शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

सांगली-अंकली रस्ता राष्ट्रीय महामार्गात येणार : त्रासलेल्या नागरिक, प्रवाशांसाठी दिलासादायक पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:25 IST

अनेकांच्या जिवाशी खेळ करीत मृत्यूचा सापळा बनलेल्या सांगली-अंकली या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये करण्याबाबत आशादायी पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे.

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव , पंधरवड्यात निर्णय शक्य--लोकमत इफेक्ट‘लोकमत’ने या रस्त्याच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकला होता.

सांगली : अनेकांच्या जिवाशी खेळ करीत मृत्यूचा सापळा बनलेल्या सांगली-अंकली या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये करण्याबाबत आशादायी पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी भारतीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांकडे सादर केला आहे.

‘लोकमत’ने या रस्त्याच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकला होता. या रस्त्याने गेल्या काही वर्षात अनेकांचे बळी घेतले. दक्षिण बाजूच्या अनेक मोठ्या शहरांना व महामार्गांना सांगली शहराशी जोडणारा हा रस्ता खराब रस्त्यांच्या यादीत स्पर्धक बनला आहे. रत्नागिरी-नागपूर राष्टÑीय महामार्गात शिरोली ते अंकली या रस्ता समाविष्ट झाला आहे. अंकली ते सांगली हा छोटासा पट्टाच आता बाजूला झाल्यामुळे त्याला कोणीही वाली राहिलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने कधीही या रस्त्याच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने पाहिले नाही. अपघातांमागून अपघात घडत असताना, लोकांचे बळी जात असतानाही त्याची दखल घेतली गेली नाही. लोकांच्या जिवाशी खेळ खेळत मरणयातनांचा अनुभव देत गेली कित्येक वर्षे या रस्त्याने प्रवाशांना छळले. आजही हा छळ सुरूच आहे. गेल्या दहा वर्षांत शेकडो बळी या रस्त्याने घेतले. आजही अपघातांची मालिका सुरूच आहे.

याच प्रश्नावर ‘लोकमत’ने आवाज उठविला. नागरिक जागृती मंचनेही या रस्त्याच्या प्रश्नासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करतानाच रस्त्यावरील आंदोलनही उभारले. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी वृत्ताची दखल घेत अखेर सांगली-अंकली या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय  महामार्ग क्र. १६६ मध्ये करावा, असा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये त्यांनी हा रस्ता किती धोकादायक बनला आहे, याचाही उल्लेख केला आहे. सार्वजनिक वाहतूक, नागरी वाहतुकीचे कार्य जीव मुठीत घेऊन सुरू असल्याचे सांगून जिल्हाधिकाºयांनी या रस्त्याचा समावेश राष्ट्रीयमहामार्गात होणे का गरजेचे आहे, याचेही दाखले दिले आहेत. शुक्रवारी ७ सप्टेंबर रोजी हा प्रस्ताव राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोलापूर विभागाचे प्रकल्प संचालक यांना पाठविण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर त्याच्या पाठपुराव्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने आशादायी पाऊल उचलण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींकडूनही यासाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. या रस्त्यावर जात असलेले बळी रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या या प्रयत्नांवर नागरिक जागृती मंचनेही लक्ष ठेवले आहे.रस्त्याच्या निविदेचा : खडतर प्रवास...सांगली-शिरोली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिले होते. एकूण काम १४५ कोटी रुपयांचे होते. त्यासाठी दोन वर्षांची मुदत दिली होती. स्वीकृत किंमत १९६ कोटी रुपये आणि टोलची मुदत २२ वर्षे ९ महिने दिली होती. कंपनीने यातील ८५ टक्के काम पूर्ण केले होते; मात्र अचानक काम रद्द करून हा मार्ग राष्टÑीय महामार्गाला जोडला गेला. याविरोधात ही कंपनी सध्या लवादाकडे दाद मागत आहे. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती व उर्वरित कामांची जबाबदारी अधांतरी आहे. त्यातच या रस्त्याचे काम सुरू असताना अंकली ते कोल्हापूर या मार्गातील भूसंपादनाचे अडथळे दूर झाले होते. केवळ अंकली ते सांगली या मार्गावरील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तेथे अडथळे आले, मात्र ते सोडविण्याचा प्रयत्न फारसा झाला नाही. त्यातच शिरोली ते अंकली व तिथून मिरज असा मार्ग आता राष्टÑीय महामार्गात गेला आहे. केवळ अंकली ते सांगली हा चार किलोमीटरचा पट्टा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेला आहे. त्यामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. हा रस्ता खड्ड्यांनी भरला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीroad safetyरस्ते सुरक्षा