शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सुदानमध्ये अडकलेले सांगलीकर अखेर मायदेशी, मुंबई विमानतळावर स्वागत; कुटूंबियांचा सुटकेचा निश्वास

By शरद जाधव | Updated: May 3, 2023 16:33 IST

सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत ३५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परतली.

सांगली : आफिक्रा खंडातील सुदान देशामध्ये सुरू असलेल्या गृहयुध्दामुळे अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांची अखेर सुटका झाली आहे. बुधवारी सकाळी सुदानहून विशेष विमानाने या नागरिकांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील १०० ते १२० हून अधिकजण सुदानमध्ये अडकले होते. आठवडाभराच्या प्रयत्नानंतर हे मायदेशी येत आहेत. सुदानमध्ये लष्कर व निमलष्करी दलात निर्माण झालेल्या संघर्षातून गृहयुध्द सुरू झाले आहे. युध्द सुरू झाल्यापासून सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूपणे भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. सांगली जिल्ह्यातील १०० ते १२० जण रबाका शहराजवळ असलेल्या केनाना शुगर फॅक्टरीमध्ये कामास होते. हा परिसर पूर्णपणे सुरक्षित असलातरी युध्द भडकण्याची चिन्हे असल्याने या कारखान्यातील कामगारांनी परत भारतात नेण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने प्रयत्न चालविले होते. सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत ३५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परतली. यात सांगली जिल्ह्यातील सात नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :Sangliसांगली