शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

अग्रणी पाठोपाठ महांकाली नदीचे पुनरूज्जीवन करा: राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:14 IST

नदीच्या पाण्याकडे केवळ पाणी म्हणून न पाहता, जलनीती आणि नदीशास्त्र समजून घेऊन पुनरूज्जीवनाचे उर्वरित काम पूर्ण करावे. अग्रणी नदीबरोबरच दुष्काळी जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महांकाली नदीच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रमही हाती घ्यावा, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

 

सांगली , दि.६ : नदीच्या पाण्याकडे केवळ पाणी म्हणून न पाहता, जलनीती आणि नदीशास्त्र समजून घेऊन पुनरूज्जीवनाचे उर्वरित काम पूर्ण करावे. अग्रणी नदीबरोबरच दुष्काळी जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महांकाली नदीच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रमही हाती घ्यावा, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी अग्रणी नदी पुनरूज्जीवन आढावा बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी वि. ना. काळम, कर्नाटकचे प्रशांत होन्नागोळ, अण्णासाहेब अडहळ्ळी, अ‍ॅड. संजय होनकांडे, सतीश अडहळ्ळी, रवी नागगूळ, धाराप्पा होन्नागोळ, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी उपस्थित होते.

राणा म्हणाले, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना ही खूप चांगली योजना आहे. ती शास्त्रीय पद्धतीने राबविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. या योजनेचे फलित सर्वांसाठी उपयोगी ठरणार आहे. ही योजना शास्त्रीय पद्धतीने राबविण्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही योजना शासनाची नव्हे, तर आपली सर्वांची आहे, असे मानून यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे.

कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक सागर गवते, संपतराव पवार, जलबिरादरीचे नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर, उदय गायकवाड, विलास चौथाई, श्रीपाद करंदीकर, कर्नाटकचे अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

अग्रणीचे उर्वरित काम तातडीने करू : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान आणि अग्रणी नदी पुनरूज्जीवन यांची कार्यपद्धती जलनीतीनुसार अनुसरून अग्रणी नदी प्रवाहित करण्यासाठी समन्वयाचा अभाव भरून काढून अपूर्ण कामे तात्काळ मार्गी लावू.

अग्रणी नदी पुनरूज्जीवन हे देशातील बेस्ट मॉडेल बनण्यासाठी प्रयत्न करू. तसेच, याकामी वाल्मी संस्थेची मदत घेऊ. जलसाक्षरतेसाठी यशदा संस्थेमध्ये कार्यशाळा घेऊ. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड झालेल्या १४० गावांतील प्रत्येकी ५ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.