शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगली जिल्ह्यात ३० हजार मतदार वाढले , निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात विक्रमी नोंदणी--मतदार दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:26 IST

सांगली : नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी व लोकशाहीची मूल्ये अधिक परिणामकारकपणे रूजण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश

शरद जाधव ।सांगली : नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी व लोकशाहीची मूल्ये अधिक परिणामकारकपणे रूजण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबरपासून सुरू केलेल्या मतदार नोंदणी अभियानास जिल्हाभर चांगला प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यात ३० हजार ५७३ मतदारांची वाढ झाली आहे.

अवघ्या सहा महिन्यावर आलेल्या महापालिका निवडणुका लक्षात घेता, सर्वाधिक मतदार महापालिका क्षेत्रात वाढले आहेत.मतदारांनी मतदान करणे व आपला अधिकार वापरणे आवश्यक असताना, याबाबत गेल्या काही वर्षात नागरिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत होती. यावर उपाय म्हणून प्रशासनाने मतदानाविषयी व नावनोंदणीविषयी जागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात ३ आॅक्टोबर ते १५ डिसेंबरअखेर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. यात नवमतदारांची नोंदणी, नाव वगळणे व नावात, फोटोत बदल अशी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानुसार आता जिल्ह्यातील पूर्णपणे अद्ययावत मतदारयादी तयार झाली आहे.

जिल्ह्यातील मतदारांत ३० हजार ५७३ ने वाढ झाली असतानाच, सर्वाधिक नवीन नोंदणी सांगली व मिरज मतदारसंघात झाली आहे. मिरज मतदारसंघात ७ हजार ३९६, तर सांगली मतदारसंघात ७ हजार ८३० मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे. मृत मतदार, तसेच स्थलांतरासह इतर कारणांनी ४ हजार ३५० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याअगोदर जिल्ह्यातील मतदारांची संख्या २२ लाख ६४ हजार ६३९ होती. त्यात वाढ होऊन, आता २२ लाख ९० हजार ८६२ मतदार संख्या झाली आहे. नोंदणीअगोदर जिल्ह्यात केवळ ४ तृतीयपंथी मतदार होते, आता जिल्ह्यात ५६ तृतीयपंथी मतदारांनी नोंदणी केली आहे. यापुढेही जिल्ह्यात मतदान नोंदणी सुरुच ठेवण्यात येणार आहे.

निवडणुकीमुळे नोंदणीमहापालिकेची निवडणूक जवळ आल्याने त्याची झलक मतदार नोंदणी अभियानात दिसून आली. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वाधिक मतदार नोंदणी सांगली व मिरज आणि कुपवाड मतदारसंघात झाली असून १५ हजार २२६ मतदार नव्याने आगामी निवडणुकीसाठी आपला हक्क बजाविणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारही मतदान जागृतीसाठी प्रयत्न करीत आहेत.सहस्रक मतदारांचा गौरवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालयात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. आता शुक्रवार दि. २६ रोजी युथ मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याबरोबरच स्टेशन चौकात सायकल रॅली, मानवी साखळी, प्रभात फेरी होणार आहे. तसेच १ जानेवारी २००० ला जन्मलेल्या जिल्ह्यातील ४६ नवमतदारांना सहस्रक मतदार म्हणून गौरविण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणीसाठी मोहिमेचे नियोजन करण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून मतदार संख्येत वाढ झाली आहे. महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेचा विशेष फायदा युथ मतदारांना झाला आहे. यापुढेही मतदारांना सोयी देण्यास प्राधान्य देणार आहे.- मीनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा)