शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

सांगली जिल्हा बँकेकडील कर्ज थकबाकी ५१२ कोटींवर,कर्ज वाटपावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 16:42 IST

Banking Sector Sangli : काही कारखान्यांची थकीत ऊस बिले, लॉकडाऊनमुळे बाजारावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींचा परिणाम जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे. सध्या जिल्ह्यातील ४३ हजारांवर सभासदांकडील ५१२ कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असून, थकबाकी वाढल्याने त्याचा कर्जवाटपावर परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्हा बँकेकडील कर्ज थकबाकी ५१२ कोटींवर,कर्ज वाटपावर परिणाम उद्दिष्टाच्या पन्नास टक्केच वाटप, वसुलीसाठी जोरदार प्रयत्न

सांगली : काही कारखान्यांची थकीत ऊस बिले, लॉकडाऊनमुळे बाजारावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींचा परिणाम जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे. सध्या जिल्ह्यातील ४३ हजारांवर सभासदांकडील ५१२ कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असून, थकबाकी वाढल्याने त्याचा कर्जवाटपावर परिणाम झाला आहे.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. अनेक संकटातही बँकेने नफ्याची परंपरा कायम ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षात या बँकेला कर्ज वसुलीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. काही मोजक्याच साखर कारखान्यांनी ऊसाची बिले शेतकऱ्यांना न दिल्याने शेतकऱ्यांकडून कर्जाचा भरणा होऊ शकला नाही. त्यामुळे थकबाकीत भर पडली आहे. बिले मिळाल्यानंतर वसुलीला गती मिळण्याची शक्यता आहे.एकीकडे कर्जाची थकबाकी वाढल्याने त्याचा नव्या कर्ज वाटपावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या उद्दिष्टाच्या ५० टक्केच कर्जवाटप होऊ शकले आहे. कर्जवाटपातही दरवर्षी बँक आघाडीवर असते. यंदा थकबाकी असल्याने अडचणी येत आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेने एकूण ५,३५६ कोटी ८४ लाख रुपये कर्जाचे वाटप केले होते. यंदाही कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कर्जवसुली महत्त्वाची आहे.चालू आर्थिक वर्षाचा पहिला तिमाही संपला आहे. पुढील तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चांगली कर्जवसुली करण्यासाठी बँकेने नियोजन केले आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे.दोन लाखांवरील थकबाकी १०० कोटींचीजिल्ह्यातील २ लाखांवरील कर्ज असलेल्या ८ हजार ७१३ सभासदांची थकबाकी १०० कोटींच्या घरात आहे. एकूण थकबाकीचा विचार केल्यास ४३ हजार सभासद थकबाकीत असून, त्यांची थकबाकी ५१२ कोटी रुपयांची आहे.

जिल्हा बँकेने वसुलीसाठी प्रयत्न चालवले आहेत. वसुलीला मोठ्या अडचणी नाहीत, पण थकबाकीचा परिणाम कर्जवाटपावर झाला आहे. सध्या ५० टक्के कर्जवाटप झाले आहेत. येत्या तिमाहीत चांगली वसुली व कर्जवाटप होण्याची आशा आहे.- जयवंत कडू-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा बँक

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSangliसांगली