शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

सांगलीत कंपन्यांनी मांडला लुटीचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:08 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कुणीही यावे, सांगलीकरांना लुटून जावे, अशी जिल्ह्याची स्थिती झाली आहे. गेल्या ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कुणीही यावे, सांगलीकरांना लुटून जावे, अशी जिल्ह्याची स्थिती झाली आहे. गेल्या वीस वर्षांत पल्स, पॅन कार्ड क्लब, मैत्रेय, कडकनाथ यासह अनेक कंपन्यांनी सांगलीतील ठेवीदार, गुंतवणूकदारांना विविध आमिषांद्वारे हजारो कोटींचा गंडा घातला. आयुष्याची पुंजी परत मिळविण्यासाठी भाबडे गुंतवणूकदार आता केविलवाणी धडपड करताना दिसत आहेत.सहकार पंढरी म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे. सहकारी संस्थांबरोबरच सहकारी वित्तीय संस्थांचे जाळे सर्वदूर पसरले. त्यामुळे सहकारी संस्थांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली. विविध बॅँका व पतसंस्थांनी नियमबाह्य कारभार केल्यामुळे त्या अवसायनात गेल्या. अनेक संस्था अवसायनात गेल्या नसल्या तरी, त्या अडचणीत आल्या आहेत. हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये यात अडकले आहेत. सरकारी नोकरदार, कामगार, विक्रेते, किरकोळ व्यावसायिक, हमाल अशा ८९ हजार ५३३ सामान्य ठेवीदारांच्या ७६ कोटी ५९ लाख ३ हजार रुपयांच्या ठेवी जिल्ह्यातील पतसंस्थांत अडकल्या आहेत. सहकार विभागाकडून कारवाईबाबतची उदासीनता, कर्जवसुलीत संस्थांसमोर येणाऱ्या अडचणी आणि शासनस्तरावर बघ्याची भूमिका, अशा दुष्टचक्रात सामान्य ठेवीदार अडकले आहेत. बॅँकांमध्ये अडकलेल्या पैशांचा विचार केल्यास हा आकडा आणखी वाढतो.वित्तीय संस्थांबरोबरच जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांत अनेक कंपन्या, संस्थांनी येऊन येथील गुंतवणूकदारांना लुटले. जादा व्याजदर, मालमत्ता, परतावा, साखळी योजना अशा वेगवेगळ््या आमिषांच्या माध्यमातून जाहिरातबाजी झाली. पल्स, पॅन कार्ड क्लब, मैत्रेय, कडकनाथ या योजना-संस्थांनी लाखो गुंतवणूकदारांना जाळ््यात ओढले. आता ते पैसे परत करण्यास असमर्थता दर्शवित आहेत. पोलीस, न्यायालये, शासनदरबारी गुतंवणूकदारांचा लढा सुरू आहे. अनेक छोट्या कंपन्या, संस्थांनीही गुंतवणूकदारांना लुटले. हा बाजार उजेडात आल्यानंतरही लोकांचे यास बळी पडणे सुरूच आहे.फसवणूक का होत आहेकंपन्यांकडून जादा व्याजदर, परताव्याचे आमिषचांगल्या आर्थिक स्थितीचे मार्केटिंगसाखळी योजनांमधून सभासद श्रीमंत होत असल्याबाबतची खोटी माहितीगुंतवणुकीच्या रकमेला संरक्षण असल्याबद्दलची दावेदारीएजंटांना मोठ्या कमिशनचे आमिषआलिशान कार्यालये, बैठकांतून कंपनीच्या कार्याचे आभासात्मक चित्र तयार करण्यात येते.