शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

सुदानमध्ये अडकलेले सांगलीकर अखेर मायदेशी, मुंबई विमानतळावर स्वागत; कुटूंबियांचा सुटकेचा निश्वास

By शरद जाधव | Updated: May 3, 2023 16:33 IST

सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत ३५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परतली.

सांगली : आफिक्रा खंडातील सुदान देशामध्ये सुरू असलेल्या गृहयुध्दामुळे अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांची अखेर सुटका झाली आहे. बुधवारी सकाळी सुदानहून विशेष विमानाने या नागरिकांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील १०० ते १२० हून अधिकजण सुदानमध्ये अडकले होते. आठवडाभराच्या प्रयत्नानंतर हे मायदेशी येत आहेत. सुदानमध्ये लष्कर व निमलष्करी दलात निर्माण झालेल्या संघर्षातून गृहयुध्द सुरू झाले आहे. युध्द सुरू झाल्यापासून सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूपणे भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. सांगली जिल्ह्यातील १०० ते १२० जण रबाका शहराजवळ असलेल्या केनाना शुगर फॅक्टरीमध्ये कामास होते. हा परिसर पूर्णपणे सुरक्षित असलातरी युध्द भडकण्याची चिन्हे असल्याने या कारखान्यातील कामगारांनी परत भारतात नेण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने प्रयत्न चालविले होते. सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत ३५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परतली. यात सांगली जिल्ह्यातील सात नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :Sangliसांगली