शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

अग्रणी पाठोपाठ महांकाली नदीचे पुनरूज्जीवन करा: राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:14 IST

नदीच्या पाण्याकडे केवळ पाणी म्हणून न पाहता, जलनीती आणि नदीशास्त्र समजून घेऊन पुनरूज्जीवनाचे उर्वरित काम पूर्ण करावे. अग्रणी नदीबरोबरच दुष्काळी जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महांकाली नदीच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रमही हाती घ्यावा, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

 

सांगली , दि.६ : नदीच्या पाण्याकडे केवळ पाणी म्हणून न पाहता, जलनीती आणि नदीशास्त्र समजून घेऊन पुनरूज्जीवनाचे उर्वरित काम पूर्ण करावे. अग्रणी नदीबरोबरच दुष्काळी जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महांकाली नदीच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रमही हाती घ्यावा, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी अग्रणी नदी पुनरूज्जीवन आढावा बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी वि. ना. काळम, कर्नाटकचे प्रशांत होन्नागोळ, अण्णासाहेब अडहळ्ळी, अ‍ॅड. संजय होनकांडे, सतीश अडहळ्ळी, रवी नागगूळ, धाराप्पा होन्नागोळ, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी उपस्थित होते.

राणा म्हणाले, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना ही खूप चांगली योजना आहे. ती शास्त्रीय पद्धतीने राबविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. या योजनेचे फलित सर्वांसाठी उपयोगी ठरणार आहे. ही योजना शास्त्रीय पद्धतीने राबविण्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही योजना शासनाची नव्हे, तर आपली सर्वांची आहे, असे मानून यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे.

कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक सागर गवते, संपतराव पवार, जलबिरादरीचे नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर, उदय गायकवाड, विलास चौथाई, श्रीपाद करंदीकर, कर्नाटकचे अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

अग्रणीचे उर्वरित काम तातडीने करू : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान आणि अग्रणी नदी पुनरूज्जीवन यांची कार्यपद्धती जलनीतीनुसार अनुसरून अग्रणी नदी प्रवाहित करण्यासाठी समन्वयाचा अभाव भरून काढून अपूर्ण कामे तात्काळ मार्गी लावू.

अग्रणी नदी पुनरूज्जीवन हे देशातील बेस्ट मॉडेल बनण्यासाठी प्रयत्न करू. तसेच, याकामी वाल्मी संस्थेची मदत घेऊ. जलसाक्षरतेसाठी यशदा संस्थेमध्ये कार्यशाळा घेऊ. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड झालेल्या १४० गावांतील प्रत्येकी ५ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.