शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

सांगलीत एलबीटी रद्दसाठी निर्णायक आंदोलन सुरु

By admin | Updated: March 27, 2015 00:40 IST

बेमुदत उपोषण : व्यापाऱ्यांची मोटारसायकल रॅली

 सांगली : एक एप्रिलपासून एलबीटी रद्द करा, यासह विविध मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार करीत, गुरुवारपासून एलबीटीविरोधी कृती समितीच्यावतीने सांगलीत आंदोलनाला सुरुवात केली. व्यापाऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढून सांगली बंदची हाक दिली होती. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एलबीटीविरोधी कृती समितीचे समीर शहा, विराज कोकणे, सुरेश पटेल हे तिघे उपोषणाला बसले आहेत. तत्पूर्वी, सकाळी व्यापाऱ्यांच्यावतीने गणपती मंदिरासमोर आरती केली. त्यानंतर शहरातून मोटारसायकल रॅली काढली. रॅलीने सर्व व्यापारी स्टेशन चौकातील वसंतदादांच्या पुतळ्यासमोर आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी ‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी, विराज कोकणे, शिवसेनेचे विकास सूर्यवंशी, जितेंद्र शहा, अनंत चिमड यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. गुरनानी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून व्यापाऱ्यांचे एलबीटीविरोधी आंदोलन सुरू आहे. व्यापाऱ्यांना बंद, उपोषण करणे माहीत नाही; पण शासन व राज्यकर्त्यांनी ही वेळ आणली. त्यामुळे व्यापारी एकत्र आले. त्यांची व्होट बँक बनली. ती ताकद दोन्ही निवडणुकीत दाखवून दिली. राज्य शासनाने एक एप्रिलपासून एलबीटी रद्द करण्याचे लेखी आश्वासन दिले होते; पण आता एक आॅगस्टचा मुहूर्त काढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊनही त्यांनी निराशा केली. पुढील चार महिने कसे काढायचे, हा प्रश्न आहे. आम्ही एलबीटी भरलेला नाही. कारण आमचे असहकार आंदोलन सुरू आहे. आजही आम्ही एलबीटी भरण्यास तयार आहोत; पण आधी आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात. राज्य शासनाने एक एप्रिलपासून एलबीटी रद्द करावा, नाहीतर एक मेपासून अंमलबजावणी करावी. त्यात काही अडचण असल्यास किमान अमेनिटी स्कीम जाहीर करावी, अन्यथा राज्यातील व्यापारी रस्त्यावर उतरतील. व्यापाऱ्यांचे हे आंदोलन शासनाला परवडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. विराज कोकणे म्हणाले की, व्यापाऱ्यांनी काही अटींवर एलबीटी भरण्याची तयारी दर्शविली होती; पण महापालिकेने ते फेटाळले आहे. गेल्या १५ वर्षांत व्यापाऱ्यांनी २२०० कोटी रुपये पालिकेला दिले आहेत. त्यातून नागरिकांना काय सुविधा दिल्या? स्वत:चे पाप लपविण्यासाठी सत्ताधारी नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. जोपर्यंत राज्य शासन मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. आंदोलनात प्रसाद कागवाडे, मुकेश चावला, गौरव शेडजी, धीरेन शहा, केदार खाडिलकर यांच्यासह व्यापारी सहभागी झाले होते. ७० लाख जमा राज्य शासनाची एलबीटी रद्द करण्याची घोषणा व व्यापाऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे गेला आठवडाभर पालिकेचे एलबीटीचे उत्पन्न बऱ्याच प्रमाणात घटले होते. दररोज ३० ते ३५ लाख रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा होत होता. गुरुवारी व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यात पालिकेने या प्रश्नांवर कारवाईची तयारी सुरू केल्याचे निदर्शनास येताच पालिकेच्या तिजोरीत कराचा भरणा वाढू लागला आहे. गुरुवारी तब्बल ७० लाख रुपयांचा एलबीटी जमा झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)