शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यात अद्याप बोगस वैदूंची चलती

By admin | Updated: March 23, 2015 00:34 IST

प्रबोधन हवेच : पोलिसांकडूनही कडक कारवाई होण्याची गरज

अशोक पाटील -इस्लामपूर-लाडेगाव (ता. वाळवा) येथील वैदूचा उपचार चव्हाट्यावर आल्यानंतर इस्लामपूर पालिकेने सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना एकत्रित करून बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी बैठक बोलावली. पालिकेने असे प्रबोधन करण्यापेक्षा जेथे बोगसपणे वैद्यकीय उपचार केले जातात, त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्यासह सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या वैदूंची आजही चलती आहे.‘दारू सोडवायची आहे? चला लाडेगावला’, ‘कुत्रे चावले? चला कऱ्हाड तालुक्यातील वाघेरीला’, ‘मूतखडा पाडायचाय? चला पन्हाळा तालुक्यातील कोतोलीला’, ‘कावीळ झाली आहे? चला इस्लामपूरला’, अशा मौखिक जाहिराती सध्या जोरात सुरू आहेत. आयुर्वेदिक व झाडपाल्याची औषधे देणाऱ्या स्वयंघोषित आयुर्वेदाचार्यांची यात चलती आहे. इस्लामपूर शहरातील गल्ली-बोळात रुग्णालये थाटून मूळव्याध, भगेंद्रावर उपाय करणाऱ्या बंगाली बाबूंचीही संख्या वाढू लागली आहे. अशा डॉक्टरांना बहुतांशी रुग्ण बळी पडत आहेत.ग्रामीण भागातून आजही अघोरी उपाय करणारे वैदू आहेत. साप, विंचू चावलेल्यांच्या कानात तंबाखूचे पाणी पिळले जाते. हे पाणी पिळल्यानंतर विषाचा उतारा होतो, असा गैरसमज आहे. विविध आजारांवर झाडपाल्याची औषधे देणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात काहीजण नावापुढे एम. डी. पदवी लावून व्यवसाय करतानाही दिसत आहेत. अशा डॉक्टरांवरही कारवाई करणे गरजेचे आहे.इस्लामपूर शहर व ग्रामीण भागातील असे काही डॉक्टर आहेत, की त्यांना कायदेशीर व्यवसाय करता येत नाही. तेही आज महिलांची प्रसुती करणे, टाके घालणे आदी प्रकार करत आहेत. अशांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अघोरी उपचार पध्दती...मोठ्या शहरात मूळव्याध व भगेंद्र याची शस्त्रक्रिया करण्यासाठी २० ते २५ हजार रुपये आकारले जातात. परंतु गल्ली-बोळात दुकान थाटलेल्या बंगाली डॉक्टरांकडून मूळव्याधीची शस्त्रक्रिया अत्यल्प दरात, परंतु अघोरी पध्दतीने केली जाते. त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. या डॉक्टरांना मेडिकल असोसिएशनची मान्यता तरी आहे का, याची तपासणी होणे आवश्यक आहे.