शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरणार...

By admin | Updated: March 8, 2015 00:20 IST

मनोज आखरे : आठव्या महाअधिवेशनास सांगलीत सुरुवात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार

सांगली : इतर बऱ्याच पक्ष, संघटनांनी राजकारणात जे कपटकारण केले ते आमची संघटना कधीही करणार नाही. भविष्यात संभाजी ब्रिगेडला समाजकारणाचा विचार घेऊन राजकारणात उतरावे लागेल, असेही स्पष्ट संकेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे यांनी आज (शनिवारी) संघटनेच्या महाअधिवेशनात दिले. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने सांगलीत आठव्या राज्य महाअधिवेशनास आज सुरुवात झाली. उद्घाटनाच्या सत्रात प्रदेशाध्यक्ष आखरे म्हणाले की, ब्राह्मणी प्रतिगामी विचार पुन्हा प्रबळ होऊ पहात आहेत. त्यांच्याविरोधात लढण्यासाठी आता ब्रिगेडला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. आपण मैदानात उतरलो नाही, तर आपल्याला गोळ््या घातल्या जातील. हिंमत असेल तर भ्याड हल्ला करणाऱ्या ब्राह्मणी व्यवस्थेने रस्त्यावर यावे, आम्हीही रस्त्यावर येऊ. कोणात किती बळ आहे, ते दिसून येईल. ब्रिगेडवर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. ही संघटना हिंसेचा पुरस्कार करणारी आहे, असेही म्हटले जाते. प्रत्यक्षात अन्यायाविरोधात लढण्याला हिंसा म्हटले जात नाही. शहीद भगतसिंगांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. त्यामुळे न्याय्य हक्कासाठी आम्ही लढत राहू. ‘अडवा आणि जिरवा’ या पद्धतीला आम्ही राजकारणाऐवजी कपटकारण असे म्हणतो. समाजकारणालाच राजकारण समजणाऱ्या शिवरायांचे विचार घेऊन आम्ही राजकीय मैदानात उतरू. आ. जगन्नाथ शिंदे म्हणाले की, ब्रिगेडने दुय्यम श्रेणीतील नोकऱ्यांमध्येही बहुजन समाजाची मुले समाविष्ट व्हावीत, त्यांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर केवळ नोकऱ्यांवरच विसंबून न राहता स्वयंरोजगारातून समाजातील तरुणांनी स्वत:ला सिद्ध करावे. अन्य धर्माचा आदर करूनच राजकारणात काम केले पाहिजे.मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे म्हणाले की, राजकारणात काम करताना अन्य राजकीय पक्षांनी व नेत्यांनी केले त्याच गोष्टी अपेक्षित नाहीत. समाजकारणाच्या दृष्टीने त्यांनी राजकारणात उतरावे. तरुणांचा केवळ आर्थिक विकास करून चालणार नाही. त्यांच्या सर्वंकष विकासाचे धोरण स्वीकारून काम करावे. राष्ट्रवादीचे वैभव शिंदे यांनीही भाषण केले. महापालिका विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, माजी आमदार हाफिज धत्तुरे, डॉ. संजय पाटील, स्वागताध्यक्ष तथा उद्योजक सतीश चव्हाण, दिनकर पाटील, पप्पू पाटील-भोयर, निर्मला पाटील, श्रीरंग पाटील, सौरभ खेडेकर उपस्थित होते. ब्राह्मणवाद्यांकडूनच पानसरेंची हत्याकॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, शहीद अशोक कामटे, विजय साळसकर यांच्या हत्या ब्राह्मणवाद्यांनीच केल्या आहेत, असा गंभीर आरोप ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी यावेळी केला. आम्ही ब्राह्मणवाद्यांविरोधात रस्त्यावर उतरलो नाही, तर आमचाही अशाचपद्धतीने बळी जाईल, असेही ते म्हणाले. विचारांची संस्कृती हवी महापौर विवेक कांबळे म्हणाले की, ज्यावेळी आम्ही चळवळीच्या माध्यमातून संघर्ष करीत होतो, त्यावेळी काही ब्राह्मणवाद्यांनी आम्हाला विरोध केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रतिगामींना विरोध करण्याचा जो विचारांचा मार्ग दाखवून दिला आहे, त्या विचाराची संस्कृती घेऊन पुढे गेले पाहिजे.