शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
3
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
4
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
5
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
6
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
7
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
8
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
10
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
11
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
12
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
13
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
14
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
15
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
16
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
17
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
18
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
19
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
20
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

समृध्द वारसा.. विशाल जनसंपर्क... : अमित ऊर्फ विशाल(दादा) पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST

क्रांतिकारकांचा तालुका अशी ओळख असलेल्या तासगाव तालुक्यात तासगाव पंचायत समितीचे पहिले सभापती होण्याचा मान येळावीच्या बाबासाहेबदादा पाटील यांना मिळाला ...

क्रांतिकारकांचा तालुका अशी ओळख असलेल्या तासगाव तालुक्यात तासगाव पंचायत समितीचे पहिले सभापती होण्याचा मान येळावीच्या बाबासाहेबदादा पाटील यांना मिळाला होता. त्यानंतर १९६७ ते १९७७ या कालावधीत बाबासाहेबदादांनी तासगाव तालुक्याचे आमदारपद भूषविले. त्यांचे सुपुत्र विजयअण्णा पाटील १९९२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. २००५ मध्ये पंचायत समितीचे सभापती झाले. या दोन्ही नेत्यांनी समाजाला प्रथमप्राधान्य देत विकास कामांचा झंझावात निर्माण केला. अशा समाजाभिमुख नेतृत्व असणाऱ्या बाबासाहेबदादांचे नातू आणि विजयअण्णांचे चिरंजीव अमित ऊर्फ विशालदादांनीदेखील तोच वारसा पुढे कायम ठेवण्याची कामगिरी केली.

अतिशय तरुण वयात अमित पाटील यांची २००४ मध्ये येळावी ग्रामपंचायत सदस्य म्हणून एंट्री झाली. गावात कामाचा ठसा उमटवल्यानंतर २००७ मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाले. पंचायत समितीत आल्यानंतर अभ्यासू वृत्तीने अनेक शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी, सामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली. केवळ राजकीय वारसाच नव्हे, तर स्वत:च्या कर्तृत्वाने सामाजिक, विधायक आणि विकासात्मक राजकारणाचा वारसा जोपासण्याचे काम अमितदादांनी केले. स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून अमितदादांनी जनतेच्या मनात स्वत:चे एक वेगळे वलय निर्माण केले. त्यातूनच तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात कामांतून एक वेगळे वलय निर्माण झाले.

२०११ मध्ये वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अमितदादांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पुन्हा २०१६ मध्ये कारखान्याचे संचालक म्हणून निवड झाली. साखर कारखान्यावर संचालक म्हणून गेल्यानंतर २०११ पासून जोरदारपणे कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी हिताला प्राधान्य देत शेतकर्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज आणि पलूस तालुक्यात दांडगा जनसंपर्क तयार झाला. पूर्णवेळ जनतेच्या कामासाठी वाहून घेतलेल्या अमितदादांनी स्वत:च्या कामाच्या शैलीतून लोकांची मने तर जिंकलीच, शिवाय सर्वसामान्यांच्या अडीअडचणींत धावून जाण्याच्या स्वभावामुळे लोकांनाही हक्काचा नेता मिळाला.

आश्‍वासक आणि कर्तृत्वमय नेतृत्वामुळे अमितदादांनी तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, पलूस तालुक्यातील जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. तळागाळापर्यंत जनसंपर्क ठेवून पूर्णवेळ समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या अमितदादांना भावी राजकीय, सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा! जनतेच्या मनातील नेतृत्वाच्या यशाचा आलेख उंचावत राहो, हीच यानिमित्ताने सदिच्छा!

चौकट :

सर्वसामान्यांचे नेतृत्व :

तासगाव तालुक्यातील संधी साधून राजकारणाचा पॅटर्न अनेकदा दिसून आला. याच पॅटर्नमधून तालुक्यात एकेकाळी आबा-काका ऐक्य एक्स्प्रेस धावली. त्यावेळी आबा आणि काका या दोन नेत्यांनी एकत्रित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात २००७ मध्ये अमितदादांनी येळावी गणातून पंचायत समिती निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. त्याचवेळी सर्वसामान्यांच्या कर्तृत्ववान नेतृत्वाची मोहोर अमितदादांच्या नेतृत्वावर उमटली.