शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

भाजीपाल्यांच्या दरातील वाढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू केलेले कडक निर्बंध आणि आठवडा बाजारासह इतर सर्व व्यवहार बंद असल्यामुळे भाजीपाल्यांचे दर या ...

सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू केलेले कडक निर्बंध आणि आठवडा बाजारासह इतर सर्व व्यवहार बंद असल्यामुळे भाजीपाल्यांचे दर या आठवड्यात पुन्हा वाढले आहेत. खाद्यतेलाची आवक पुन्हा एकदा घटल्याने या आठवड्यात पुन्हा दर वाढले आहेत.

कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी आठवडा बाजारासह इतर बाजारपेठ बंद आहे. यामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. फळभाज्यांच्या दरात पुन्हा वाढ होत प्रतिकिलो ८० रूपयांनी भाजी मिळत आहे.

चौकट

या आठवड्यात वांगी, दोडका, गवारी आदी भाज्या सरासरी ६० ते ८० रूपये प्रतिकिलोने मिळत आहेत. वाढत्या उन्हाळ्यामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. शेवग्यासह मेथी, पालक या भाज्यांचे दर वाढले आहेत. बाजार बंद असले तरी घरोघरी जावून विक्रते भाज्यांची विक्री करत आहेत.

चौकट

तेलदराचा पुन्हा भडका

कडक निर्बंध आणि त्यामुळे वाहतुकीसह इतर नियमांमुळे किराणा सामानाच्या आवकेवर अडचणी येत आहेत. त्यात गेल्या महिनाभरापासून स्थिर असलेले खाद्यतेलाचे दर पुन्हा वाढले आहेत. सुर्यफूल आणि सरकी तेलाची आवक ‌ वाढली आहे.

चौकट

कडक निर्बंधांमुळे लागू असलेल्या अत्यावश्यक सेवांमध्ये फळ विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. तरीही ग्राहकांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे आवक कमीच आहे. या आठवड्यात आंब्याची आवक वाढली आहे. कोकणातील आंब्याची आवक अद्यापही तुलनेने कमी आहे.

कोट

उन्हाळा वाढल्याने भाजीपाल्यांचे उत्पादन घटत चालले आहे. त्यात कोरोनामुळे बाहेरच्या मोठ्या बाजारपेठेतून मागणी वाढत असल्याने स्थानिक भाजीपाला कमी पडत आहे. या आठवड्यात दर पुन्हा वाढतील, असाच अंदाज आहे.

- सुभाष पाटील, भाजी विक्रेते

कोट

कडक निर्बंध असले तरी किराणा मालाची आवक होत आहे. मात्र, मागणीएवढी आवक होत नाही. परराज्यातून येणारा माल घटला आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा तेलाचे दर वाढले असले तरी गहू, तांदूळ, ज्वारीचे दर स्थिर आहेत.

- अनिल घोरपडे, व्यापारी

कोेट

आठवडा बाजार बंद असल्याने अडचणी येत आहेत. दारात येणाऱ्या भाजीपाल्याचे दर वाढीव आहेत. सगळे व्यवहार बंद असल्याने दर वाढल्याचे व्यापारी सांगतात. आता शासनानेच दर स्थिर ठेवून दिलासा द्यावा.

- कविता माने, गृहिणी