शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

म्हैसाळ योजनेतील पाण्याची पळवापळवी

By admin | Updated: March 21, 2016 00:42 IST

शेतकऱ्याविरुध्द पोलिसात तक्रार : संतोषवाडीकडे जाणारे पाणी अडविले; नियोजनातील गोंधळ

सदानंद औंधे --मिरज --उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे ‘म्हैसाळ’चे पाणी पळविण्याचे प्रकार वाढत आहेत. लिंगनूर शाखा कालव्यातून संतोषवाडीकडे जाणारे पाणी अडविल्याबद्दल गायकवाडवाडी येथील शेतकऱ्याविरूध्द ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. दोन दिवसापूर्वी कळंबी शाखा कालव्याचे पाणी अडविण्याचा प्रकार घडला. म्हैसाळ कालव्यातून पाच टप्प्यातून ४५ पंपांद्वारे पाणी उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात पाणी सोडण्यात आले आहे. पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात येत आहे. मात्र पाण्याची गरज मोठी असल्याने कालवा अडविण्याचे, कालवा फोडण्याचे, पाण्याची दिशा वळविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.गेल्या आठवड्यात आरगजवळ कालव्यात जेसीबीने बांध घालून पाणी अडविण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांनी रात्री कालव्यावर पोलिसांची गस्त सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी लिंगनूर शाखा कालव्याचे गेट पळवून, संतोषवाडीकडे जाणारे पाणी अडविण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मनोज गायकवाड या शेतकऱ्याविरूध्द पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. कळंबी शाखा कालव्यावर पाणी अडवून ते वळविण्यात आले. पाणी वापराच्या नियोजनात बदलामुळे गोंधळ उडाला होता. पाणी अडविणाऱ्या व पळविणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी सांगितले जत वंचितच : महिना झाला तरी पाणी नाही...आवर्तन सुरू होऊन एक महिना झाला तरी, अद्याप जत तालुक्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. टंचाईची तीव्रता वाढत असल्याने जत तालुक्यात पाणी सोडावे, यासाठी मोठा दबाव आहे. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यात पोटकालव्यातून वितरण सुरू ठेवून जत तालुक्यात पाणी पोहोचणे कठीण असल्याने, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील वितरण बंद करावे लागणार आहे. येत्या चार दिवसात जत तालुक्यात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. आजवरची सर्वात जास्त वसुलीयोजना कार्यान्वित झाल्यापासून आजअखेर जास्तीत जास्त पाणीपट्टी वसुली ६0 लाखांपर्यंत गेली होती. यंदा २ कोटी रुपये शेतकऱ्यांनी जमा केले आहेत. याशिवाय कारखान्यांनी ३ कोटी, असे एकूण ५ कोटी रुपये जमा झाले आहेत. अजूनही शेतकरी पैसे भरत आहेत. त्यामुळे आणखी दीड कोटी रुपये जमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आवर्तन मेअखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. जत आणि सांगोल्याचे पैसे जमा झाल्यानंतर पुन्हा वसुलीचा आकडा वाढणार आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्यांकडून दीडपट वसुली...म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी साखर कारखान्यांनी तीन कोटी रूपये भरले आहेत. मात्र आवर्तन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून आणखी दोन कोटी रूपये जमा झाले आहेत. पाणीपट्टी न भरणाऱ्या व मागणी न नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांकडून दीडपट आकारणी करण्यात येणार असल्याचे ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.