शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

साहित्यिकांची भूमिका माणसे जोडणारी असावी: प्रभाकर साळेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:40 IST

पलूस : साहित्यिकांची भूमिका ही माणसे जोडणारी असली पाहिजे. प्रवाह कोणतेही असोत, ते एकत्र यावेत आणि अभिजात व्हावेत, तरच माय मराठीचा महासागर होईल. मराठी साहित्याने प्रतिक्रियांच्या बदलाची नोंद अधिक सकसतेने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी केले.पलूस येथील श्री समर्थ साहित्य व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने आयोजित सोळाव्या ...

पलूस : साहित्यिकांची भूमिका ही माणसे जोडणारी असली पाहिजे. प्रवाह कोणतेही असोत, ते एकत्र यावेत आणि अभिजात व्हावेत, तरच माय मराठीचा महासागर होईल. मराठी साहित्याने प्रतिक्रियांच्या बदलाची नोंद अधिक सकसतेने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी केले.पलूस येथील श्री समर्थ साहित्य व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने आयोजित सोळाव्या परिवर्तन साहित्य संमेलनात साळेगावकर बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक प्रा अनिल बोधे यांच्याहस्ते झाले.प्रा. बोधी म्हणाले, शिक्षणाची जी अवस्था आहे, तीच साहित्याची आहे. प्रशासन व्यवस्थेची तपासणी होणे गरजेची आहे. चांगल्या साहित्याचा सन्मान झाला पाहिजे.मंडळाचे अध्यक्ष किरण शिंदे यांनी स्वागत केले. रवींद्र येवले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कवी संजय चौधरी, सुप्रिया जाधव, दिवाकर सदाशिव, संघमित्रा खंडारे यांना तसेच भानुदास आंबी यांच्या काव्यसंग्रहांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. धनदत्त बोरगावे, सुनील तोरणे, किरण सावंत, अशोक पवार, साहेबलाल शेख, संजय पवार, ज्योती मोहळकर, दास मोरे, रमेश खंडागळे, जयश्री शिंदे, बजरंग आंबी, माया गडदे, संजय कुंभार, दि. बा. पाटील आदींचा सत्कार झाला.दुसऱ्या सत्रात ऋषिकेश खारगे, आलिशा मोहिते यांचे ‘संत साहित्य’ या विषयावर विचारमंथन झाले. तिसºया सत्रात चंद्रलेखा बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यावेळी व्ही. वाय. पाटील, ज्ञानेश्वर कोळी, डॉ. अमोल पवार, किरण शिंदे, कुमार गायकवाड, संजय तोडकर, रवींद्र येवले, जयवंत मोहिते, शशिकांत रेपाळ आदी उपस्थित होते.लेखणीला सकारात्मक दिशा हवीसाळेगावकर म्हणाले, कृषिविषयक जाणिवा साहित्याच्या सर्व प्रकारातून आल्या आहेत व येत आहेत. घुसमटीचे नवे संदर्भ शोधणाºया सक्षम लेखणीला सकारात्मक दिशा मिळणे गरजेचे आहे.