शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हा बॅँकेच्या कर्जवाटपात १२९ कोटींची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:19 IST

जिल्हा बॅँकेच्या कर्जवाटपात १२९ कोटींची घट

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कर्जमाफीसाठी शासनाकडून थकबाकीची तारीख जून २०१७ पर्यंतची गृहीत धरली जाईल, अशी आशा बाळगलेले जिल्ह्यातील ४० हजार शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यामुळे नव्या कर्जासाठी ते अपात्र ठरले आहेत. या गोंधळात गतवर्षाच्या तुलनेत जिल्हा बॅँकेच्या एकूण खरीप पिकाच्या कर्जवाटपात यंदा १२९ कोटींची घट झाली आहे. सांगली जिल्हा बॅँकेने १४ जुलैअखेर खरीप हंगामासाठी एकूण ३४३ कोटी ७९ लाख ५६ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ४७२ कोटी ८६ लाख ३२ हजार कोटींचे कर्जवाटप झाले होते. यावर्षीचे खरीप उद्दिष्ट ५३६ कोटी ७० लाखांचे आहे. जून २०१६ पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व अन्य सवलतींच्या योजनेचा लाभ होणार आहे. जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही यात समाविष्ट करून घेतले जाईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे जून २0१६ ते जून २0१७ पर्यंत कर्जाचे हप्ते न भरलेले चाळीस हजारांवर शेतकरी थकबाकीत गेले आहेत. परिणामी ते नव्या कर्जासाठी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा १२९ कोटी रुपयांची घट कर्जवाटपात दिसून येते. जिल्हा बॅँकेला उद्दिष्टपूर्तीसाठी अजूनही बराच कालावधी असल्याने बॅँकेला या गोष्टीने काही फरक पडणार नाही. याऊलट थकबाकीदार शेतकऱ्यांपुढील अडचणीत वाढ झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत थकबाकी जमा करून नियमित कर्जदारांच्या यादीत जाण्याची व २५ हजारांची सवलत मिळविण्याची त्यांना संधी मिळू शकते. याशिवाय नव्या कर्जासाठीही ते पात्र ठरणार आहेत. त्यामुळे अशा अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेने थकबाकी भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कर्जपुरवठा १५६ कोटी १५ लाख ९७ हजार इतका करण्यात आला आहे. त्याखालोखाल द्राक्ष, सोयाबीन, ज्वारी या पिकांसाठी कर्जपुरवठा केला आहे. गतवर्षाच्या तुलनेत कर्जवाटपाचे आकडे कमी असले तरी, सप्टेंबरपर्यंत उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आता प्रशासनाने कंबर कसली आहे. शेतकऱ्यांनी थकबाकी भरुन अनेक योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा ९७७ कोटींचे उद्दिष्टजिल्हा बँकेला यंदा खरीप व रब्बीचे एकूण पीक कर्ज उद्दिष्ट ९७७ कोटी रुपयांचे आहे. यामध्ये खरिपाचे ५३६ कोटी ७0 लाखांचे, तर रब्बीचे ४४0 कोटी ३0 लाखांचे उद्दिष्ट आहे. खरिपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास कोणतीही अडचण जिल्हा बँकेला वाटत नाही. तरीही त्यासाठी आता प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पेरणी कर्जासाठी मागणी नाहीपेरणी कर्जासाठी जिल्हा बँकेने सर्व तयारी केलेली असताना, अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. दीड लाखावर ज्यांचे कर्ज आहे, अशा कर्जदारांनी दीड लाखाव्यतिरिक्त असणारी रक्कम भरल्याशिवाय तो कर्जास पात्र ठरत नाही. त्यामुळे दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना त्यासाठी उर्वरित रक्कम जमा करावी लागणार आहे. जिल्हा बँकेने शासनाच्या नियमांच्या आधारेच कर्जवाटपाचे धोरण राबविले आहे. पीकनिहाय कर्जवाटपपीक सभासद कर्जऊस २५,५४९१५६,१५,९७,000द्राक्ष ७,६८९१00,६५,८९,000ज्वारी ६,0६१११,९0,५६,000सोयाबीन३,६५0८,१४,४0,000डाळिंब५,३१६ ३५,९८,९३,000भात ४४६१,0७,८३,000हळद ६४ २७,५९,000भुईमूग४३३९६,५३,000बाजरी १,६५१३,२१,६0,000कापूस ९,0२११६,५५,२३,000