शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनात सरपंचांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST

सांगली : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची असून, सरपंचांनी या कामी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे ...

सांगली : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्यात सरपंचांची भूमिका महत्त्वाची असून, सरपंचांनी या कामी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘सरपंच स्वच्छता संवाद’ या ऑनलाइन संवाद उपक्रमात पालकमंत्री पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात दि. २५ ऑगस्टपासून १०० दिवसांचे “स्थायित्व व सुजलाम अभियान” राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापन करण्याकरिता शोषखड्ड्यांची निर्मिती केली जात आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी यात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे म्हणाल्या, जिल्ह्यात शोष खड्डे करून सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक व अधिकारी यांचे सहकार्य आवश्यक आहे. या यंत्रणेला जिल्हा परिषद सर्व मदत करण्यास तयार आहे.

यावेळी सावळवाडी, ता. मिरजचे सरपंच राजकुमार उपाध्ये व भटवाडी, ता. शिराळाचे सरपंच विजय महाडिक यांनी आपला स्वच्छतेतील अनुभव सहभागी सरपंचासमोर व्यक्त केला. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांनी आभार मानले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक दिलीप मस्के यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

घर तिथे नळ जोडणी देणार : जितेंद्र डुडी

मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठाबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. यात सरपंचांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी व प्रत्येक घरी नळजोडणी देणे हा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता यासोबत होणाऱ्या बाबी असून, सरपंचांच्या सकरात्मक सहभागाशिवाय शक्य नाही.