शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

म्हैसाळ योजनेतील पाण्याची पळवापळवी

By admin | Updated: March 21, 2016 00:42 IST

शेतकऱ्याविरुध्द पोलिसात तक्रार : संतोषवाडीकडे जाणारे पाणी अडविले; नियोजनातील गोंधळ

सदानंद औंधे --मिरज --उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे ‘म्हैसाळ’चे पाणी पळविण्याचे प्रकार वाढत आहेत. लिंगनूर शाखा कालव्यातून संतोषवाडीकडे जाणारे पाणी अडविल्याबद्दल गायकवाडवाडी येथील शेतकऱ्याविरूध्द ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. दोन दिवसापूर्वी कळंबी शाखा कालव्याचे पाणी अडविण्याचा प्रकार घडला. म्हैसाळ कालव्यातून पाच टप्प्यातून ४५ पंपांद्वारे पाणी उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात पाणी सोडण्यात आले आहे. पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात येत आहे. मात्र पाण्याची गरज मोठी असल्याने कालवा अडविण्याचे, कालवा फोडण्याचे, पाण्याची दिशा वळविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.गेल्या आठवड्यात आरगजवळ कालव्यात जेसीबीने बांध घालून पाणी अडविण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांनी रात्री कालव्यावर पोलिसांची गस्त सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी लिंगनूर शाखा कालव्याचे गेट पळवून, संतोषवाडीकडे जाणारे पाणी अडविण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मनोज गायकवाड या शेतकऱ्याविरूध्द पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. कळंबी शाखा कालव्यावर पाणी अडवून ते वळविण्यात आले. पाणी वापराच्या नियोजनात बदलामुळे गोंधळ उडाला होता. पाणी अडविणाऱ्या व पळविणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी सांगितले जत वंचितच : महिना झाला तरी पाणी नाही...आवर्तन सुरू होऊन एक महिना झाला तरी, अद्याप जत तालुक्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. टंचाईची तीव्रता वाढत असल्याने जत तालुक्यात पाणी सोडावे, यासाठी मोठा दबाव आहे. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यात पोटकालव्यातून वितरण सुरू ठेवून जत तालुक्यात पाणी पोहोचणे कठीण असल्याने, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील वितरण बंद करावे लागणार आहे. येत्या चार दिवसात जत तालुक्यात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. आजवरची सर्वात जास्त वसुलीयोजना कार्यान्वित झाल्यापासून आजअखेर जास्तीत जास्त पाणीपट्टी वसुली ६0 लाखांपर्यंत गेली होती. यंदा २ कोटी रुपये शेतकऱ्यांनी जमा केले आहेत. याशिवाय कारखान्यांनी ३ कोटी, असे एकूण ५ कोटी रुपये जमा झाले आहेत. अजूनही शेतकरी पैसे भरत आहेत. त्यामुळे आणखी दीड कोटी रुपये जमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आवर्तन मेअखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. जत आणि सांगोल्याचे पैसे जमा झाल्यानंतर पुन्हा वसुलीचा आकडा वाढणार आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्यांकडून दीडपट वसुली...म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी साखर कारखान्यांनी तीन कोटी रूपये भरले आहेत. मात्र आवर्तन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून आणखी दोन कोटी रूपये जमा झाले आहेत. पाणीपट्टी न भरणाऱ्या व मागणी न नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांकडून दीडपट आकारणी करण्यात येणार असल्याचे ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.