शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

समृध्द वारसा.. विशाल जनसंपर्क... : अमित ऊर्फ विशाल(दादा) पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST

क्रांतिकारकांचा तालुका अशी ओळख असलेल्या तासगाव तालुक्यात तासगाव पंचायत समितीचे पहिले सभापती होण्याचा मान येळावीच्या बाबासाहेबदादा पाटील यांना मिळाला ...

क्रांतिकारकांचा तालुका अशी ओळख असलेल्या तासगाव तालुक्यात तासगाव पंचायत समितीचे पहिले सभापती होण्याचा मान येळावीच्या बाबासाहेबदादा पाटील यांना मिळाला होता. त्यानंतर १९६७ ते १९७७ या कालावधीत बाबासाहेबदादांनी तासगाव तालुक्याचे आमदारपद भूषविले. त्यांचे सुपुत्र विजयअण्णा पाटील १९९२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. २००५ मध्ये पंचायत समितीचे सभापती झाले. या दोन्ही नेत्यांनी समाजाला प्रथमप्राधान्य देत विकास कामांचा झंझावात निर्माण केला. अशा समाजाभिमुख नेतृत्व असणाऱ्या बाबासाहेबदादांचे नातू आणि विजयअण्णांचे चिरंजीव अमित ऊर्फ विशालदादांनीदेखील तोच वारसा पुढे कायम ठेवण्याची कामगिरी केली.

अतिशय तरुण वयात अमित पाटील यांची २००४ मध्ये येळावी ग्रामपंचायत सदस्य म्हणून एंट्री झाली. गावात कामाचा ठसा उमटवल्यानंतर २००७ मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाले. पंचायत समितीत आल्यानंतर अभ्यासू वृत्तीने अनेक शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी, सामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली. केवळ राजकीय वारसाच नव्हे, तर स्वत:च्या कर्तृत्वाने सामाजिक, विधायक आणि विकासात्मक राजकारणाचा वारसा जोपासण्याचे काम अमितदादांनी केले. स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून अमितदादांनी जनतेच्या मनात स्वत:चे एक वेगळे वलय निर्माण केले. त्यातूनच तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात कामांतून एक वेगळे वलय निर्माण झाले.

२०११ मध्ये वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अमितदादांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पुन्हा २०१६ मध्ये कारखान्याचे संचालक म्हणून निवड झाली. साखर कारखान्यावर संचालक म्हणून गेल्यानंतर २०११ पासून जोरदारपणे कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी हिताला प्राधान्य देत शेतकर्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज आणि पलूस तालुक्यात दांडगा जनसंपर्क तयार झाला. पूर्णवेळ जनतेच्या कामासाठी वाहून घेतलेल्या अमितदादांनी स्वत:च्या कामाच्या शैलीतून लोकांची मने तर जिंकलीच, शिवाय सर्वसामान्यांच्या अडीअडचणींत धावून जाण्याच्या स्वभावामुळे लोकांनाही हक्काचा नेता मिळाला.

आश्‍वासक आणि कर्तृत्वमय नेतृत्वामुळे अमितदादांनी तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, पलूस तालुक्यातील जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. तळागाळापर्यंत जनसंपर्क ठेवून पूर्णवेळ समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या अमितदादांना भावी राजकीय, सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा! जनतेच्या मनातील नेतृत्वाच्या यशाचा आलेख उंचावत राहो, हीच यानिमित्ताने सदिच्छा!

चौकट :

सर्वसामान्यांचे नेतृत्व :

तासगाव तालुक्यातील संधी साधून राजकारणाचा पॅटर्न अनेकदा दिसून आला. याच पॅटर्नमधून तालुक्यात एकेकाळी आबा-काका ऐक्य एक्स्प्रेस धावली. त्यावेळी आबा आणि काका या दोन नेत्यांनी एकत्रित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात २००७ मध्ये अमितदादांनी येळावी गणातून पंचायत समिती निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. त्याचवेळी सर्वसामान्यांच्या कर्तृत्ववान नेतृत्वाची मोहोर अमितदादांच्या नेतृत्वावर उमटली.