शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

संघर्षातून रिक्षाचालकांत हाणामारी

By admin | Updated: February 15, 2015 00:49 IST

मिरजेतील प्रकार : रेल्वे आवारात पॅगोंना प्रवेश बंदी

मिरज : मिरजेत तीन आसनी व पॅगो रिक्षाचालकांत पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला असून, हाणामारीचे प्रकार सुरू आहेत. पॅगो व तीन आसनी रिक्षाचालकांनी आपापली हद्द ठरवून घेतली असून, परस्परांच्या हद्दीत प्रवेश बंदी लागू केली आहे. रेल्वे स्थानकाच्या आवारात पॅगो रिक्षा चालकांना प्रतिबंधाचा फलक लावण्यात आला असून, प्रतिबंध आदेशाचे उल्लंघन केल्यास अप्रिय घटनेचा इशारा देण्यात आला आहे. दोन गटात अनेकदा हाणामाऱ्यांचे प्रकार घडले आहेत. वाहतूक पोलीस व परिवहन विभागाने तत्पुरता तोडगा काढून या वादावर मलमपट्टी करण्याचे धोरण आहे. मात्र यामुळे पॅगो व तीन आसनी चालक शहरात प्रवासी वाहतुकीचा अधिकार कोणाचा, यावरून वारंवार आमने-सामने येत आहेत. चार दिवसांपूर्वी बसस्थानकाच्या आवारात प्रवासी घेण्याच्या कारणावरून रिक्षाचालकांच्या दोन गटात मारामारी झाली. त्यानंतर दोन्ही गटात तडजोड होऊन बसस्थानक व रेल्वेस्थानक आवारातून प्रवासी वाहतूक करण्यास पॅगो रिक्षांना प्रतिबंध घालण्यात आला. बसस्थानक व रेल्वेस्थानकाच्या दरम्यान पोस्ट आॅफिसजवळ पॅगो रिक्षाचा नवीन थांबा करण्यात आला असून, तेथून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्याचे तीन आसनी रिक्षाचालक संघटनेचे अजमुद्दीन खतीब व पॅगो रिक्षाचालक संघटनेचे महेश चौगुले यांनी सांगितले. मात्र तडजोडीनंतरही रिक्षाचालकांनी परस्परांच्या हद्दीचे उल्लंघन करू नये, यासाठी रेल्वेस्थानकाच्या आवारात पॅगो रिक्षांना प्रतिबंधाचा फलक लावण्यात आला आहे. रिक्षाचालकांतील संघर्ष व त्यांच्यातील तडजोड, हद्द निश्चित करण्याच्या प्रकाराबाबत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी मात्र मौनाची भूमिका घेतली आहे. (वार्ताहर)