शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सदाशिवराव पाटील यांचा प्रदेश कॉँग्रेस उपाध्यक्षपदाचा राजीनामा

By admin | Updated: February 26, 2017 00:44 IST

नेतृत्वावर टीका; गटबाजी, व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा आरोप

विटा : कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. मागील वर्षभरात कॉँग्रेसच्या सर्वच नेत्यांना जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटबाजी संपविण्यात अपयश आले. त्यातच व्यक्तिकेंद्रित राजकारण, गटबाजी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी झाल्याने त्याचा दृश्य परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झाल्याचे त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.सदाशिवराव पाटील आणि जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम गटात गेल्या काही वर्षांपासून धुसफूस सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करीत उमेदवार उतरविले होते. शिवाय काँग्रेसचे ‘ए बी’ फॉर्म नाकारले होते. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या भाळवणी गटातून काँग्रेसच्या एकमेव अधिकृत उमेदवाराविरुद्धही उमेदवार उभा केला होता. मात्र, खानापूर आणि आटपाडी तालुक्यांमध्ये पक्षाची एकही जागा निवडून येऊ शकली नाही. शनिवारी त्यांनी प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात व जिल्ह्यात पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. मागील वर्षभरात सर्वच नेत्यांना जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटबाजी संपविण्यात अपयश आले आहे व नजीकच्या काळात यात फारसा फरक होईल, असे वाटत नसल्याचे पाटील यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.पक्षातील अंतर्गत गटबाजी, व्यक्तिकेंद्रित राजकारण व प्रामाणिक कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी आणि याचा दृश्य परिणाम म्हणून निवडणुकीत पक्षाची सुमार कामगिरी झाली. याची जबाबदारी स्वीकारून प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दत्तोपंत चोथे यांचाही राजीनामासदाशिवराव पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच कॉँग्रेसचे विटा शहराध्यक्ष दत्तोपंत चोथे यांनीही प्रदेशाध्यक्षांकडे पदाचा राजीनामा पाठविला आहे. माजी आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरात कॉँग्रेसचे काम करीत असून, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे. शिवाय गटबाजी आणि व्यक्तिकेंद्रित राजकारण होत असल्याने त्याला कंटाळून कॉँग्रेसच्या विटा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे चोथे यांनी सांगितले.