शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली कृषी योजना हस्तांतरण; मुख्यमंत्र्यांना भेटणार: सुहास बाबर -- राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या सभापतींचे शिष्टमंडळ जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:10 IST

सांगली : कृषी विभागाच्या योजना शासनाच्या विभागाकडे वर्ग होत असल्याच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे कृषी सभापती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती सुहास बाबर यांनी शुक्रवारी सांगितले. शेतकºयांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर बारा शेतकºयांची सल्लागार समिती नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.कृषी समितीची सभा बाबर ...

सांगली : कृषी विभागाच्या योजना शासनाच्या विभागाकडे वर्ग होत असल्याच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे कृषी सभापती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती सुहास बाबर यांनी शुक्रवारी सांगितले. शेतकºयांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर बारा शेतकºयांची सल्लागार समिती नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी समितीची सभा बाबर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील अनेक योजना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्याचा घाट घातला जात आहे. जिल्हा परिषदेचे अधिकार कमी करण्याचा डाव असल्याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. शासन चुकीच्या पद्धतीने योजनांचे हस्तांतरण करीत आहे. सध्या जिल्हा परिषदेकडे असलेल्या बायोगॅस आणि विशेष घटक योजनाही वर्ग करुन कृषी विभागाला टाळे लावावे, अशी मागणी संतप्त सदस्यांनी केली. ७३ वी घटना दुरुस्ती आणि शासन निर्णय सप्टेंबर २००० नुसार झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील कृषी विभागाच्या सभापतींनी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपाध्यक्ष बाबर यांनी सांगितले.

आधुनिकीकरणाव्दारे शेती करण्याकडे कल वाढत आहे, मात्र त्यामध्ये अनेक अडचणीही निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर बारा तज्ज्ञ शेतकºयांची सल्लागार समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. तालुका आणि जिल्हा परिषद गटामध्ये सल्लागार समिती नियुक्त करण्यात येईल. समितीच्या माध्यमातून शेतकºयांशी चर्चा करुन कृषी संबंधित कार्यक्रम घेण्यासाठी गटस्तरावर आखणी केली जाईल. शेतकºयांच्या येणाºया अडचणीवर मात करण्यासाठी चर्चासत्र आयोजित करणे, नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कामही करण्यात येईल.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण तसेच सेंद्रिय शेतीबाबत माहिती देऊन सक्षमीकरण करण्यात येणार आहे.महावितरण कंपनीकडून अटल सौर कृषी पंप योजनेची मुदत ३१ डिसेंबरला संपणार आहे. योजनेबाबत शेतकºयांपयंत माहिती मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकºयांपर्यंत सौर कृषी योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी सभापती सुहास बाबर यांनी दिल्या आहेत.कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी जिल्ह्यात राबविल्या जाणाºया योजनांचा आढावा समिती सदस्यांसमोर सादर केला.शेतकºयांपर्यंत योजना कधी पोहोचणार?जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या सर्व योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचत होत्या; पण सात ते आठ योजना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे गेल्यामुळे तेथील निधी खर्च होतो, योजना मात्र शेतकºयापर्यंत पोहोचत नाहीत. अनेक शेतकºयांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागच माहीत नाही. असे असतानाही जिल्हा परिषद बंद पाडण्याचा राज्य सरकार का प्रयत्न करीत आहे, असा संतप्त सवाल कृषी समितीमधील सदस्यांनी उपस्थित केला.