शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

एमआयडीसीतील परप्रांतीय कामगारांची गावाकडे परतण्याची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:24 IST

सांगली : राज्यात पुन्हा लॉकडाऊनची तयारी सुरू झाल्याने परप्रांतीय कामगार धास्तावलेल्या स्थितीत आहेत. बेरोजगारीच्या स्थितीत अडकून पडण्याची भीती असल्याने ...

सांगली : राज्यात पुन्हा लॉकडाऊनची तयारी सुरू झाल्याने परप्रांतीय कामगार धास्तावलेल्या स्थितीत आहेत. बेरोजगारीच्या स्थितीत अडकून पडण्याची भीती असल्याने स्थलांतराला सुरुवात झाली आहे. याचा धसका उद्योजकांनीही घेतला आहे. कामगारांअभावी उद्योगांची चक्रे ठप्प होण्याची भीती त्यांच्यापुढे आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दररोजची संख्या आता पाचशेपार गेली आहे. संपूर्ण राज्यातील स्थिती गंभीर असल्याने लॉकडाऊन सुरू होणार हे निश्चित आहे; पण ते केव्हा आणि किती काळ? हे अद्याप निश्चित नाही. या अनिश्चिततेमुळे परप्रांतीय कामगार वर्ग प्रचंड भीतीमध्ये आहे. सांगली, मिरज, कुपवाड अैाद्योगिक वसाहतींत हजारोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार आहेत. विशेषत: छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, ओडिशा येथून स्थलांतराचे प्रमाण मोठे आहे. लॉकडाऊनला तोंड देण्याची त्यांची तयारी आहेे; पण ते किती लांबणार, हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. त्यामुळेच कोणताही धोका पत्करण्याची त्यांची तयारी नाही. गेल्या लॉकडाऊनमध्ये झालेले हाल ते विसरलेले नाहीत. त्यावेळी आपापल्या गावाकडे निघून गेलेले अनेक कामगार पुन्हा परतलेदेखील नाहीत.

लाॅकडाऊनचे ढग फिरू लागताच कामगारांचे स्थलांतरही सुरू झाले आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेसाठी मिरज जंक्शनमध्ये गर्दी दिसत आहे. खासगी लक्झरीसाठी कुटुंबकबिल्यासह गर्दी करणारे कामगार दिसत आहेत. औद्योगिक वसाहतीत फाउन्ड्री उद्योगातून स्थलांतराचे प्रमाण मोठे आहे. त्याशिवाय रंग, रसायने, कापड, खाद्य प्रक्रिया, कृषिप्रक्रिया, फेब्रिकेशन आदी उद्योगांतूनही कामगार बाहेर पडत आहेत.

चौकट

लॉकडाऊनमधील हाल अद्याप स्मरणात

गेल्या लॉकडाऊनमध्ये वेळीच घराकडे न गेलेल्या कामगारांना उपासमारीला तोंड द्यावे लागले होते. उद्योजकांनी काही काळ मदत केली; पण लॉकडाऊन लांबल्याने कारखाने बंद पडले, त्यामुळे उद्योजकांनीही हात आखडता घेतला. परिणामी अनेक कामगारांना महापालिकेच्या निवारागृहात आश्रय घेण्याची वेळ आली होती.

कोट

गेल्यावर्षी दिवाळीपर्यंत गावाकडेच राहिलो होतो. कारखाना सुरू होताच परत आलो. आता पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने पत्नी व मुलांना गावाकडे पाठवून दिले. मी एकटाच थांबलो आहे. लॉकडाऊन झाले तरी एकट्याचे हाल होणार नाहीत, असे वाटते. कंपनीकडून मिळणाऱ्या मदतीवर दिवस काढता येतील.

- रमेशकुमार वालिया, फाउन्ड्री कामगार

कुपवाडमध्ये फाउन्ड्रीत ३० जण एकत्र काम करतो. लॉकडाऊनमध्ये काम बंद होण्याच्या भीतीने १० जण गेल्या आठवड्यात निघून गेले. कंपनी व्यवस्थापनाने लॉकडाऊनमध्येही मदतीची हमी दिल्याने आम्ही थांबलो आहोत. लॉकडाऊन किती लांबेल याचा अंदाज नाही, त्यामुळे धाकधूक आहे. गावाकडे गेलो तरी आता काम नाही, त्यामुळे येथेच थांबणार आहे.

- नीरज देहडा, फाउन्ड्री कामगार

- महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या बातम्या पाहून घरच्या लोकांचे फोन येत आहेत. काम सोडून परत येण्यासाठी दबाव येतोय. तरीही आम्ही १५-२० कामगार थांबून आहोत. लॉकडाऊन लांबले तर काम मिळण्याचा भरोसा नाही, त्यामुळे एक-दोन दिवसांत आम्ही गावी जायच्या तयारीत आहोत.

- सर्वेश चौधरी, फेब्रिकेशन कामगार

चौकट

कामगार परतले तर न भरून येणारे नुकसान

लॉकडाऊनच्या बातम्या ऐकून परप्रांतीय कामगार आताच परतीच्या मार्गावर आहेत. हीच स्थिती राहिली तर उत्पादन ५० टक्क्यांवर घसरेल. गेल्या चार-पाच महिन्यांत उद्योगचक्रे गती घेत होती, ती पुन्हा विस्कळीत होतील. गेल्यावेळी गावाकडे गेलेले अनेक कामगार अजूनही आलेले नाहीत, उरलेसुरले गेले तर कारखान्यांना कुलपे लावण्याची वेळ येईल.

- विनोद पाटील, उद्योजक

संभाव्य लॉकडाऊनमध्ये उद्योगांचा समावेश करण्याचे सरकारचे संकेत नाहीत, त्यामुळे कामगार अद्याप थांबून आहेत. गेल्यावर्षी गेलेले कामगार शंभर टक्के परतलेले नाहीत; पण उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे उद्योग सुरू आहेत. यंदाचा लॉकडाऊन लांबला आणि त्यामध्ये उद्योगांचाही समावेश केला तर मात्र स्थिती बिकट होईल.

- सतीश मालू, उद्योजक

कामगार निघून जाऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या लसीकरणासाठी औद्योगिक वसाहतीतच सोय करण्याचा प्रयत्न आहे. सध्या लांब पल्ल्याच्या काही रेल्वे सुरू आहेत. त्यामुळे कामगारांचा कल गावाकडे निघून जाण्याचा आहे. तसे झाल्यास उद्योग कोलमडल्याशिवाय राहणार नाहीत.

- गणेश निकम, व्यवस्थापक, सांगली, मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

पॉइंटर्स

कामगार कुठे किती?

औद्योगिक वसाहतीतील कामगार - ३०,०००

हॉटेल व्यवसाय - १५ हजार

बांधकाम क्षेत्र- ३५ हजार