शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

सांगली : विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी, व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी द्यावी : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:33 IST

शिक्षकांनी पुस्तकातील धडे देण्याबरोबरच, वैभवशाली राष्ट्र घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी आणि व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी द्यावी, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी  केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी, व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी द्यावी : सुभाष देशमुखआदर्श शिक्षक व आदर्श पतसंस्था पुरस्कार वितरण

सांगली : शिक्षकांनी पुस्तकातील धडे देण्याबरोबरच, वैभवशाली राष्ट्र घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी आणि व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी द्यावी, असे आवाहन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी  केले.जतमध्ये लायन्स व लायनेस क्लबच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक व आदर्श पतसंस्था पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. डॉ. रवींद्र आरळी शैक्षणिक संकुल येथे झालेल्या या कार्यक्रमास सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील, डॉ. रवींद्र आरळी, बालगाव आश्रमाचे अमृतानंद स्वामी, गोपाल बजाज, उपनिबंधक नीलकंठ करे आदि मान्यवर उपस्थित होते.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून व त्यांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शिक्षकांनी शैक्षणिक पारंपरिक व्यवस्थेत परिवर्तनासाठी केवळ गुणांच्या मागे न लागता, विद्यार्थ्यांमधील अंगभूत कौशल्याला वाव द्यावा, प्रोत्साहन द्यावे. तसेच, विद्यार्थ्यांना व्यावहारिक धडे द्यावेत. अर्थकारण, बँकिंग व्यवस्था शिकवावी. थोर पुरुषांच्या चारित्र्याची माहिती देतानाच, स्थानिक सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची ओळख करून द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावर सामाजिक बांधिलकीचे महत्व कोरले जाईल, असे ते म्हणाले.पूर्वीच्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा विचार केला जाई. पण सध्या उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, असे मानले जात आहे. मात्र, शिक्षकांनी विद्यार्थाच्या जीवनात शेती आणि उद्योजकतेचेही बीज पेरावे.

पालकांना विश्वासात घेऊन आठवड्यातून ठराविक वेळ स्वच्छतेसाठी राखून ठेवा. स्वच्छतेची सवय विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवावी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता हीच सेवा या अभियानात सक्रिय योगदान द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. सहकाराचा स्वाहाकार न करता, सहकारातून महाराष्ट्राला देशात आदर्श बनवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी, राष्ट्र बलशाली करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण मूल्ये जपून विद्यार्थ्यांवर संस्कार घडवावेत. सहकारी संस्थांनी ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास संपादन करावा. तसेच, समाजाच्या बदलत्या गरजा पूर्ण कराव्यात. राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊन काम करावे, असे ते म्हणाले.यावेळी आमदार विलासराव जगताप, गोपाल बजाज, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक घनश्याम चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच आदर्श पतसंस्था पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच, कराटे स्कूलचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सामाजिक कार्याबद्दल बोर्गी येथील सहारा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविकात डॉ. रवींद्र आरळी यांनी लायन्स क्लबचे कार्य, पुरस्कार देण्यामागची भूमिका विषद केली. तसेच, पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार लवकरच सहकार तत्वावर रुग्णालय स्थापन करण्याची ग्वाही दिली. स्वागत लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनकर पतंगे यांनी तर सदस्य संदीप लोणी यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील शिक्षक, शिक्षिका, पतसंस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSangliसांगली