शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सांगली जिल्हा बँकेकडील कर्ज थकबाकी ५१२ कोटींवर,कर्ज वाटपावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 16:42 IST

Banking Sector Sangli : काही कारखान्यांची थकीत ऊस बिले, लॉकडाऊनमुळे बाजारावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींचा परिणाम जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे. सध्या जिल्ह्यातील ४३ हजारांवर सभासदांकडील ५१२ कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असून, थकबाकी वाढल्याने त्याचा कर्जवाटपावर परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्हा बँकेकडील कर्ज थकबाकी ५१२ कोटींवर,कर्ज वाटपावर परिणाम उद्दिष्टाच्या पन्नास टक्केच वाटप, वसुलीसाठी जोरदार प्रयत्न

सांगली : काही कारखान्यांची थकीत ऊस बिले, लॉकडाऊनमुळे बाजारावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींचा परिणाम जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे. सध्या जिल्ह्यातील ४३ हजारांवर सभासदांकडील ५१२ कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असून, थकबाकी वाढल्याने त्याचा कर्जवाटपावर परिणाम झाला आहे.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. अनेक संकटातही बँकेने नफ्याची परंपरा कायम ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षात या बँकेला कर्ज वसुलीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. काही मोजक्याच साखर कारखान्यांनी ऊसाची बिले शेतकऱ्यांना न दिल्याने शेतकऱ्यांकडून कर्जाचा भरणा होऊ शकला नाही. त्यामुळे थकबाकीत भर पडली आहे. बिले मिळाल्यानंतर वसुलीला गती मिळण्याची शक्यता आहे.एकीकडे कर्जाची थकबाकी वाढल्याने त्याचा नव्या कर्ज वाटपावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या उद्दिष्टाच्या ५० टक्केच कर्जवाटप होऊ शकले आहे. कर्जवाटपातही दरवर्षी बँक आघाडीवर असते. यंदा थकबाकी असल्याने अडचणी येत आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेने एकूण ५,३५६ कोटी ८४ लाख रुपये कर्जाचे वाटप केले होते. यंदाही कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कर्जवसुली महत्त्वाची आहे.चालू आर्थिक वर्षाचा पहिला तिमाही संपला आहे. पुढील तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चांगली कर्जवसुली करण्यासाठी बँकेने नियोजन केले आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे.दोन लाखांवरील थकबाकी १०० कोटींचीजिल्ह्यातील २ लाखांवरील कर्ज असलेल्या ८ हजार ७१३ सभासदांची थकबाकी १०० कोटींच्या घरात आहे. एकूण थकबाकीचा विचार केल्यास ४३ हजार सभासद थकबाकीत असून, त्यांची थकबाकी ५१२ कोटी रुपयांची आहे.

जिल्हा बँकेने वसुलीसाठी प्रयत्न चालवले आहेत. वसुलीला मोठ्या अडचणी नाहीत, पण थकबाकीचा परिणाम कर्जवाटपावर झाला आहे. सध्या ५० टक्के कर्जवाटप झाले आहेत. येत्या तिमाहीत चांगली वसुली व कर्जवाटप होण्याची आशा आहे.- जयवंत कडू-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा बँक

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSangliसांगली