शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाळू ठेके पुन्हा ‘पर्यावरण’च्या कात्रीत

By admin | Updated: December 10, 2014 23:55 IST

जिल्ह्यात वाळूची टंचाई : २३ रोजी निर्णय शक्य, ५१ प्लॉटचा प्रस्ताव सादर

अंजर अथणीकर - सांगली -एकीकडे बांधकामासाठी वाळूला मोठी मागणी असताना, दुसरीकडे जिल्ह्यातील वाळू ठेक्यांचे प्रस्ताव राज्य पर्यावरण समितीच्या कात्रीत सापडले आहेत. काही तांत्रिक मुद्द्यांवरुन हे प्रस्ताव रखडले आहेत. आता यावर २३ डिसेंबररोजी निर्णय शक्य असून, याबाबत आपली बाजू मांडण्यासाठी खणीकर्म अधिकारी नागपूरला जात आहेत. जिल्ह्यातील वाळू प्लॉटमधील उपशाची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाळू उपसा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे वाळू चोरीचा प्रकार वाढला असून, तस्करीही वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने वाळू उपशासाठी ५१ प्लॉट निश्चित केले असून, यासाठी परवानगी मिळावी म्हणून राज्याच्या पर्यावरण समितीकडे प्रस्ताव पाठविले आहेत. याबाबत २९ नोव्हेंबररोजी पर्यावरण समितीपुढे सुनावणी झाली. मात्र जिल्ह्यातील वाळू प्लॉटमधील उपशाला परवानगी मिळाली नाही. पर्यावरण समितीने काही तांत्रिक मुद्यांवर उपशाला परवानगी नाकारली आहे. आता नव्याने भूजल विभागासह अनेक परवाने घेऊन पुन्हा एकदा वाळू उपशाचे प्रस्ताव पर्यावरण समितीपुढे ठेवण्यात आले आहेत. यासाठी आता २३ डिसेंबररोजी नागपूर येथे पर्यावरण समितीपुढे सुनावणी होत आहे. यासाठी प्रभारी जिल्हा खणीकर्म अधिकारी देवदत्त ठोमरे व इतर अधिकारी जात आहेत.जिल्ह्यात गतवर्षी एकूण ५१ वाळू प्लॉटचे लिलाव झाले होते. यामधून सुमारे तीस कोटींचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाला होता. यावर्षी ५१ वाळू प्लॉटच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले असून, यासाठी संबंधित ग्रामसभेची मंजुरी घेण्यात आली आहे. पर्यावरण समितीच्या मंजुरीनंतर येत्या जानेवारीपासून वाळू प्लॉटच्या लिलाव प्रक्रियेस प्रारंभ होण्याची शक्यता आहे. ३० सप्टेंबरपासून वाळू उपसा बंद झाल्याने जिल्ह्यात वाळूची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी डेपोमध्ये ठेवलेल्या वाळूची चोरुन विक्री सुरु आहे. वाळूच्या तुटवड्याने बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या मजुरीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे आता बांधकाम व्यावसायिकांबरोबरच बांधकाम कामगारांचे २३ रोजी होणाऱ्या पर्यावरण समितीच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कर्नाटकातील चोरटी वाळू वाहतूकही बंदवाळू ठेक्याची मुदत संपल्याने व कर्नाटकातून येणारी चोरटी वाळू बंद झाल्याने सांगली, मिरजेत वाळूची टंचाई निर्माण झाली आहे. अथणीजवळ वाळू माफियांनी तहसीलदारांवर हल्ला चढविल्याने कर्नाटकातून वाळू बंद झाल्यामुळे वाळूचे दर भडकून बांधकामे बंद पडली आहेत. टंचाईमुळे वाळूचे दर भडकले असून, वाळूच्या एका ट्रकची किंमत ३५ ते ४० हजारांपर्यंत गेली आहे. वाळूचे दर परवडत नसल्याने छोटी-मोठी बांधकामे बंद पडल्याने मंजुरांच्या रोजगारावर संक्रांत आली आहे. कर्नाटकातून चोरट्या वाळूवर प्रतिबंधासाठी कागवाडच्या प्रमुख चौकात सीसीटीव्हीसह अन्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील वाळू यापुढेही बंद राहिल्यास स्थानिक वाळूला मागणी वाढणार आहे.सोलापूर जिल्ह्यात बेगमपूर येथून येणाऱ्या चोरट्या वाळूवर मिरजेत तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली असल्याने वाळू मिळणे कठीण झाले आहे. कर्नाटकातील घटनेचे परिणाममिरज : सप्टेंबरअखेर वाळू उपसा ठेका बंद झाल्यानंतर कर्नाटकातून चोरटी वाळू आयात सुरू होती. कागवाड, अथणी परिसरातून मोठ्या प्रमाणात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात वाळू आणण्यात येते. चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई व खटले दाखल झाले, तरी वाळू वाहतूक थांबलेली नाही. गेल्या आठवड्यात अथणीजवळ नागनूर येथे अथणीचे तहसीलदार एस. एस. पुजारी यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला करून तहसीलदारांच्या गाडीची मोडतोड केली. या घटनेनंतर कागवाड व अथणी तालुक्यातून होणाऱ्या चोरट्या वाळू वाहतुकीवर प्रशासनाने कठोर निर्बंध घातले आहेत.