शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

सुदानमध्ये अडकलेले सांगलीकर अखेर मायदेशी, मुंबई विमानतळावर स्वागत; कुटूंबियांचा सुटकेचा निश्वास

By शरद जाधव | Updated: May 3, 2023 16:33 IST

सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत ३५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परतली.

सांगली : आफिक्रा खंडातील सुदान देशामध्ये सुरू असलेल्या गृहयुध्दामुळे अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांची अखेर सुटका झाली आहे. बुधवारी सकाळी सुदानहून विशेष विमानाने या नागरिकांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील १०० ते १२० हून अधिकजण सुदानमध्ये अडकले होते. आठवडाभराच्या प्रयत्नानंतर हे मायदेशी येत आहेत. सुदानमध्ये लष्कर व निमलष्करी दलात निर्माण झालेल्या संघर्षातून गृहयुध्द सुरू झाले आहे. युध्द सुरू झाल्यापासून सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूपणे भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. सांगली जिल्ह्यातील १०० ते १२० जण रबाका शहराजवळ असलेल्या केनाना शुगर फॅक्टरीमध्ये कामास होते. हा परिसर पूर्णपणे सुरक्षित असलातरी युध्द भडकण्याची चिन्हे असल्याने या कारखान्यातील कामगारांनी परत भारतात नेण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने प्रयत्न चालविले होते. सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत ३५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परतली. यात सांगली जिल्ह्यातील सात नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :Sangliसांगली