शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेठरेधरणचा ‘मांझी’ स्वत:च खणतोय विहीर...

By admin | Updated: May 30, 2016 00:51 IST

शेतकऱ्याची जिद्द : ऐन उन्हाळ्यात धडपड; पहार, घणाचे घाव घालून दगडाला पाझर फोडण्याचा प्रयत्न

मानाजी धुमाळ -- रेठरेधरण --धरणीमातेच्या पोटातील पाणी शोधण्यासाठी काळ्याकुट्ट दगडावर पहार व घणाचे घाव घालत विहीर खणण्याचा निर्धार रेठरेधरण (ता. वाळवा) येथील शेतकरी शहाजी कांबळे यांनी केला आहे. आतापर्यंत १७ फुटांपर्यंत विहीर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.शहाजी परशुराम कांबळे (वय ६२) यांची पूर्वीपासून शेती आहे. कांबळे यांना शेतातील कष्टाची, कामाची सवयच आहे. रेठरेधरण परिसरातील विहिरी काढून देण्याचे काम त्यांनी यापूर्वीही केले आहे. रेठरेधरण-पेठ रस्त्यालगत तांबड्या मुरमाड मातीची त्यांची अडीच एकर शेती आहे. त्या जागेत दोन वर्षांपूर्वी त्यांनी विहिरीसाठी खड्डा खणला होता. परंतु शेतातून उत्पन्नच हातात येत नसल्याने विहीर काढण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले होते.शेतातील गवत-पाल्याच्या झोपडीत ते विसावलेले असतात. यंदा पाऊसमान कमी झाल्याने शेतात काहीच काम नव्हते म्हणून त्यांनी एप्रिल महिन्यात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. सकाळी लवकर उठून पहारेच्या साहाय्याने दगड फोडण्यास सुरुवात केली. मोठ्या दगडावर हातोड्याने प्रहार करुन तो फोडायचा आणि डोक्यावरून वाहून तो विहिरीच्या बाजूला लावायचा, असा नित्यक्रम महिनाभर सुरू होता.अंगात धमक, मनगटात विश्वास व घाम गाळण्याची तयारी असेल, तर कामाच्या एकाग्रतेने अशक्य ते काम शक्य होते, हे त्यांच्या कामातून दिसून आले आहे.काळ्या दगडाचे कप्पे फोडण्यासाठी कांबळे यांनी चार दिवस सुरुंग व यारी लावून दगडांना छेद दिला. परंतु दररोज राबून विहिरीतून पाण्याच्या उमाळ्याचा त्यांचा शोध सुरु आहे. शहाजी कांबळे यांनी एकट्याने दिवस दिवसभर मेहनत करून विहिरीतील दगड फोडून ते बाहेर काढून विहिरीच्या भोवताली रचले आहेत. कोणाच्याही मदतीशिवाय त्यांनी छोटे-मोठे दगड गोलाकार पध्दतीने व्यवस्थित रचलेले आहेत. त्यांचे हे काम पाहून परिसरातील लोकांसह अनेकजण अचंबित झाले आहेत.अजून पावसाला सुरुवात झाली नसल्याने दिनक्रमात बदल न करता, न थकता, न दमता कांबळे विहीर खोदण्याच्या कामात व्यस्त आहेत. १० ते १५ दिवसांमध्ये विहिरीच्या दगडी कामाच्या बाजूला ते भराव टाकून घेणार आहेत. आतापर्यंत १७ फुटांपर्यंत विहीर काढण्याचे काम पूर्ण झाले असून, पाण्याचा अजून मागमूस नाही.निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्यावर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने दुष्काळाचे सावट ओढावले आहे. विहिरीत पाणी नाही, पाण्याविना पीक नाही. त्यामुळे हाती पैसा नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. अशा अवस्थेत शहाजी कांबळे यांनी विहीर खुदाईचे सुरू केलेले काम कौतुकास्पद आहे.१७ फुटांपर्यंत काम...विहीर खुदाईचे काम १७ फूट झाले आहे. या विहिरीतून ४० ट्रॉली दगड, कचरा, माती विहिरीच्या कडेला रचण्यात आली आहे. विहिरीतील दगड पहारेच्या साहाय्याने निघत नसल्याने नाईलाजास्तव कांबळे यांनी सुरुंग लावून चार दिवस यारीच्या साहाय्याने माती व दगड बाहेर काढले.