शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
4
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
5
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
6
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
7
पति निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्र किनाऱ्यावर दिसला रोमॅन्टिक अंदाज; बघा लेटेस्ट VIDEO
8
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
9
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
10
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
11
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
12
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
13
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
14
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
15
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
16
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
17
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
18
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
19
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
20
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...

सांगलीत डेंग्यूने दोघांचा मृृत्यू!

By admin | Updated: August 12, 2016 00:05 IST

बळींची संख्या चारवर : नागरिकांतून संताप; महापालिका म्हणते, केवळ डेंग्यू नाही त्यांना इतरही आजार

सांगली : शहरातील घनश्यामनगर व रमामातानगर परिसरातील दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला केवळ डेंग्यू हेच एकमेव कारण नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले असून, त्यांना मधुमेह, किडनी व लिव्हरचे आजारही होते, असे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. चारुदत्त शहा यांनी सांगितले. यापूर्वी डेंग्यूने मिरजेतील दोघांचा बळी गेला आहे. आता बळींची संख्या चारवर पोहोचली आहे. सांगलीत बुधवारी रात्री घनश्यामनगर येथील सुरेश मनगुळी (वय ३७) व रमामातानगर येथील रमजान सय्यद (२७) या दोघांचा मृत्यू झाला. त्या दोघांना डेंग्यू झाल्याची चर्चा महापालिकेत सुरू होती. मनगुळी यांना काही दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते; पण त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, रात्री त्यांचे निधन झाले. नातेवाइकांनी डेंग्यूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रमामातानगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यूची साथ आहे. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण या परिसरातच आढळून आले आहेत. अशातच बुधवारी सायंकाळी रमजान सय्यद या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला. रमजान हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यालाही भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शहरात डेंग्यूने दोघांचा बळी गेल्याचे समजताच महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली. गुरुवारी रमामातानगर परिसरात आरोग्य विभागाने औषध व धूळ फवारणी मोहीम हाती घेतली. तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. या परिसरातील एका शाळेजवळ कचऱ्याचा कंटेनर ठेवण्यात आला आहे. हा कंटनेर भरून वाहतो, तरीही त्यातील कचरा उचलला जात नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली. घनश्यामनगर परिसरातही पालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)डेंग्यूसह इतर आजार : चारुदत्त शहासुरेश मनगुळी व रमजान सय्यद या दोघांवरील उपचाराचे रिपोर्ट महापालिकेने घेतले आहेत. दोघांनाही मधुमेहाचा त्रास होता. मनगुळी यांना किडनी, तर सय्यद यांना लिव्हरचा आजार होता. दोघांवरही उपचार सुरू होते. मनगुळींच्या रिपोर्टमध्ये डेंग्यूसदृश्य ताप, तर सय्यद यांना डेंग्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. चारुदत्त शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महापालिकेवर फौजदारी करणार : पठाणमहापालिकेतील आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे रमजान सय्यद यांचा मृत्यू झाला. रमामातानगर परिसरात डेंग्यूने थैमान घातले असताना पालिकेने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. सय्यद यांच्या मृत्यूनंतर मात्र पालिका जागी झाली आणि गुरुवारी औषध फवारणी करून साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडले. सय्यद यांची प्रकृती खालावली असताना आरोग्य विभागातील एकाही अधिकाऱ्याने त्यांची भेट घेऊन विचारपूस केली नाही. यातून महापालिकेतील अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून येतो. सय्यद यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे नगरसेवक आयुब पठाण यांनी सांगितले.