शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्चपासून मानधन रखडले; कुटुंबाची आर्थिक कोंडी

By संतोष भिसे | Updated: May 21, 2023 15:29 IST

राज्य सरकारच्या हिश्श्याची ४० टक्के रक्कम अद्याप मिळालेली नाही

सांगली :  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. दरमहा ५ तारखेपूर्वी यांना मानधन मिळायला हवे असा शासनाचा अध्यादेश आहे, तरीही त्याचे पालन होत नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. दोन महिने मानधन नसल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.मार्च आणि एप्रिल या महिन्यांचे मानधन मिळण्याच्या प्रतीक्षेत कर्मचारी आहेत. मानधनासाठी कर्मचारी संघटनांनी शासनाकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्यानंतर केंद्राच्या हिश्श्याची मार्च महिन्याची ६० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाली. मात्र राज्य सरकारच्या हिश्श्याची ४० टक्के रक्कम अद्याप मिळालेली नाही.

अनेक अंगणवाड्यांमध्ये कर्मचारीच पोषण आहार बऱ्याच शिजवून देतात. कार्यालयीन कामकाजाचा खर्च, तालुक्याला बैठकांसाठीचा याचा खर्च भागवणे मुश्किल झाले आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्याची बिले वेळेत तयार न केल्याने काही तालुक्यांचे पैसे परत गेले. ते परत केव्हा मिळणार? याची शाश्वती नाही.

वाढीव मानधनाचा पत्ताच नाहीअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधानात वाढीची घोषणा सरकारने काही महिन्यांपूर्वी केली होती. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी एप्रिल महिन्याच्या मानधनापासून होणार होती. या महिन्याचे मानधन १ हजार ५०० रुपयांनी वाढून येणार होते. पण ते जमा झालेच नाही.

वाढत्या महागाईत अंगणवाडी कर्मचारी एकेक रुपयासाठी महाग आहेत. या स्थितीत सरकारने प्रत्येक महिन्यात ५ तारखेला मानधन जमा केले पाहिजे. प्रशासकीय खर्चाची बिलेही वेळेत दिले पाहिजेत. पण सध्या खेळखंडोबा सुरु आहे.- कमलताई परुळेकर, अंगणवाडी कर्मचारी महासभा

टॅग्स :Sangliसांगली