शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

सांगली कृषी योजना हस्तांतरण; मुख्यमंत्र्यांना भेटणार: सुहास बाबर -- राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या सभापतींचे शिष्टमंडळ जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:10 IST

सांगली : कृषी विभागाच्या योजना शासनाच्या विभागाकडे वर्ग होत असल्याच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे कृषी सभापती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती सुहास बाबर यांनी शुक्रवारी सांगितले. शेतकºयांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर बारा शेतकºयांची सल्लागार समिती नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.कृषी समितीची सभा बाबर ...

सांगली : कृषी विभागाच्या योजना शासनाच्या विभागाकडे वर्ग होत असल्याच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे कृषी सभापती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती सुहास बाबर यांनी शुक्रवारी सांगितले. शेतकºयांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर बारा शेतकºयांची सल्लागार समिती नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी समितीची सभा बाबर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील अनेक योजना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्याचा घाट घातला जात आहे. जिल्हा परिषदेचे अधिकार कमी करण्याचा डाव असल्याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. शासन चुकीच्या पद्धतीने योजनांचे हस्तांतरण करीत आहे. सध्या जिल्हा परिषदेकडे असलेल्या बायोगॅस आणि विशेष घटक योजनाही वर्ग करुन कृषी विभागाला टाळे लावावे, अशी मागणी संतप्त सदस्यांनी केली. ७३ वी घटना दुरुस्ती आणि शासन निर्णय सप्टेंबर २००० नुसार झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील कृषी विभागाच्या सभापतींनी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपाध्यक्ष बाबर यांनी सांगितले.

आधुनिकीकरणाव्दारे शेती करण्याकडे कल वाढत आहे, मात्र त्यामध्ये अनेक अडचणीही निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर बारा तज्ज्ञ शेतकºयांची सल्लागार समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. तालुका आणि जिल्हा परिषद गटामध्ये सल्लागार समिती नियुक्त करण्यात येईल. समितीच्या माध्यमातून शेतकºयांशी चर्चा करुन कृषी संबंधित कार्यक्रम घेण्यासाठी गटस्तरावर आखणी केली जाईल. शेतकºयांच्या येणाºया अडचणीवर मात करण्यासाठी चर्चासत्र आयोजित करणे, नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कामही करण्यात येईल.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण तसेच सेंद्रिय शेतीबाबत माहिती देऊन सक्षमीकरण करण्यात येणार आहे.महावितरण कंपनीकडून अटल सौर कृषी पंप योजनेची मुदत ३१ डिसेंबरला संपणार आहे. योजनेबाबत शेतकºयांपयंत माहिती मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकºयांपर्यंत सौर कृषी योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी सभापती सुहास बाबर यांनी दिल्या आहेत.कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी जिल्ह्यात राबविल्या जाणाºया योजनांचा आढावा समिती सदस्यांसमोर सादर केला.शेतकºयांपर्यंत योजना कधी पोहोचणार?जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या सर्व योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचत होत्या; पण सात ते आठ योजना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे गेल्यामुळे तेथील निधी खर्च होतो, योजना मात्र शेतकºयापर्यंत पोहोचत नाहीत. अनेक शेतकºयांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागच माहीत नाही. असे असतानाही जिल्हा परिषद बंद पाडण्याचा राज्य सरकार का प्रयत्न करीत आहे, असा संतप्त सवाल कृषी समितीमधील सदस्यांनी उपस्थित केला.