शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

सदाशिवराव पाटील यांचा प्रदेश कॉँग्रेस उपाध्यक्षपदाचा राजीनामा

By admin | Updated: February 26, 2017 00:44 IST

नेतृत्वावर टीका; गटबाजी, व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा आरोप

विटा : कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. मागील वर्षभरात कॉँग्रेसच्या सर्वच नेत्यांना जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटबाजी संपविण्यात अपयश आले. त्यातच व्यक्तिकेंद्रित राजकारण, गटबाजी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी झाल्याने त्याचा दृश्य परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झाल्याचे त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.सदाशिवराव पाटील आणि जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम गटात गेल्या काही वर्षांपासून धुसफूस सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करीत उमेदवार उतरविले होते. शिवाय काँग्रेसचे ‘ए बी’ फॉर्म नाकारले होते. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या भाळवणी गटातून काँग्रेसच्या एकमेव अधिकृत उमेदवाराविरुद्धही उमेदवार उभा केला होता. मात्र, खानापूर आणि आटपाडी तालुक्यांमध्ये पक्षाची एकही जागा निवडून येऊ शकली नाही. शनिवारी त्यांनी प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात व जिल्ह्यात पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. मागील वर्षभरात सर्वच नेत्यांना जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटबाजी संपविण्यात अपयश आले आहे व नजीकच्या काळात यात फारसा फरक होईल, असे वाटत नसल्याचे पाटील यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.पक्षातील अंतर्गत गटबाजी, व्यक्तिकेंद्रित राजकारण व प्रामाणिक कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी आणि याचा दृश्य परिणाम म्हणून निवडणुकीत पक्षाची सुमार कामगिरी झाली. याची जबाबदारी स्वीकारून प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दत्तोपंत चोथे यांचाही राजीनामासदाशिवराव पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच कॉँग्रेसचे विटा शहराध्यक्ष दत्तोपंत चोथे यांनीही प्रदेशाध्यक्षांकडे पदाचा राजीनामा पाठविला आहे. माजी आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरात कॉँग्रेसचे काम करीत असून, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे. शिवाय गटबाजी आणि व्यक्तिकेंद्रित राजकारण होत असल्याने त्याला कंटाळून कॉँग्रेसच्या विटा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे चोथे यांनी सांगितले.