शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

सांगली ग्रामसेवक संघटना मागण्यांबाबत ठामच!उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या बदलीशिवाय आंदोलनातून माघार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:11 IST

सांगली : जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्याकडून ग्रामसेवकांचा मानसिक छळ होत आहे.

ठळक मुद्दे जिल्हा परिषद : ; चौकशी समिती नियुक्तआडसूळ यांची चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरुच

सांगली : जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्याकडून ग्रामसेवकांचा मानसिक छळ होत आहे. त्यांची बदली केल्याशिवाय ग्रामसेवक असहकार आंदोलन मागे घेणार नाहीत, असा पवित्रा ग्रामसेवक संघटनांच्या पदाधिकाºयांनी शुक्रवारी घेतला.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती गठित केली आहे. तरीही ग्रामसेवक आंदोलनावर ठामच आहेत.ग्रामसेवक आणि प्रशासन यांच्यात मागील आठ दिवसांपासून सुरु असलेले मतभेद शुक्रवारीही कायम राहिले. मोर्चाला परवानगी नाकारल्याने नाराजी व्यक्त करीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांची तात्काळ बदली करण्याची मागणी संघटनांनी केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडसूळ यांची बदली होईपर्यंत असहकार आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी सांगितले.

शुक्रवारी जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या ग्रामसेवकांनी मार्केट यार्डातील कार्यालयात बैठक झाली. युनियनचे राज्याध्यक्ष ढाकणे, जिल्हाध्यक्ष भास्कर जाधव, ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांनीही भूमिका मांडली. आडसूळ यांचे दडपशाहीचे धोरण, संघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न, संघटना प्रतिनिधींना टार्गेट करून कार्यवाही करणे, कायदेशीर बाबीत अडचणीत आणणे, कार्यालयीन वेळेनंतर सोशल मीडियावरुन आदेश पाठवून तात्काळ माहिती मागविणे, ती न दिल्यास कारवाईसाठी धमकावणे, अशा अनेक तकारी संघटनांच्या आहेत.

ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्यासोबत ग्रामसेवक संघटना पदाधिकाºयांची बैठक झाली. राऊत यांच्या बैठकीनंतर आडसूळ यांच्या बदलीची मूळ मागणी दुर्लक्षित आहे. ती मान्य झाली नाही, तर आडसूळ यांच्याकडून पुन्हा सुडबुध्दीने कारवाई होण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे. त्यांची जिल्ह्याबाहेर बदली झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.राज्याध्यक्ष ढाकणे यांनी, आडसूळ यांची चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यात येईल, अशी भूमिका घेतली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडेही तक्रार केली आहे. आडसूळ यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.आडसुळांना रजेवर पाठविणार नाही : राऊतग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. सध्या अधिवेशन सुरु असल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांना रजेवर पाठविता येणार नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी स्पष्ट केले.मोर्चाला परवानगीबाबत अधिवेशनात लक्षवेधीग्रामसेवक संघटनांना जिल्हा परिषदेवर शुक्रवारी मोर्चा काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. ती परवानगी का नाकारण्यात आली, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये करीत, ग्रामसेवकांच्या मोर्चाबाबतचा प्रश्न लक्षवेधी केला. तसेच मोर्चास परवानगी नाकारणाºया पोलिस अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणीही चव्हाण यांनी केली.