शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संयुक्त किसान मोर्चाने मोदींच्या शपथग्रहणदिनी पाळला काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:27 IST

संयुक्त किसान मोर्चातर्फे बुधवारी काळा दिवस पाळत घराघरावर काळे झेंडे फडकावण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : प्रधानमंत्रीपदी नरेंद्र ...

संयुक्त किसान मोर्चातर्फे बुधवारी काळा दिवस पाळत घराघरावर काळे झेंडे फडकावण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदींचे २६ मे २०१४ रोजी झालेले शपथग्रहण म्हणजे भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केले आहे. त्यानुसार बुधवारी (दि. २६) जिल्हाभरात मोर्चातर्फे घराघरावर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावले.

मोर्चाच्या चलो दिल्ली किसान आंदोलनालाही आजच सहा महिने पूर्ण झाले. शिवाय ३० मे २०१९ रोजी मोदी यांनी दुसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. केंद्रीय कामगार संघटनांच्या देशव्यापी संपालाही सहा महिने पूर्ण झाले. याचे स्मरण करत मोर्चाने काळा दिवस पाळला.

मोर्चाने भूमिका स्पष्ट केली की, गेली सात वर्षे सत्तेतील मोदी सरकारने मोठ्या आश्वासनांपैकी एकही पाळले नाही. कष्टकऱ्यांच्या इच्छा-आकांक्षांच्या विरोधात बेदरकार वागत आहे. लोकसभेतील पाशवी बहुमताच्या जोरावर मनमानी करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेजबाबदारपणामुळे हजारो लोकांचे जीव जात आहेत. महामारीशी दोन हात करण्याची जबाबदारी झटकून संपूर्ण ओझे राज्यांच्या खांद्यावर टाकले आहे. लसींच्या मात्रा, ऑक्सिजन, रुग्णालयांतील खाटा, मृतांचे अंत्यसंस्कार या सर्वच बाबतीत धोकादायक स्थिती आहे. भांडवलदारांच्या फायद्यासाठी बनवलेले कायदे मंजूर करवून घेण्यासाठीच महामारीचा उपयोग मोदी सरकार करून घेत आहे.

जिल्ह्यात उमेश देशमुख, दिगंबर कांबळे, रेहाना शेख, तुळशीराम गळवे, हणमंत कोळी, वसंत कदम, गुलाब मुलाणी, मीना कोळी आदींनी आंदोलनाचे नियोजन केले.

चौकट

मदतीच्या आघाडीवर सरकारला लकवा

असंघटित कामगार, स्थलांतरितांना या काळात धान्य, रोख रक्कम आणि रोजगाराची गरज आहे; पण मदतीच्या आघाडीवर सरकारला लकवा झाला आहे. कोविडसाठी निधी नसताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी मात्र २० हजार कोटींची उधळपट्टी सुरू आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी काळा दिवस पाळण्यात आला.