शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सांगली जिल्ह्यात ३० हजार मतदार वाढले , निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात विक्रमी नोंदणी--मतदार दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:26 IST

सांगली : नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी व लोकशाहीची मूल्ये अधिक परिणामकारकपणे रूजण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश

शरद जाधव ।सांगली : नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी व लोकशाहीची मूल्ये अधिक परिणामकारकपणे रूजण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबरपासून सुरू केलेल्या मतदार नोंदणी अभियानास जिल्हाभर चांगला प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यात ३० हजार ५७३ मतदारांची वाढ झाली आहे.

अवघ्या सहा महिन्यावर आलेल्या महापालिका निवडणुका लक्षात घेता, सर्वाधिक मतदार महापालिका क्षेत्रात वाढले आहेत.मतदारांनी मतदान करणे व आपला अधिकार वापरणे आवश्यक असताना, याबाबत गेल्या काही वर्षात नागरिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत होती. यावर उपाय म्हणून प्रशासनाने मतदानाविषयी व नावनोंदणीविषयी जागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात ३ आॅक्टोबर ते १५ डिसेंबरअखेर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. यात नवमतदारांची नोंदणी, नाव वगळणे व नावात, फोटोत बदल अशी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानुसार आता जिल्ह्यातील पूर्णपणे अद्ययावत मतदारयादी तयार झाली आहे.

जिल्ह्यातील मतदारांत ३० हजार ५७३ ने वाढ झाली असतानाच, सर्वाधिक नवीन नोंदणी सांगली व मिरज मतदारसंघात झाली आहे. मिरज मतदारसंघात ७ हजार ३९६, तर सांगली मतदारसंघात ७ हजार ८३० मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे. मृत मतदार, तसेच स्थलांतरासह इतर कारणांनी ४ हजार ३५० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याअगोदर जिल्ह्यातील मतदारांची संख्या २२ लाख ६४ हजार ६३९ होती. त्यात वाढ होऊन, आता २२ लाख ९० हजार ८६२ मतदार संख्या झाली आहे. नोंदणीअगोदर जिल्ह्यात केवळ ४ तृतीयपंथी मतदार होते, आता जिल्ह्यात ५६ तृतीयपंथी मतदारांनी नोंदणी केली आहे. यापुढेही जिल्ह्यात मतदान नोंदणी सुरुच ठेवण्यात येणार आहे.

निवडणुकीमुळे नोंदणीमहापालिकेची निवडणूक जवळ आल्याने त्याची झलक मतदार नोंदणी अभियानात दिसून आली. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वाधिक मतदार नोंदणी सांगली व मिरज आणि कुपवाड मतदारसंघात झाली असून १५ हजार २२६ मतदार नव्याने आगामी निवडणुकीसाठी आपला हक्क बजाविणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारही मतदान जागृतीसाठी प्रयत्न करीत आहेत.सहस्रक मतदारांचा गौरवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालयात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. आता शुक्रवार दि. २६ रोजी युथ मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याबरोबरच स्टेशन चौकात सायकल रॅली, मानवी साखळी, प्रभात फेरी होणार आहे. तसेच १ जानेवारी २००० ला जन्मलेल्या जिल्ह्यातील ४६ नवमतदारांना सहस्रक मतदार म्हणून गौरविण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणीसाठी मोहिमेचे नियोजन करण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून मतदार संख्येत वाढ झाली आहे. महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेचा विशेष फायदा युथ मतदारांना झाला आहे. यापुढेही मतदारांना सोयी देण्यास प्राधान्य देणार आहे.- मीनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा)