शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या कर्जवाटपात १२९ कोटींची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:19 IST

जिल्हा बॅँकेच्या कर्जवाटपात १२९ कोटींची घट

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कर्जमाफीसाठी शासनाकडून थकबाकीची तारीख जून २०१७ पर्यंतची गृहीत धरली जाईल, अशी आशा बाळगलेले जिल्ह्यातील ४० हजार शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यामुळे नव्या कर्जासाठी ते अपात्र ठरले आहेत. या गोंधळात गतवर्षाच्या तुलनेत जिल्हा बॅँकेच्या एकूण खरीप पिकाच्या कर्जवाटपात यंदा १२९ कोटींची घट झाली आहे. सांगली जिल्हा बॅँकेने १४ जुलैअखेर खरीप हंगामासाठी एकूण ३४३ कोटी ७९ लाख ५६ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ४७२ कोटी ८६ लाख ३२ हजार कोटींचे कर्जवाटप झाले होते. यावर्षीचे खरीप उद्दिष्ट ५३६ कोटी ७० लाखांचे आहे. जून २०१६ पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व अन्य सवलतींच्या योजनेचा लाभ होणार आहे. जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही यात समाविष्ट करून घेतले जाईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे जून २0१६ ते जून २0१७ पर्यंत कर्जाचे हप्ते न भरलेले चाळीस हजारांवर शेतकरी थकबाकीत गेले आहेत. परिणामी ते नव्या कर्जासाठी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा १२९ कोटी रुपयांची घट कर्जवाटपात दिसून येते. जिल्हा बॅँकेला उद्दिष्टपूर्तीसाठी अजूनही बराच कालावधी असल्याने बॅँकेला या गोष्टीने काही फरक पडणार नाही. याऊलट थकबाकीदार शेतकऱ्यांपुढील अडचणीत वाढ झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत थकबाकी जमा करून नियमित कर्जदारांच्या यादीत जाण्याची व २५ हजारांची सवलत मिळविण्याची त्यांना संधी मिळू शकते. याशिवाय नव्या कर्जासाठीही ते पात्र ठरणार आहेत. त्यामुळे अशा अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेने थकबाकी भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कर्जपुरवठा १५६ कोटी १५ लाख ९७ हजार इतका करण्यात आला आहे. त्याखालोखाल द्राक्ष, सोयाबीन, ज्वारी या पिकांसाठी कर्जपुरवठा केला आहे. गतवर्षाच्या तुलनेत कर्जवाटपाचे आकडे कमी असले तरी, सप्टेंबरपर्यंत उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आता प्रशासनाने कंबर कसली आहे. शेतकऱ्यांनी थकबाकी भरुन अनेक योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा ९७७ कोटींचे उद्दिष्टजिल्हा बँकेला यंदा खरीप व रब्बीचे एकूण पीक कर्ज उद्दिष्ट ९७७ कोटी रुपयांचे आहे. यामध्ये खरिपाचे ५३६ कोटी ७0 लाखांचे, तर रब्बीचे ४४0 कोटी ३0 लाखांचे उद्दिष्ट आहे. खरिपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास कोणतीही अडचण जिल्हा बँकेला वाटत नाही. तरीही त्यासाठी आता प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पेरणी कर्जासाठी मागणी नाहीपेरणी कर्जासाठी जिल्हा बँकेने सर्व तयारी केलेली असताना, अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. दीड लाखावर ज्यांचे कर्ज आहे, अशा कर्जदारांनी दीड लाखाव्यतिरिक्त असणारी रक्कम भरल्याशिवाय तो कर्जास पात्र ठरत नाही. त्यामुळे दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना त्यासाठी उर्वरित रक्कम जमा करावी लागणार आहे. जिल्हा बँकेने शासनाच्या नियमांच्या आधारेच कर्जवाटपाचे धोरण राबविले आहे. पीकनिहाय कर्जवाटपपीक सभासद कर्जऊस २५,५४९१५६,१५,९७,000द्राक्ष ७,६८९१00,६५,८९,000ज्वारी ६,0६१११,९0,५६,000सोयाबीन३,६५0८,१४,४0,000डाळिंब५,३१६ ३५,९८,९३,000भात ४४६१,0७,८३,000हळद ६४ २७,५९,000भुईमूग४३३९६,५३,000बाजरी १,६५१३,२१,६0,000कापूस ९,0२११६,५५,२३,000