शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्चपासून मानधन रखडले; कुटुंबाची आर्थिक कोंडी

By संतोष भिसे | Updated: May 21, 2023 15:29 IST

राज्य सरकारच्या हिश्श्याची ४० टक्के रक्कम अद्याप मिळालेली नाही

सांगली :  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. दरमहा ५ तारखेपूर्वी यांना मानधन मिळायला हवे असा शासनाचा अध्यादेश आहे, तरीही त्याचे पालन होत नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. दोन महिने मानधन नसल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.मार्च आणि एप्रिल या महिन्यांचे मानधन मिळण्याच्या प्रतीक्षेत कर्मचारी आहेत. मानधनासाठी कर्मचारी संघटनांनी शासनाकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्यानंतर केंद्राच्या हिश्श्याची मार्च महिन्याची ६० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाली. मात्र राज्य सरकारच्या हिश्श्याची ४० टक्के रक्कम अद्याप मिळालेली नाही.

अनेक अंगणवाड्यांमध्ये कर्मचारीच पोषण आहार बऱ्याच शिजवून देतात. कार्यालयीन कामकाजाचा खर्च, तालुक्याला बैठकांसाठीचा याचा खर्च भागवणे मुश्किल झाले आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्याची बिले वेळेत तयार न केल्याने काही तालुक्यांचे पैसे परत गेले. ते परत केव्हा मिळणार? याची शाश्वती नाही.

वाढीव मानधनाचा पत्ताच नाहीअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधानात वाढीची घोषणा सरकारने काही महिन्यांपूर्वी केली होती. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी एप्रिल महिन्याच्या मानधनापासून होणार होती. या महिन्याचे मानधन १ हजार ५०० रुपयांनी वाढून येणार होते. पण ते जमा झालेच नाही.

वाढत्या महागाईत अंगणवाडी कर्मचारी एकेक रुपयासाठी महाग आहेत. या स्थितीत सरकारने प्रत्येक महिन्यात ५ तारखेला मानधन जमा केले पाहिजे. प्रशासकीय खर्चाची बिलेही वेळेत दिले पाहिजेत. पण सध्या खेळखंडोबा सुरु आहे.- कमलताई परुळेकर, अंगणवाडी कर्मचारी महासभा

टॅग्स :Sangliसांगली