शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

रेठरेधरणचा ‘मांझी’ स्वत:च खणतोय विहीर...

By admin | Updated: May 30, 2016 00:51 IST

शेतकऱ्याची जिद्द : ऐन उन्हाळ्यात धडपड; पहार, घणाचे घाव घालून दगडाला पाझर फोडण्याचा प्रयत्न

मानाजी धुमाळ -- रेठरेधरण --धरणीमातेच्या पोटातील पाणी शोधण्यासाठी काळ्याकुट्ट दगडावर पहार व घणाचे घाव घालत विहीर खणण्याचा निर्धार रेठरेधरण (ता. वाळवा) येथील शेतकरी शहाजी कांबळे यांनी केला आहे. आतापर्यंत १७ फुटांपर्यंत विहीर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.शहाजी परशुराम कांबळे (वय ६२) यांची पूर्वीपासून शेती आहे. कांबळे यांना शेतातील कष्टाची, कामाची सवयच आहे. रेठरेधरण परिसरातील विहिरी काढून देण्याचे काम त्यांनी यापूर्वीही केले आहे. रेठरेधरण-पेठ रस्त्यालगत तांबड्या मुरमाड मातीची त्यांची अडीच एकर शेती आहे. त्या जागेत दोन वर्षांपूर्वी त्यांनी विहिरीसाठी खड्डा खणला होता. परंतु शेतातून उत्पन्नच हातात येत नसल्याने विहीर काढण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले होते.शेतातील गवत-पाल्याच्या झोपडीत ते विसावलेले असतात. यंदा पाऊसमान कमी झाल्याने शेतात काहीच काम नव्हते म्हणून त्यांनी एप्रिल महिन्यात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. सकाळी लवकर उठून पहारेच्या साहाय्याने दगड फोडण्यास सुरुवात केली. मोठ्या दगडावर हातोड्याने प्रहार करुन तो फोडायचा आणि डोक्यावरून वाहून तो विहिरीच्या बाजूला लावायचा, असा नित्यक्रम महिनाभर सुरू होता.अंगात धमक, मनगटात विश्वास व घाम गाळण्याची तयारी असेल, तर कामाच्या एकाग्रतेने अशक्य ते काम शक्य होते, हे त्यांच्या कामातून दिसून आले आहे.काळ्या दगडाचे कप्पे फोडण्यासाठी कांबळे यांनी चार दिवस सुरुंग व यारी लावून दगडांना छेद दिला. परंतु दररोज राबून विहिरीतून पाण्याच्या उमाळ्याचा त्यांचा शोध सुरु आहे. शहाजी कांबळे यांनी एकट्याने दिवस दिवसभर मेहनत करून विहिरीतील दगड फोडून ते बाहेर काढून विहिरीच्या भोवताली रचले आहेत. कोणाच्याही मदतीशिवाय त्यांनी छोटे-मोठे दगड गोलाकार पध्दतीने व्यवस्थित रचलेले आहेत. त्यांचे हे काम पाहून परिसरातील लोकांसह अनेकजण अचंबित झाले आहेत.अजून पावसाला सुरुवात झाली नसल्याने दिनक्रमात बदल न करता, न थकता, न दमता कांबळे विहीर खोदण्याच्या कामात व्यस्त आहेत. १० ते १५ दिवसांमध्ये विहिरीच्या दगडी कामाच्या बाजूला ते भराव टाकून घेणार आहेत. आतापर्यंत १७ फुटांपर्यंत विहीर काढण्याचे काम पूर्ण झाले असून, पाण्याचा अजून मागमूस नाही.निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्यावर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने दुष्काळाचे सावट ओढावले आहे. विहिरीत पाणी नाही, पाण्याविना पीक नाही. त्यामुळे हाती पैसा नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. अशा अवस्थेत शहाजी कांबळे यांनी विहीर खुदाईचे सुरू केलेले काम कौतुकास्पद आहे.१७ फुटांपर्यंत काम...विहीर खुदाईचे काम १७ फूट झाले आहे. या विहिरीतून ४० ट्रॉली दगड, कचरा, माती विहिरीच्या कडेला रचण्यात आली आहे. विहिरीतील दगड पहारेच्या साहाय्याने निघत नसल्याने नाईलाजास्तव कांबळे यांनी सुरुंग लावून चार दिवस यारीच्या साहाय्याने माती व दगड बाहेर काढले.