शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रेठरेहरणाक्षकरांना पठ्ठे बापूरावांचा पडला विसर

By admin | Updated: November 27, 2015 00:42 IST

जन्मगावीच उपेक्षा : ११ नोव्हेंबररोजी जयंती कोणीही साजरी केली नाही

ताकारी : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) हे शीघ्रकवी पठ्ठे बापूराव यांचे जन्मगाव. त्यांच्याच जन्मगावी त्यांची जयंती साजरी न झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होत आहे.श्रीधर कृष्ण कुलकर्णी ऊर्फ पठ्ठे बापूराव यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी रेठरेहरणाक्ष येथे झाला. ११ नोव्हेंबर ही त्यांची जयंती. पण गावातील ग्रामपंचायत, सहकारी संस्था, सार्वजनिक मंडळे, वाचनालय तसेच त्यांच्या नावाने सुरू असणाऱ्या विद्या विकास मंडळाच्या पठ्ठे बापूराव विद्यालयातही त्यांची जयंती साजरी करण्याचे स्वारस्य कोणीही दाखवले नाही.प्रत्येकवर्षी पठ्ठे बापूराव यांची जयंती गावामध्ये साजरी केली जाते. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. यावर्षी मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आज त्यांच्याच गावात पठ्ठे बापूराव उपेक्षित असल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत कार्यालयात अनेक थोर, महान पुरुष, साहित्यिक, समाजसुधारक यांची जयंती साजरी केली जाते. परंतु आपल्याच गावातील एका ज्येष्ठ साहित्यिकाची जयंती साजरी करण्याचे भान का राहिले नाही?, असा सवाल ग्रामस्थांकडून सध्या उपस्थित होत आहे.रेठरेहरणाक्ष जि. प. मतदार संघातील सदस्या सौ. सुनीता वाकळे या रेठरेहरणाक्ष गावच्याच आहेत. विशेष म्हणजे त्या पठ्ठे बापूराव यांच्या नावाने सुरू असणाऱ्या विद्यालयात शिक्षिका आहेत. या विद्यालयातही त्यांची जयंती साजरी झाली नाही, हे विशेष. (वार्ताहर)कोण, काय म्हणाले?११ नोव्हेंबरला दिवाळी होती. सार्वजनिक सुट्टी असल्याने कोणाच्याही लक्षात आले नाही. दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत पठ्ठे बापूराव यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. यावेळी अनवधानाने राहून गेले. यापुढे याची दक्षता घेऊन असे होणार नाही, याची खबरदारी घऊ.- जे. डी. मोरे, सरपंच, रेठरेहरणाक्षदेश व महाराष्ट्रातील थोर महापुरुष, साहित्यिक यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या कार्याला उजाळा देणे गरजेचे आहे. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या कार्याची ओळख होऊन प्रोत्साहन मिळते. पठ्ठे बापूरावांनी तमाशाच्या माध्यमातून काव्यरचना करून समाज सुधारण्याचे काम केले.- रंगरावबापू पाटील, ग्रामीण कथाकार, कामेरी