शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

जलयुक्त शिवार अभियानात सांगली जिल्ह्यातील प्रस्ताव अधिकाऱ्यांकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 13:48 IST

जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील १४० गावांचे प्रस्ताव येऊनही अधिकाऱ्यांनी परस्परच काही प्रस्ताव रद्द करून केवळ १२.६५ कोटींच्या १८४ कामांनाच मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्यांना कल्पना न देता प्रस्ताव रद्दचे अधिकार कोणी दिले?, असा सवाल करून अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

ठळक मुद्देसांगली जिल्हा परिषद समितीत वादंग ७८ प्रस्ताव पाठविले असताना, केवळ ३२ कामांनाच मंजुरी का दिली? जलव्यवस्थापन समितीची सभेत अधिकाऱ्यांना घेतले फैलावरप्रभारी कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासन

सांगली,दि. २५ :  जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील १४० गावांचे प्रस्ताव येऊनही अधिकाऱ्यांनी परस्परच काही प्रस्ताव रद्द करून केवळ १२.६५ कोटींच्या १८४ कामांनाच मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्यांना कल्पना न देता प्रस्ताव रद्दचे अधिकार कोणी दिले?, असा सवाल करून अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. मनमानी कारभार चालणार नाही, जलयुक्त शिवार योजनेचा सुधारित आराखडा करून सर्व गावांना न्याय देण्याची सूचनाही त्यांनी दिली.

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा मंगळवारी अध्यक्ष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी छोटे पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. बी. गायकवाड यांनी, २०१७-१८ या वर्षासाठी जलयुक्त शिवार योजनेसाठी जिल्ह्यातील १४० गावांची निवड केली आहे. यामध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागाने १४० गावांमध्ये २१ कोटींची १०५ कामे घेतली आहेत. याच गावांमध्ये जिल्हा परिषद छोटे पाटबंधारे विभागाकडून १२ कोटी ६५ लाख रुपये निधीतून १८४ कामे हाती घेतल्याचे सांगितले.

राज्य शासनाचा कृषी विभाग आणि स्थानिक स्तर विभागाकडे अधिकारी, कर्मचारी कमी असताना त्यांनी कामे जादा घेतली आहेत. त्यांच्याकडून निधीही जादा खर्च होतो. जिल्हा परिषदेकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असतानाही जलयुक्त शिवार योजनेतून कामे कमी का घेतली आहेत?, असा प्रश्न उपाध्यक्ष बाबर यांनी उपस्थित केला.

यावर अधिकाऱ्यांनी, प्रस्तावच कमी आल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांच्या या उत्तरावर बाबर चांगलेच संतापले. खानापूर तालुक्यातूनच आम्ही ७८ प्रस्ताव पाठविले असताना, केवळ ३२ कामांनाच मंजुरी का दिली? उर्वरित प्रस्ताव परस्पर का कमी केले?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शासन निधी देण्यासाठी तयार असताना केवळ कामे नकोत म्हणून गावांचा विकास थांबविणार असाल, तर आम्ही चालू देणार नाही, असा इशारा अध्यक्ष देशमुख यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वत: बोलतो, पुन्हा सुधारित आराखडा करून वगळलेल्या सर्व कामांचा त्यामध्ये समावेश करा, अशी सूचना देशमुख यांनी दिली. त्यानुसार प्रभारी कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सुहास बाबर यांनी, ग्रामपंचायत विभागानेही विहीर पुनर्भरण, गाळ काढण्यासह अन्य कामे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून घेतली पाहिजेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली. यावेळी सभापती अरूण राजमाने, तम्मणगौडा रवी, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, बम्हदेव पडळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारSangliसांगली