शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

इस्लामपुरात विरोधकांच्या गाडीला सदाभाऊंचे इंधन

By admin | Updated: July 7, 2016 00:27 IST

नगरपालिका निवडणूक : सुसाट धावणाऱ्या जयंत एक्स्प्रेसला रोखण्याचा जोरदार प्रयत्न

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर इस्लामपूर नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीची ‘जयंत एक्स्प्रेस’ सुसाट धावत आहे. आर्थिक इंधन नसलेल्या विरोधकांच्या गाडीत मात्र अंतर्गत मतभेद आणि अहंपणा असल्याने त्यांच्या गाडीचा वेग मंदावला आहे. विरोधकांच्या पाठीशी राज्यातील सत्ताकेंदे्र आहेत. त्यातच शहरात वास्तव्य करणारे आमदार सदाभाऊ खोत यांना मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. ते मंत्री झाल्यास विरोधकांच्या मंदावलेल्या गाडीचा वेग वाढणार आहे. यातूनच जयंत एक्स्प्रेसला रोखण्याचा प्रयत्न होणार आहे. इस्लामपूर शहराचा विकास हा ज्वलंत प्रश्न आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या तारांकित कल्पनेतून पुढे आलेल्या विकास कामांचे तीनतेरा वाजले आहेत. पालिकेच्या सभागृहात विरोधकांची तीन डोकी आहेत. परंतु त्यांनी वेगवेगळ्या टोप्या घातल्या आहेत. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी शहराचा नियोजित विकास आराखडा स्वत:च्या मालमत्ता वाचवून आणि बेकायदेशीर गोष्टी कायदेशीर करुन स्वबळावर मंजूर केला आहे. विरोधकांची राज्यात सत्ता असतानाही त्यांना इस्लामपुरातील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सभागृहाला धक्का लावता आला नाही. त्यामुळे विरोधकांची ताकद असून नसल्यासारखीच आहे. विस्कटलेल्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी खासदार राजू शेट्टी आणि मंत्रीपदाच्या उंबरठ्यावर असलेले आमदार सदाभाऊ खोत सरसावले आहेत. या दोघांना शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांची साथ राहणार आहे. त्यांनाही कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळणार असल्याचे वृत्त आहे. त्यावरही बरीच समीकरणे अवलंबून आहेत. मागील निवडणुकीत विरोधकांच्या बाजूने खासदार राजू शेट्टी, शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत यांच्यासह सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांची ताकद होती. परंतु राज्यात सत्ता नसल्याने ही ताकद अत्यंत तोकडी पडली. आता राज्यात भाजपची सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याकडे मंत्रीपद नाही. तरीही विविध संस्थांवर असलेल्या प्राबल्यामुळे ‘जयंत एक्स्प्रेस’ या भागात सुसाट आहे. येणाऱ्या काळात आमदार सदाभाऊ खोत, शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळाले तरी, ते जयंत एक्स्प्रेसला रोखण्यात कितपत यशस्वी होतात, हे दिसून येणार आहे. याकडे सर्वांचे लक्षही लागले आहे. मंत्रीपदानंतरच मैदानात उतरण्याची तयारी! येणाऱ्या दोन दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. वाळवा—शिराळ्यातील सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मंत्री झाल्यानंतरच ते पालिकेच्या रणांगणात उतरणार असल्याचे विरोधकांतून बोलले जात आहे.