शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

मोकाट वाळू तस्करांपुढे महसूल विभाग हतबल

By admin | Updated: June 28, 2017 23:12 IST

कडेगाव तालुक्यातील चित्र : अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले चिंताजनक; कडक कारवाईची गरज

प्रताप महाडिक । -लोकमत न्यूज नेटवर्क  कडेगाव : येरळा नदीपात्रातील वाळू लुटून वाळू तस्कर मोकाट सुटले आहेत. आता महसूल विभागाच्या कारवाईला हे तस्कर जुमानतच नाहीत. वाळू तस्करांकडून या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ले होत आहेत. ही चिंतेची बाब असतानाही, राज्य शासन यावर ठोस उपाययोजना किंवा ‘मोक्का’सारखी कायदेशीर कारवाई करीत नाही. त्यामुळे या मोकाट वाळू तस्करांसमोर तालुक्यातील प्रशासन हतबल झाले आहे.वाळूच्या पैशातून गबर झालेल्या वाळू तस्करांनी नदीपात्रात अक्षरश: थैमान घातले आहे. कडेगाव तालुक्यात वडियेरायबाग, कान्हरवाडी, वांगी, नेवरी, रामापूर, शिवणी आदी गावांच्या हद्दीत पोकलँड, जेसीबीच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा सुरूच असतो. सध्या कमी-जास्त प्रमाणात गावोगावी वाळू उपसा सुरूच आहे. कारवाई झाली तरी पळवाटा शोधून हेच वाळूतस्कर पुन्हा वाळू उपसा सुरू करतात. येरळा नदीच्या वाळूची मागणी आणि महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे या नदीतील वाळूची तस्करीही वाढू लागली आहे. ही तस्करी रोखणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करणे, तसेच महसूल पथकावर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांना दमदाटी होत आहे. वाळू तस्करीतून झालेल्या अपघातात आजवर तिघांचा बळी गेला आहे, तर अनेकजण कायमचे अधू झालेले आहेत. नदीतील वाळू लुटून तस्कर मात्र मालामाल झाले आहेत. अवैध वाळू उपसा व विक्रीतून आलेल्या मुबलक पैशातून हे वाळूतस्कर कुणालाच न जुमानता साम, दाम, दंड या नीतीचा वापर करुन वाट्टेल तसा बेसुमार वाळू उपसा करतात. आतापर्यंत वाळू उपशामुळे मोजता येणार नाहीत इतके मोठमोठे खड्डे नदीपात्रात पाडले आहेत.प्रशासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कित्येक प्रांताधिकारी व तहसीलदार आले आणि गेले; परंतु येरळा नदीतील अवैध वाळूउपसा काही बंद झाला नाही. पाण्यासारखा पैसा मिळवून देणाऱ्या या अवैध व्यवसायात येणाऱ्यांची स्पर्धा वाढली आहे आणि या व्यवसायात गुन्हेगारीचा शिरकावही झाला आहे. शासनाने अशा गुंड प्रवृत्तीच्या व दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, परंतु याची कार्यवाही झाली तरच सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात यश येईल.चंद्रकांतदादांची फक्त घोषणाचअवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांकडून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर तसेच कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र आता असे हल्ले रोखण्यासाठी महसूल अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांकडून संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. वाळू तस्करांची दादागिरी मोडून काढण्यासाठी वाळू तस्करांना ‘मोक्का’ लावणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिसेंबर २०१६ मध्ये सांगलीत केली होती, परंतु अद्याप अशी एकही कारवाई झालेली नाही.संघटनांच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगयेरळाकाठी सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे काही वाळूतस्कर सामाजिक संघटनांच्या व राजकीय पक्षांच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करत प्रशासनाला, तसेच वाळूतस्करी पकडून देणाऱ्या ग्रामस्थांना खोट्या तक्रारी करून वेठीस धरत आहेत. अशा वाळू तस्करांचा बुरखा सामाजिक उठावातूनच फाटणार आहे. राजकीय नेते मात्र अशा वाळू तस्करांना थारा देत नाहीत, त्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे.