुख (काँग्रेस)६0६१९५७४६कवठेमहांकाळ अजितराव घोरपडे (अपक्ष) ५00७५शिवाजीराव शेंडगे (काँग्रेस)३८७९७११२७८जत उमाजी सनमडीकर (काँग्रेस) ५१११८सीताराम व्हनखंडे (राष्ट्रवादी)२६४0२२४७१६भिलवडी/वांगीपतंगराव कदम (काँग्रेस)७९४६६पृथ्वीराज देशमुख (राष्ट्रवादी)६१६३७१७८२९