शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांची हकालपट्टी करून गुन्हा दाखल करा, संयुक्त किसान मोर्चाची मागणी

By संतोष भिसे | Updated: October 3, 2023 17:59 IST

मंत्री मिश्रा यांच्या मुलाने चार शेतकरी व एक पत्रकाराच्या अंगावर जीप घालून ठार मारले होते. या घटनेला दोन वर्षे पूर्ण 

सांगली : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करून गुन्हा दाखल करावा यासाठी संयुक्त किसान मोर्चाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. गुन्हेगार व्यक्तींना सरकारने पाठीशी घालू नये अशी मागणी केली. किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी नेतृत्व केले. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याने ३ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे चार शेतकरी व एक पत्रकाराच्या अंगावर जीप घालून ठार मारले होते. या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही गुन्हेगार आशिष मिश्रा मोकाट आहे. त्याचे वडील मंत्री अजय मिश्रा दबाव टाकत असल्याने ठोस कारवाईमध्ये अडचणी येत आहेत. मंत्रीपदाचा गैरवापर करून गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मिश्रा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे.देशमुख यांनी सांगितले की, कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष ब्रीजभूषण सिंह याच्यासह अनेक गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे कृत्य केंद्र सरकार करत आहे.  उत्तर प्रदेशातील प्रशासन पूर्णत: गुन्हेगारांच्या हातात गेले आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चा देशभर निदर्शने करत आहे.सांगलीत निदर्शनामध्ये देशमुख यांच्यासह विजय बचाटे, नंदकुमार हत्तीकर, नितीन मिरजकर, उत्तम कुसळे, वसंत कदम, वर्षा गडचे आदी सहभागी झाले.

टॅग्स :SangliसांगलीHome Ministryगृह मंत्रालय